शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

कालवे,पाटचºयांना झुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 22:11 IST

तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी व रबी पिकांसाठी कालवे विभागाने पहिल्या पाळीचे पाणी सोडले; पण कालवे व पाटचºया दुरूस्त केल्या नाहीत.

ठळक मुद्देहजारो लिटर पाण्याचा अपव्यय : अधिकारी म्हणतात कर्मचाºयांचा तुटवडा

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी व रबी पिकांसाठी कालवे विभागाने पहिल्या पाळीचे पाणी सोडले; पण कालवे व पाटचºया दुरूस्त केल्या नाहीत. यामुळे हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. नियोजन नसल्याने अधिकारी उडवाउडवीची उत्तर देऊन वेळ मारून नेत आहे. यामुळे शेतकºयांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. शासनाकडे निधी नसल्याने ही समस्या गंभीर रूप धारण करीत असल्याचे दिसते.आष्टी, साहुर, भारसवाडा, लहानआर्वी, अंतोरा या भागात रबीचे सिंचन क्षेत्र अधिक आहे. यावर्षी सोयाबीनने मोठा विश्वासघात केला. कपाशीवर रोग आणि किडीने आक्रमण केले. अशा स्थितीत हाती आलेले पीक आणि त्याला मिळालेला भाव अश्रू ढाळणारा आहे. याही विपरित परिस्थितीवर जीगरबाज बळीराजाने रबीसाठी परिपूर्ण तयारी केली आहे. शेताच्या बांधावरून पाटचºयापर्यंत सिंचनाची व्यवस्था केली. शासकीय सेवा मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांचा पुरता गोंधळ उडाला. अप्पर वर्धा प्रकल्प विभागाने उर्ध्व वर्धा डावा कालवा, पाटचºया उपविभाग तळेगाव व मोर्शी येथील कार्यालयांनी दुरूस्ती व साफसफाई करण्याचे आश्वासन दिले होते; पण सर्व आशांवर पाणी फेरले गेले आहे.कालवे, पाटचºयांना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे. सिमेंट काँक्रीटची दुरूस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. दर्शनी भागावर थोड्याफार प्रमाणात दुरूस्ती केल्याचे दिसते; पण आतील भागात असणाºया कालवे व पाटचºया जैसे थे आहेत. या विभागाचे नियंत्रण अमरावती येथून आहे. तसेच उपविभागीय अभियंता कार्यालय, कार प्रकल्प कारंजा, यांच्या अधिनस्त असणाºया कालव्यांचे बांधकाम अर्धवट झाल्याने येथील सिंचनाचाची प्रश्न ऐरणीवर आला आहे.शासनाने पाणी वाटप संस्था स्थापन केल्या आहेत. या संस्थांना अनेक सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत. यामुळे पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन संस्थांनीही करावे, असे अधिकारी सांगत असतात. पाटचºया बांधून दिल्यावर त्याची निगा राखण्याची जबाबदारी शेतकºयांचीच असल्याचे शासनाचे धोरण आहे; पण शेतकºयांना या दुरूस्तीसाठी आजपर्यंत काहीच मोबदला मिळालेला नाही. परिणामी, शेतकरी तथा अधिकारीही सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनानेच कालवे व पाटचºया दुरूस्त करून शेतकºयांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देत अपव्यय थांबविणे गरजेचे आहे.महिनाभरात जेसीबीने झुडपे काढणारअप्पर वर्धा प्रकल्प विभागाने मेकॅनिकल विभागाकडून एक जेसीबी स्वतंत्र घेण्याचे ठरविले आहे. त्या माध्यमातून महिनाभरात जेसीबीच्या साह्याने सर्व समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याची माहिती एका अभियंत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पूर्वी असलेले आर्वी आणि तळेगाव येथील उपविभाग बंद झाल्यामुळे एकाच उपविभागावर जबाबदारी आली आहे.कर्मचाºयांचा तुटवडा कारणीभूतकालवे साफ करण्याकरिता शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी, मजूर सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे कर्मचारी कमी आणि काम अधिक, असे समीकरण झाले आहे. परिणामी, दुरूस्तीची कामे प्रलंबित राहत असल्याचे दिसून येत आहे. आता तक्रारीच्या तीव्रतेप्रमाणे आवश्यक ठिकाणी आधी दुरूस्ती करून देण्यात येईल, असे धोरण आखण्यात आल्याचे सांगितले जाते.शेतकरी आंदोलनाच्या मानसिकतेतखरीप हंगामातील कपाशी आणि तूर पिकाकरिता सध्या उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे; पण कालवा तथा पाटचºया क्षतिग्रस्त असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. परिणामी, शेतकºयांच्या शेतांपर्यंत पाणीच पोहोचत नाही. कालवे, पाटचºयांची दुरूस्ती केली जात नसल्याने शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. याचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत.