शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पूल खचला, दोन गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 22:34 IST

तालुक्यातील सुकळी-दौलतपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. मात्र, कायम दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देवहिवाटीचा प्रश्न बिकट : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील सुकळी-दौलतपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. मात्र, कायम दुर्लक्ष केले जात आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.यावर्षीच्या जोरदार पावसामुळे पुलाचा भाग खचल्याने सुकळी -दौलतपूर या दोन गावांतील वहिवाट पूर्णत: ठप्प झाली आहे. यात शेतकऱ्यांसह विद्यार्थी, वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.मागीलवर्षी जुलै महिन्यात पावसामुळे याच पुलाचा काही भाग खचला होता. मात्र, या पुलाची डागडुजी करण्याकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले. परिणामी, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाल्याला पूर आला आणि पुलाजवळील रस्त्याचा काही भाग पुन्हा जास्त खचत वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांसह वाहनधारकांना वहिवाट कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.सुकळी गावाजवळून जाणाºया या नाल्याला पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरून पाणी येत असल्याने थोडा जरी पाऊस आला तरी या नाल्याचे पाणी रस्त्याच्या दुतर्फा वरून वाहते. या नाल्यावर सिमेंटच्या पायल्या टाकून थातूरमातूर पुलाचे बांधकाम करण्यात आले; पण त्याचे प्राकलन अद्यापही तयार करण्यात आले नाही. नाल्यावर पलिाचे बांधकाम झाल्यानंतर मागील वर्षीच्या जुलै महिन्यातील पावसाने पुलाचा काही भाग व पुलाच्या जवळील रस्त्याचा काही भाग पावसाच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे भर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. दरम्यानच्या काळात अनेक लहाने-मोठे अपघातसुद्धा झाले. या वर्षी आलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली असून वाहन काढणे कठीण झाले आहे. तसेच चारचाकी वाहन जात नसल्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांचा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलाची तत्काळ पक्की डागडुजी करून मार्ग पूर्ववत करावा व पावसाळा संपताच पुलाचे नवीन बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.लोकप्रतिनिधींची उदासीन भूमिकापुराच्या पाण्यामुळे पुलासह रस्त्याचा काही भाग वाहून गेला. यामुळे वहिवाट बिकट झाली आहे. सध्या शेतीचा हंगाम आहे. यातच ही समस्या निर्माण झाल्याने शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे व्यथा मांडली. मात्र, काहीही हालचाली होताना दिसून येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक