शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

समाजशास्त्रावर गणिताचा भार

By admin | Updated: May 7, 2017 00:35 IST

मध्यंतरी पाठ फिरविलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळांकडे पालक आता आकर्षित होऊ लागले आहेत.

जि.प.शिक्षणाचे तीनतेरा : भाषा शिक्षकांच्याही जागा रिक्त रूपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मध्यंतरी पाठ फिरविलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळांकडे पालक आता आकर्षित होऊ लागले आहेत. इंग्रजी शाळांतील विद्यार्थी जि.प.च्या शाळेत परतत आहेत. असे असताना शिक्षण विभाग मात्र गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात चालढकल करीत आहे. जिल्ह्यातील तब्बल २८४ शाळांत समाजशास्त्राचे शिक्षक गणित व विज्ञान हे विषय शिकवित आहेत. गणित आणि विज्ञनासारखा विषय तज्ज्ञांकडून शिकविणे अपेक्षित असताना येथे विपरित असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणित व विज्ञानासह जिल्ह्यात भाषेच्या शिक्षकांचीही दैना आहे. तब्बल २१ शाळांत भाषेचे शिक्षक नाहीत. यामुळे तीही जबाबदारी समाजशास्त्राच्या शिक्षकावर आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार गणित व विज्ञानाच्या शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील समाजशास्त्राचे तब्बल १९० शिक्षक अतिरिक्त ठरतात. त्यांच्या समायोजनाची जबाबदारी शिक्षण विभागाला पार पाडावयाची आहे. जिल्ह्यात समाजशास्त्राच्या केवळ ६२ जागा मंजूर आहे. असे असताना समाजशास्त्राचे २५२ शिक्षक नियुक्त केले आहेत. या जागांवर गणित व विज्ञानाच्या शिक्षक नियुक्त केले तर तब्बल १९० शिक्षक अतिरिक्त ठरतात. वर्धा पंचायत समितीतील उच्च प्राथमिक शाळांत गणित-विज्ञान विषयाचे ४२ शिक्षक मंजूर आहेत. सद्यस्थितीत येथे तीनच पदे भरली आहेत. प्रत्यक्षात ३९ पदे रिक्त असताना शिक्षण विभागाने केवळ ११ पदे रिक्त दाखविली. हिंगणघाट पं.स.मध्ये गणित-विज्ञान विषयाची ५३ पदे मंजूर असून येथेही तीनच पदे भरली आहे. येथे अजून ५० पदे रिक्त असताना शिक्षण विभागाने १८ पदेच रिक्त असल्याचे सांगितले. आर्वी विभागात ३३ पदे मान्य आहे. एकही पद भरलेले नसताना शिक्षण विभागाने सहाच पदे रिक्त दाखविली आहेत. अन्य पंचायत समितीतही हिच अवस्था आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील कलम १९ व २५ अंतर्गत परिशिष्टानुसार तसेच १३ डिसेंबर २०१३, २८ आॅगस्ट २०१५ व ८ जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार उच्च प्राथमिक स्तरावरील वर्गांसाठी शिक्षकाचे पहिले पद गणित-विज्ञान विषयाकरिता, दुसरे पद भाषा विषयांकरिता व तिसरे पद सामाजिक शास्त्राकरिता भरणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये उच्च प्राथमिकच्या वर्गांकरिता विषय शिक्षकांची नियुक्ती करताना शासनाचे सुस्पष्ट आदेश नाही. यातील त्रुटींमुळे गणित, विज्ञान ऐवजी सामाजिक शास्त्र विषयांच्या शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यानंतर न्यायालयीन याचिकांमुळे निर्णय घेणे शक्य झाले नाही; पण न्यायालयीन याचिका खारीज झाल्यानंतर वर्धेत आवश्यक अर्हताधारक शिक्षकांची नियुक्ती केली नाही. बदली प्रक्रियेनंतर होणार समायोजन जिल्ह्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया येत्या १५ तारखेनंतर होणार आहे. या बदली प्रक्रियेनंतर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचा विचार करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. शिक्षकांच्या यंदाच्या बदल्या अवघड आणि साधारण क्षेत्राच्या वादात चांगल्याच अडकल्या होत्या. त्यावर मार्ग निघाला असून जिल्ह्यातील केवळ सातच गावे अवघड क्षेत्रात राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने समाजशास्त्राच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकविण्यात येत आहे. यामुळे सध्याच्या स्थितीत गणित आणि विज्ञानाच्या ३५ आणि भाषेच्या २१ जागा रिक्त दाखविण्यात आल्या आहेत. प्रत्येक पंचायत समितीला त्यांच्या क्षेत्रातील गणित आणि विज्ञान विषय असणाऱ्या शिक्षकांची माहिती मागविली आहे. यातून या जागा भरण्यात येणार आहे. यात अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे बदलीनंतर समायोजन करण्यात येणार आहे. - किसन शेंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. वर्धा