शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
4
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
5
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
6
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
7
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
8
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
9
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
10
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
11
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
13
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
14
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
15
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
16
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
17
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
18
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
19
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
20
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...

सत्य आचरणात आणून गांधींनी अहिंसेलाच शस्त्र बनविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात सत्य आणि अहिंसेचे महत्त्व ओळखून सत्य आचरणात आणले. ज्या इंग्रज सत्तेचा सूर्यास्त होत नव्हता, अशांसोबत महात्मा गांधी यांनी अहिंसेला शस्त्र बनवून लढा दिला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.  महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात ‘गांधी का दर्शन : वैश्विक साम्प्रदायिकता का समाधान’ या विषयावर आयोजित संगोष्ठित ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सत्य आचरणात आणणे सहज सोपे नाहीच; पण काहींनी ते आपल्या आचरणात आणल्याचे वास्तव आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात सत्य आणि अहिंसेचे महत्त्व ओळखून सत्य आचरणात आणले. ज्या इंग्रज सत्तेचा सूर्यास्त होत नव्हता, अशांसोबत महात्मा गांधी यांनी अहिंसेला शस्त्र बनवून लढा दिला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात ‘गांधी का दर्शन : वैश्विक साम्प्रदायिकता का समाधान’ या विषयावर आयोजित संगोष्ठित ते बोलत होते. व्यासपीठावर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे कुलपती प्रो. रजनीशकुमार शुक्ल, कुलसचिव कादर नवाज खान, नितीश भारद्वाज, कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाचे कुलपती श्रीनिवास वरखेडी यांची उपस्थिती होती. राज्यपाल पुढे म्हणाले, मानवी जीवनाचा प्रत्येक विषय गांधींच्या विचाराने प्रभावित होतो. गांधी विचारांमध्ये गीता, बुद्ध, नानक, रामदास यांचे दर्शन होते. आत्मकथेत अनेक व्यक्ती आपल्या कमजोरी लपवितात; पण बापूंनी आपल्या कमजोरी लपविलेल्या नाहीत. संस्कार आणि भाषेला गांधींनी महत्त्व देत देशाला एकत्र आणण्यासाठी हिंदी भाषेचा वापर केला. गांधींकडे दूरदृष्टी होती. त्यांचे विचार आत्मसात करून देशालाच नव्हे, तर जगालाही प्रगती साधता येत असल्याचे यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट केले.नितेश भारद्वाज यांनी सध्या व्यवसायप्रधान शिक्षण दिले जात आहे; पण आज आत्मविश्वासी मानव निर्मितीच्या शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. अमृतमहोत्सवी वर्षात आपण दिशा निश्चित केल्यास पुढील २५ वर्षांमध्ये भारताचा आणखी विकास होईल. शिवाय भारत विश्वगुरू होईल, असेही स्पष्ट केले. महर्षी, देवर्षी व राजर्षी, असे तीन द्रष्टे आहेत; पण महात्मा गांधी यांनी महात्मा हा नवा द्रष्टा रचला. सत्याची अनेक मुखे असून, महात्मा गांधी हे सत्याचे उपासक होते, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे कुलपती रजनीशकुमार शुक्ल यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कुलसचिव कादर नवाज खान यांनी मानले. 

गांधी हिल्सवर राज्यपालांनी केले दीप प्रज्वलित - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय परिसरातील गांधी हिल्स येथे दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाचा शुभारंभ केला. यावेळी हिंदी विश्व विद्यापीठातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी