शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

प्रलंबित मागण्यांसाठी इमारत बांधकाम कामगारांचा मोर्चा

By admin | Updated: June 7, 2015 02:24 IST

सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात प्रलंबित असलेल्या समस्या त्वरित दूर कराव्या, अशी मागणी इमारत बांधकाम कामगारांनी केली.

वर्धा : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात प्रलंबित असलेल्या समस्या त्वरित दूर कराव्या, अशी मागणी इमारत बांधकाम कामगारांनी केली. यासाठी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. विठ्ठल मंदिर रोड बढे चौक येथून निघालेला कामगारांचा मोर्चा बजाज चौक, रेल्वे स्टेशन मार्गे कामगार अधिकारी कार्यालयावर धडकला. यशवंत झाडे, महेश दुबे, सिताराम लोहकरे, शरद पालांदुरकर, विनोद तडस, अक्षय कांबळे, रमेश कौरती, कमलाकर मरघडे, सुनीता ढवळे, सुरेश तडस, संध्या संभे, अनिल निमजे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातून हजारावर कामगार महिला व पुरूष मोर्चात सहभागी झाले. सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर कामगारांची सभा झाली. यात लोहकरे यांनी बांधकाम कामगार दुसऱ्यांची कलाकुसरीने घरे बांधतात; पण त्यांचे स्वत:ची घरे नाल्याकाठी वा झोपडपट्टीत असतात. या कष्टकरी कामगारांसाठी शासनाने ईमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बनविले. अनेक सुविधा दिल्या; पण दप्तरदिरंगाईने त्या त्यांच्यापर्यंत पोहोचू दिल्या जात नाही. अनेक लाभांची सुविधा असल्याने दलालांचा सुळसुळाट झाला असून आर्थिक प्रलोभने देऊन प्रत्यक्ष कामगार नसलेल्यांची कामे होतात; पण खरे कामगार वंचित राहतात, असे सांगितले. यावेळी कामगार अधिकारी गुल्हाणे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. मागण्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)शासन व कामगार कल्याणकारी मंडळाला मागण्या कळविणारराज्य मंडळाशी संबंधित ३० आॅगस्ट २०१४ नंतर नोंदणी केलेल्या कामगारांना ३ हजार रुपये देणे, कामगारांच्या दोन मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी ५१ हजार अनुदान, दिवंगत कामगारांच्या व वयाची ६० वर्षे पूर्ण कामगारांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन या बाबी राज्य शासन व कामगार कल्याणकारी मंडळाशी संबंधीत असल्याने मुख्यमंत्री व कामगार आयुक्त मुंबई यांना कळविण्याचे आश्वासन कामगार अधिकारी गुल्हाणे यांनी यावेळी दिले.