शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

बुद्ध धम्म ही भारताची संजीवनी

By admin | Updated: February 7, 2016 00:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमृत रुपाने बुद्ध धम्म आम्हाला दिला. त्यामुळे नीतिमत्ता आली. सामान्यांमध्ये ही नीतिमत्ता रुजविण्यासाठी बुद्ध धम्मदीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

विमलकीर्ती गुणसरी : धम्मदीक्षा समारोहात हजारो नागरिक सहभागीवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमृत रुपाने बुद्ध धम्म आम्हाला दिला. त्यामुळे नीतिमत्ता आली. सामान्यांमध्ये ही नीतिमत्ता रुजविण्यासाठी बुद्ध धम्मदीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्ध धम्म या देशाची संजीवनी आहे. अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे धम्मदीक्षा होय असे विचार भदंत विमलकीर्ती गुणसरी यांनी व्यक्त केले. डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती पर्वात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्यायाच्या सामाजिक वातावरण निर्मितीकरिता संथागार, मास्टर कॉलनी, सावंगी (मेघे), वर्धा येथे बुद्ध धम्मदीक्षा समारोह हजारो लोकांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी विजय मेश्राम, ई. झेड. खोब्रागडे, डॉ. एम. एल. कासारे, डॉ. सुभाष खंडारे, जि. प. उपाध्यक्ष विलास कांबळे उपस्थित होते. मार्गदर्शनात गुणसारी म्हणाले, या देशात जोपर्यंत जातिभेद आहे, तोपर्यंत माणूस माणसापासून दूर आहे. माणसातील भेद नष्ट व्हायचे असेल तर प्रत्येक माणसाने एकसंघ होऊन समाज व देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे मत त्यांनी व्यक्त केले. विजय मेश्राम यांनी बाबासाहेबांच्या कल्पनेतील भारतीय कसे विकास पावतील याविषयी मार्गदर्शन केले. ई.झेड. खोब्रागडे, देशाचे संविधान व व सर्वसामान्यांची जबाबदारी यांचा समन्वय साधने आवश्यक आहे. बुद्ध धम्मदीक्षा घेऊन जातीविरहीत समाज निर्माण व्हावा अशी गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिसरातील सर्व प्रतिनिधींनी सहकार्य केले. कार्यक्रमामध्ये सुरुवातीला स्मृतिगंध म्युझिकल ग्रुप यांनी श्रद्धायुक्त व प्रेरणादायी गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. बुद्ध धम्मदीक्षा समारोह समितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र रत्नबोधी व उज्ज्वला तेलंग यांनी केले आभार आर.एम.पाटील यांनी मानले. यशस्वीतेकरिता एन. एस.पाटील, ओमप्रकाश घोटेकर, दादाराव जंगले, आर. एम. पाटील, एम. जे. तागडे, गौतम भगत, नागार्जुन जिनसेन, शुभमचित्त गुणदर्शी, रवी पानबुडे, जी. एन. भालेराव, अतुल पाटील, ग्रा. पं. सदस्य महेंद्र गेडाम, गीता पाटील, टी.व्ही. राऊत, डॉ. प्रवीण वानखेडे, डॉ. रवींद्र वानखेडे, खुशाल पाटील, बबन वाघमारे, यशवंत भानसे, सरला जंगले, धम्मपाल कांबळे, रवी लभाने, अनिल बाभळे, मनीषा ब्राह्मणे, प्रतिभा बहादुरे, मंजुषा सुभाषित, राजु थुल, घननीळ थुल, वसंत गायकवाड, समर्थ गोडघाटे, केवल मेश्राम, रंजना गोडघाटे, अस्मिता चहारे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)