शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बौद्ध विहार हे संस्कार केंद्र व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:57 IST

राजकारण लोकांना एकमेकांपासून वेगळे करतात म्हणून धम्म कार्यात राजकारण आणू नये. तसेच बौद्ध विहार हे संस्कार केद्र्र व्हावते, असे मत साहित्यिक अ‍ॅड. वैशाली डोळस यानी व्यक्त केले. येथील डॉ. आत्माराम जवादे स्मृती परिसरात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देवैशाली डोळस : जवादे स्मृती परिसरात बौद्ध धम्म परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राजकारण लोकांना एकमेकांपासून वेगळे करतात म्हणून धम्म कार्यात राजकारण आणू नये. तसेच बौद्ध विहार हे संस्कार केद्र्र व्हावते, असे मत साहित्यिक अ‍ॅड. वैशाली डोळस यानी व्यक्त केले.येथील डॉ. आत्माराम जवादे स्मृती परिसरात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत आनंद महाथेरो (दिल्ली) होते. उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अनिल जवादे यांच्या हस्ते झाले. मुख्य मार्गदर्शक म्हणून भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, साहित्यिक अँड. वैशाली डोळस, प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. सुभाष खंडारे, राजाभाऊ ताकसाडे, सुनील ढाले, निगोट, बी.एस.पाटील, प्राचार्य आर. के. पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक भदंत राजरत्न व स्वागताध्यक्ष गोरख भगत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, स्त्रियाला स्वातंत्र्याचा हक्क देणारा बौद्ध धर्म हा जगातला पहिला धर्म आहे, समानता हा धम्माचा पाया असून प्रत्येकाचा सन्मान हे धम्माचे मूल्य आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाची सुरुवात भदंत सत्यानंद महाथेरो येनाळा, अरण्यवास यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व बुद्ध वंदना करुन झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी बुध्द वंदना व नृत्य सादर केले. धम्म परिषदेचे उदघाटन अनिल जवादे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माजी प्राचार्य गोरख भगत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकातून गोरख भगत यांनी डॉ. आंबेडकर यांना अपेक्षित असणाऱ्या समाजाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. उद्घाटक अनिल जवादे यांनी बौध्द धम्म हा लोकांना जोडणारा आहे, असे सांगितले.राजरत्न आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचा बहिष्कृत संघटनेच्या स्थापणेपासून बुद्धीष्ट सोसायटीपर्यंतच्या इतिहासावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत महाथेरो यांनी राजकीय पक्ष स्वार्थासाठी बौद्ध बांधवांचा कसा वापर करतात याची माहिती दिली. यानंतर संविधान भारती संच नागपूर यांचा बुध्द भीम गितांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य आर.के. पाटील, उपप्राचार्य एच. पी.गुडधे, उपमुख्याध्यापक एस.एम.राऊत, पर्यवेक्षक दिनेश वाघ, डब्ल्यू. एन.पडवे, एस. ए.बनसोड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,स्वयंसेवक यांनी सहकार्य केले. धम्म परिषदेला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुवर्ण महोत्सवी समारोपीय कार्यक्रमहिंगणघाट - स्थानिक डॉ. बी. आर.आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवार ४ नोव्हेंबरला सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात धम्म परिषद, स्नेह संमेलन घेण्यामागील भूमिका प्राचार्य आर.के पाटील यांनी विशद केली. प्रसिद्ध साहित्यिक ना .गो .थुटे यांनी विद्यार्थ्यांना माता,पिता व गुरू यांचा सन्मान करावा, ज्ञानाची तृष्णा, गुरुवर निष्ठा व अध्ययनात सातत्य असेल तरच विद्यार्थी घडतो असे सांगितले. व्यासपीठावर अशोक जवादे, प्रशांत जवादे, रमण जवादे, मंदाकिनी जवादे, अनुराधा जवादे, खोब्रागडे, गोरख भगत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.सामाजिक कार्यकर्ते अनिल जवादे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी विचाराने, कृतीने व स्वत:च्या प्रयत्नाने चांगलें नागरिक बनावे तसेच वैचारिक दृष्टीने समृद्ध नागरिक बनविणे हेच संस्थेचे ध्येय आहे. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्याने विदर्भ राज्य निर्मिती- घटनात्मक तरतुदी या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संचालन व आभार प्रा.उमेश ढोबळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शाळेतील सर्वं विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.