शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

बुद्ध हा एक विचार, जीवन जगण्याची कला व सर्वोत्तम संस्कार आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:30 IST

बुद्ध हा एक विचार आहे, जीवन जगण्याची कला आहे, पुढच्या पिढीसाठी संयमी आचरणासह सर्वोत्तम संस्कार आहे. याचे कटाक्षाने पालन केल्यास दुख: व भयाची अनुभूति नसणारच, सर्व व्याधींवर सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचशील आणि बुद्धाची शिकवण आहे.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : सचिन दहाट यांच्या निवासस्थानी वर्षवास समारोपीय कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : बुद्ध हा एक विचार आहे, जीवन जगण्याची कला आहे, पुढच्या पिढीसाठी संयमी आचरणासह सर्वोत्तम संस्कार आहे. याचे कटाक्षाने पालन केल्यास दुख: व भयाची अनुभूति नसणारच, सर्व व्याधींवर सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचशील आणि बुद्धाची शिकवण आहे. आज समाजात त्यांच्या अनुकरणाची गरज आहे व जे काही ग्रंथपाठ आपण याठिकाणी करतो ते प्रत्यक्षात चरित्रात व आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. गौतम बुद्ध राजघराण्यातील होते, शासक होते परंतु समाजाला दिशा देण्यासाठी सर्व सुखांचा त्याग करून धम्म म्हणजेच धर्माचा उपदेश देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले, असे प्रतिपादन एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रनेते शैलेश अग्रवाल यांनी केले.पिपरी पुनर्वसन येथील सचिन दहाट यांच्या निवासस्थानी वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम झाला. याप्रसंगी ते बोलत होते. वर्षावासात याठिकाणी ३ महिने बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले. वषार्वास समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शैलेश अग्रवाल उपस्थित होते. सुरवातीला पंचशील ध्वजारोहण महेंद्र्र मात्रे व शेषराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण आणि पुष्प अर्पण करण्यात आले. उपासक सचिन दहाट, अर्चना सचिन दहाट, शीमा काळे, सविता दहाट, नामदेव खोब्रागडे, इंदू मात्रे व अन्नु दहाट यांनी उर्वरित ग्रंथ वाचन केले व बौद्ध बांधवानी याप्रसंगी पंचशील ग्रहण केले. यावेळी डॉ. प्रा.अनिल दहाट, प्रा.काळे, प्रा.मानकर व शैलेश अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अग्रवाल म्हणाले की, विपष्नासाठी विश्व विख्यात इगतपुरीच्या केंद्राचे संस्थापक सत्यनारायन गोयणका अग्रवाल समाजाचे होते याचा आम्हाला अभिमान असून शांतीच्या मार्गदर्शक समाज मूल्यांचा स्वागतकर्ता गुरु गोयनकांचा माझा समाज आहे. आजही त्यांच्या पत्नी इगतपुरीचे केंद्र संचालन करीत असल्याचे अग्रवाल यांनी संगितले.अनिल दहाट सर्व उपासकांचे अभिनंदन करतांनी म्हणाले, आधीच्या काळात शेतीची कामं करून थकून आल्यावरही स्त्रिया ग्रंथपाठ करायच्या त्याचप्रमाणे सचिन व अर्चना यांनी नौकरी व दैनंदिन जवाबदारी पूर्ण करून ग्रंथपाठ केला आहे. शैलेश अग्रवाल बौद्ध व धम्म यात आस्था ठेवतात आणि ज्याप्रमाणे गौतम बुद्ध राजसी वैभव सोडून समाजातील कष्ट दूर करण्यासाठी निघाले होते त्याचप्रमाणे शैलेश अग्रवाल अति संपन्न असूनही संपन्नतेचा उपभोग घेण्याच्या वयात आणि काळात धम्म प्रचारक भंते समान शेतकऱ्यांंची अर्थक्रांती घडविण्यासाठी गावोगावी फिरत आहेत, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश मात्रे यांच्यासह राजेश शिरगरे, वसंत मंडवे, शैलेश तलवारे, विकास गोहेकर, पांडुरंग मलीये, जयशीव तांबेकर, दिवाकर पांढरे, निलेश घुगरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.