शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

पूल खचला, दोन गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 22:34 IST

तालुक्यातील सुकळी-दौलतपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. मात्र, कायम दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देवहिवाटीचा प्रश्न बिकट : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील सुकळी-दौलतपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. मात्र, कायम दुर्लक्ष केले जात आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.यावर्षीच्या जोरदार पावसामुळे पुलाचा भाग खचल्याने सुकळी -दौलतपूर या दोन गावांतील वहिवाट पूर्णत: ठप्प झाली आहे. यात शेतकऱ्यांसह विद्यार्थी, वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.मागीलवर्षी जुलै महिन्यात पावसामुळे याच पुलाचा काही भाग खचला होता. मात्र, या पुलाची डागडुजी करण्याकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले. परिणामी, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाल्याला पूर आला आणि पुलाजवळील रस्त्याचा काही भाग पुन्हा जास्त खचत वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांसह वाहनधारकांना वहिवाट कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.सुकळी गावाजवळून जाणाºया या नाल्याला पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरून पाणी येत असल्याने थोडा जरी पाऊस आला तरी या नाल्याचे पाणी रस्त्याच्या दुतर्फा वरून वाहते. या नाल्यावर सिमेंटच्या पायल्या टाकून थातूरमातूर पुलाचे बांधकाम करण्यात आले; पण त्याचे प्राकलन अद्यापही तयार करण्यात आले नाही. नाल्यावर पलिाचे बांधकाम झाल्यानंतर मागील वर्षीच्या जुलै महिन्यातील पावसाने पुलाचा काही भाग व पुलाच्या जवळील रस्त्याचा काही भाग पावसाच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे भर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. दरम्यानच्या काळात अनेक लहाने-मोठे अपघातसुद्धा झाले. या वर्षी आलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली असून वाहन काढणे कठीण झाले आहे. तसेच चारचाकी वाहन जात नसल्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांचा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलाची तत्काळ पक्की डागडुजी करून मार्ग पूर्ववत करावा व पावसाळा संपताच पुलाचे नवीन बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.लोकप्रतिनिधींची उदासीन भूमिकापुराच्या पाण्यामुळे पुलासह रस्त्याचा काही भाग वाहून गेला. यामुळे वहिवाट बिकट झाली आहे. सध्या शेतीचा हंगाम आहे. यातच ही समस्या निर्माण झाल्याने शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे व्यथा मांडली. मात्र, काहीही हालचाली होताना दिसून येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक