शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

बुद्ध हा एक विचार, जीवन जगण्याची कला व सर्वोत्तम संस्कार आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:30 IST

बुद्ध हा एक विचार आहे, जीवन जगण्याची कला आहे, पुढच्या पिढीसाठी संयमी आचरणासह सर्वोत्तम संस्कार आहे. याचे कटाक्षाने पालन केल्यास दुख: व भयाची अनुभूति नसणारच, सर्व व्याधींवर सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचशील आणि बुद्धाची शिकवण आहे.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : सचिन दहाट यांच्या निवासस्थानी वर्षवास समारोपीय कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : बुद्ध हा एक विचार आहे, जीवन जगण्याची कला आहे, पुढच्या पिढीसाठी संयमी आचरणासह सर्वोत्तम संस्कार आहे. याचे कटाक्षाने पालन केल्यास दुख: व भयाची अनुभूति नसणारच, सर्व व्याधींवर सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचशील आणि बुद्धाची शिकवण आहे. आज समाजात त्यांच्या अनुकरणाची गरज आहे व जे काही ग्रंथपाठ आपण याठिकाणी करतो ते प्रत्यक्षात चरित्रात व आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. गौतम बुद्ध राजघराण्यातील होते, शासक होते परंतु समाजाला दिशा देण्यासाठी सर्व सुखांचा त्याग करून धम्म म्हणजेच धर्माचा उपदेश देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले, असे प्रतिपादन एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रनेते शैलेश अग्रवाल यांनी केले.पिपरी पुनर्वसन येथील सचिन दहाट यांच्या निवासस्थानी वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम झाला. याप्रसंगी ते बोलत होते. वर्षावासात याठिकाणी ३ महिने बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले. वषार्वास समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शैलेश अग्रवाल उपस्थित होते. सुरवातीला पंचशील ध्वजारोहण महेंद्र्र मात्रे व शेषराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण आणि पुष्प अर्पण करण्यात आले. उपासक सचिन दहाट, अर्चना सचिन दहाट, शीमा काळे, सविता दहाट, नामदेव खोब्रागडे, इंदू मात्रे व अन्नु दहाट यांनी उर्वरित ग्रंथ वाचन केले व बौद्ध बांधवानी याप्रसंगी पंचशील ग्रहण केले. यावेळी डॉ. प्रा.अनिल दहाट, प्रा.काळे, प्रा.मानकर व शैलेश अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अग्रवाल म्हणाले की, विपष्नासाठी विश्व विख्यात इगतपुरीच्या केंद्राचे संस्थापक सत्यनारायन गोयणका अग्रवाल समाजाचे होते याचा आम्हाला अभिमान असून शांतीच्या मार्गदर्शक समाज मूल्यांचा स्वागतकर्ता गुरु गोयनकांचा माझा समाज आहे. आजही त्यांच्या पत्नी इगतपुरीचे केंद्र संचालन करीत असल्याचे अग्रवाल यांनी संगितले.अनिल दहाट सर्व उपासकांचे अभिनंदन करतांनी म्हणाले, आधीच्या काळात शेतीची कामं करून थकून आल्यावरही स्त्रिया ग्रंथपाठ करायच्या त्याचप्रमाणे सचिन व अर्चना यांनी नौकरी व दैनंदिन जवाबदारी पूर्ण करून ग्रंथपाठ केला आहे. शैलेश अग्रवाल बौद्ध व धम्म यात आस्था ठेवतात आणि ज्याप्रमाणे गौतम बुद्ध राजसी वैभव सोडून समाजातील कष्ट दूर करण्यासाठी निघाले होते त्याचप्रमाणे शैलेश अग्रवाल अति संपन्न असूनही संपन्नतेचा उपभोग घेण्याच्या वयात आणि काळात धम्म प्रचारक भंते समान शेतकऱ्यांंची अर्थक्रांती घडविण्यासाठी गावोगावी फिरत आहेत, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश मात्रे यांच्यासह राजेश शिरगरे, वसंत मंडवे, शैलेश तलवारे, विकास गोहेकर, पांडुरंग मलीये, जयशीव तांबेकर, दिवाकर पांढरे, निलेश घुगरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.