शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

कालवे,पाटचºयांना झुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 22:11 IST

तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी व रबी पिकांसाठी कालवे विभागाने पहिल्या पाळीचे पाणी सोडले; पण कालवे व पाटचºया दुरूस्त केल्या नाहीत.

ठळक मुद्देहजारो लिटर पाण्याचा अपव्यय : अधिकारी म्हणतात कर्मचाºयांचा तुटवडा

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी व रबी पिकांसाठी कालवे विभागाने पहिल्या पाळीचे पाणी सोडले; पण कालवे व पाटचºया दुरूस्त केल्या नाहीत. यामुळे हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. नियोजन नसल्याने अधिकारी उडवाउडवीची उत्तर देऊन वेळ मारून नेत आहे. यामुळे शेतकºयांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. शासनाकडे निधी नसल्याने ही समस्या गंभीर रूप धारण करीत असल्याचे दिसते.आष्टी, साहुर, भारसवाडा, लहानआर्वी, अंतोरा या भागात रबीचे सिंचन क्षेत्र अधिक आहे. यावर्षी सोयाबीनने मोठा विश्वासघात केला. कपाशीवर रोग आणि किडीने आक्रमण केले. अशा स्थितीत हाती आलेले पीक आणि त्याला मिळालेला भाव अश्रू ढाळणारा आहे. याही विपरित परिस्थितीवर जीगरबाज बळीराजाने रबीसाठी परिपूर्ण तयारी केली आहे. शेताच्या बांधावरून पाटचºयापर्यंत सिंचनाची व्यवस्था केली. शासकीय सेवा मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांचा पुरता गोंधळ उडाला. अप्पर वर्धा प्रकल्प विभागाने उर्ध्व वर्धा डावा कालवा, पाटचºया उपविभाग तळेगाव व मोर्शी येथील कार्यालयांनी दुरूस्ती व साफसफाई करण्याचे आश्वासन दिले होते; पण सर्व आशांवर पाणी फेरले गेले आहे.कालवे, पाटचºयांना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे. सिमेंट काँक्रीटची दुरूस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. दर्शनी भागावर थोड्याफार प्रमाणात दुरूस्ती केल्याचे दिसते; पण आतील भागात असणाºया कालवे व पाटचºया जैसे थे आहेत. या विभागाचे नियंत्रण अमरावती येथून आहे. तसेच उपविभागीय अभियंता कार्यालय, कार प्रकल्प कारंजा, यांच्या अधिनस्त असणाºया कालव्यांचे बांधकाम अर्धवट झाल्याने येथील सिंचनाचाची प्रश्न ऐरणीवर आला आहे.शासनाने पाणी वाटप संस्था स्थापन केल्या आहेत. या संस्थांना अनेक सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत. यामुळे पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन संस्थांनीही करावे, असे अधिकारी सांगत असतात. पाटचºया बांधून दिल्यावर त्याची निगा राखण्याची जबाबदारी शेतकºयांचीच असल्याचे शासनाचे धोरण आहे; पण शेतकºयांना या दुरूस्तीसाठी आजपर्यंत काहीच मोबदला मिळालेला नाही. परिणामी, शेतकरी तथा अधिकारीही सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनानेच कालवे व पाटचºया दुरूस्त करून शेतकºयांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देत अपव्यय थांबविणे गरजेचे आहे.महिनाभरात जेसीबीने झुडपे काढणारअप्पर वर्धा प्रकल्प विभागाने मेकॅनिकल विभागाकडून एक जेसीबी स्वतंत्र घेण्याचे ठरविले आहे. त्या माध्यमातून महिनाभरात जेसीबीच्या साह्याने सर्व समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याची माहिती एका अभियंत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पूर्वी असलेले आर्वी आणि तळेगाव येथील उपविभाग बंद झाल्यामुळे एकाच उपविभागावर जबाबदारी आली आहे.कर्मचाºयांचा तुटवडा कारणीभूतकालवे साफ करण्याकरिता शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी, मजूर सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे कर्मचारी कमी आणि काम अधिक, असे समीकरण झाले आहे. परिणामी, दुरूस्तीची कामे प्रलंबित राहत असल्याचे दिसून येत आहे. आता तक्रारीच्या तीव्रतेप्रमाणे आवश्यक ठिकाणी आधी दुरूस्ती करून देण्यात येईल, असे धोरण आखण्यात आल्याचे सांगितले जाते.शेतकरी आंदोलनाच्या मानसिकतेतखरीप हंगामातील कपाशी आणि तूर पिकाकरिता सध्या उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे; पण कालवा तथा पाटचºया क्षतिग्रस्त असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. परिणामी, शेतकºयांच्या शेतांपर्यंत पाणीच पोहोचत नाही. कालवे, पाटचºयांची दुरूस्ती केली जात नसल्याने शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. याचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत.