शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

सत्य आचरणात आणून गांधींनी अहिंसेलाच शस्त्र बनविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात सत्य आणि अहिंसेचे महत्त्व ओळखून सत्य आचरणात आणले. ज्या इंग्रज सत्तेचा सूर्यास्त होत नव्हता, अशांसोबत महात्मा गांधी यांनी अहिंसेला शस्त्र बनवून लढा दिला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.  महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात ‘गांधी का दर्शन : वैश्विक साम्प्रदायिकता का समाधान’ या विषयावर आयोजित संगोष्ठित ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सत्य आचरणात आणणे सहज सोपे नाहीच; पण काहींनी ते आपल्या आचरणात आणल्याचे वास्तव आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात सत्य आणि अहिंसेचे महत्त्व ओळखून सत्य आचरणात आणले. ज्या इंग्रज सत्तेचा सूर्यास्त होत नव्हता, अशांसोबत महात्मा गांधी यांनी अहिंसेला शस्त्र बनवून लढा दिला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात ‘गांधी का दर्शन : वैश्विक साम्प्रदायिकता का समाधान’ या विषयावर आयोजित संगोष्ठित ते बोलत होते. व्यासपीठावर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे कुलपती प्रो. रजनीशकुमार शुक्ल, कुलसचिव कादर नवाज खान, नितीश भारद्वाज, कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाचे कुलपती श्रीनिवास वरखेडी यांची उपस्थिती होती. राज्यपाल पुढे म्हणाले, मानवी जीवनाचा प्रत्येक विषय गांधींच्या विचाराने प्रभावित होतो. गांधी विचारांमध्ये गीता, बुद्ध, नानक, रामदास यांचे दर्शन होते. आत्मकथेत अनेक व्यक्ती आपल्या कमजोरी लपवितात; पण बापूंनी आपल्या कमजोरी लपविलेल्या नाहीत. संस्कार आणि भाषेला गांधींनी महत्त्व देत देशाला एकत्र आणण्यासाठी हिंदी भाषेचा वापर केला. गांधींकडे दूरदृष्टी होती. त्यांचे विचार आत्मसात करून देशालाच नव्हे, तर जगालाही प्रगती साधता येत असल्याचे यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट केले.नितेश भारद्वाज यांनी सध्या व्यवसायप्रधान शिक्षण दिले जात आहे; पण आज आत्मविश्वासी मानव निर्मितीच्या शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. अमृतमहोत्सवी वर्षात आपण दिशा निश्चित केल्यास पुढील २५ वर्षांमध्ये भारताचा आणखी विकास होईल. शिवाय भारत विश्वगुरू होईल, असेही स्पष्ट केले. महर्षी, देवर्षी व राजर्षी, असे तीन द्रष्टे आहेत; पण महात्मा गांधी यांनी महात्मा हा नवा द्रष्टा रचला. सत्याची अनेक मुखे असून, महात्मा गांधी हे सत्याचे उपासक होते, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे कुलपती रजनीशकुमार शुक्ल यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कुलसचिव कादर नवाज खान यांनी मानले. 

गांधी हिल्सवर राज्यपालांनी केले दीप प्रज्वलित - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय परिसरातील गांधी हिल्स येथे दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाचा शुभारंभ केला. यावेळी हिंदी विश्व विद्यापीठातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी