शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक शेततळे अन् सोलरपंप ठरले भरभराटीचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:02 IST

सन २०१५ चा आॅक्टोबर महिना. पावसाच्या कमतरतेमुळे मदनी या गावातील शेतकऱ्याने १५ एकर सोयाबीनवरून नांगर फिरवला. या घटनेमुळे जिल्ह्यातील कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली होती; पण त्याच शेतकऱ्यासाठी २०१८ चा आॅक्टोबर महिना सुखद ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सन २०१५ चा आॅक्टोबर महिना. पावसाच्या कमतरतेमुळे मदनी या गावातील शेतकऱ्याने १५ एकर सोयाबीनवरून नांगर फिरवला. या घटनेमुळे जिल्ह्यातील कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली होती; पण त्याच शेतकऱ्यासाठी २०१८ चा आॅक्टोबर महिना सुखद ठरत आहे. आज त्यांच्या शेतात १५ एकरवर फळबाग बहरली आहे. केवळ एका पावसामुळे नांगर फिरवावा लागणाऱ्या त्यांच्या शेतीत ही किमया केली ती सामूहिक शेततळे आणि सोलरपंपाने.वर्धा तालुक्यातील मदनी गावातील माधव वानखेडे या शेतकऱ्यांकडे २५ एकर शेती जिराईत होती. २०१५ मध्ये जिल्ह्यात कोरडा दुष्काळ होता. त्या दुष्काळाचा फटका सिंचनाची कोणतीही व्यवस्था नसणाºया आणि विद्युत जोडणी नसणाºया वानखेडे सारख्या शेतकºयांना बसला. त्यांनी त्यांच्या १५ एकर सोयाबीनचे पीक नांगरले. यावेळी वानखेडे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेततळे देण्याची मागणी केली. माधव वानखेडे यांनी सामूहिक शेततळ्याचा लाभ घेतला.५६ मीटर, ४५ मीटर, ५.५ मीटर असे मोठे सामूहिक शेततळे तयार केले. तसेच शासनाच्या सौर कृषीपंप योजनेमधून त्यांना  ७.५ एचपी सोलरपंपचाही लाभ मिळाला. त्यांच्याकडे पाणी आणि विद्युत अशा दोन्ही सुविधा उपलब्ध झाल्यावर त्यांनी जिराईत शेती संपूर्णपणे ओलीताखाली आणली. ५ एकरात केळी आणि ८ एकरमध्ये डाळिंबाची लागवड केली. तसेच आंतरपीक म्हणून सोयाबीन आणि हरभरा या पिकांचेही त्यांनी उत्पादन घेतले. मागील वर्षी केळीच्या उत्पादनातून त्यांना ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तसेच सोयाबीन आंतरपिकातून १.५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर डाळिंबाचे उत्पन्न यावर्षी पासून सुरू होत आहे. मुख्य म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी त्यांनी फळबागेला ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. सामूहिक शेततळ्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले.सोलरपंपामुळे माझी विजेची आणि पैशाची बचत होत आहे. शिवाय पिकांना वेळेत पाणी मिळाल्यामुळे उत्पन्नातही भर पडली. लोड शेडिंगमुळे रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जाण्याची आता गरज पडत नाही.- माधव वानखेडे, शेतकरी, मदनी.