शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

रस्त्यांचा मोकळा श्वास

By admin | Updated: January 22, 2016 02:57 IST

शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. बुधवारी बजाज चौक ते शास्त्री चौक परिसरातील

वर्धा : शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. बुधवारी बजाज चौक ते शास्त्री चौक परिसरातील अतिक्रमण काढले तर गुरूवारी आर्वी नाका परिसरात मोहीम राबविण्यात आली. जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आलेले अतिक्रमण काढण्यात आले. शिवाय नाल्यांवर टाकलेले पक्के रपटे तोडून जमीन खणून काढण्यात आल्याने रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला.शहरातील मुख्य मार्गांवर सर्वत्र अतिक्रमण बोकाळले आहे. यात रस्त्यापर्यंत हातगाड्या लावून फळ, भाजी व अन्य वस्तूची विक्री केली जाते. यातच ग्राहकांचीही गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. आर्वी नाका परिसरात तर सायंकाळी वाहने काढणेही जिकरीचेच झाले आहे. पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरूवारी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या उपस्थितीत आर्वी नाका परिसरातील अतिक्रमण काढले. यात नाल्यांवरील रपटे जेसीबीच्या साह्याने उकरून काढण्यात आले. शिवाय ते फोडून जमीनही खणून काढण्यात आली. आर्वी नाका ते न.प. हद्दीपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.आर्वी नाका परिसरार वडार झोपडपट्टी परिसरात दोन्ही बाजूला असलेल्या नाल्यांवर अतिक्रमण झाले होते. यामुळे त्या दिसत नव्हत्या. गुरूवारी अतिक्रमण हटविण्यात आल्याने तेथे नाल्या असल्याचे दिसून आले. यानंतर रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटविताना दुकाने, दवाखाने आदींचे फलकही काढून टाकण्यात आले. याप्रसंगी लाकूड व्यावसायिक महाकाळकर यांच्याकडून पालिकेच्यावतीने दोन हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. शिवाय अनेक व्यावसायिकांनी रस्त्यापर्यंत केलेले सिमेंट काँक्रीटचे बांधकाम तोडण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव केला जात असल्याचा आरोप गुरूवारीही आर्वी नाका परिसरात केला जात होता. अचानक आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नागरिकांतून रोष व्यक्त होत होता. नाल्यांवरील रपटे काढून त्या उघड्या केल्याने पुन्हा अतिक्रमण होणार नाही, अशी अपेक्षा पथकाने व्यक्त केली. गुरूवारी नगर अभियंता सुधीर फरसोले, आरोग्य निरीक्षक रवींद्र टप्पे, लिलाधर निखाडे, लोहवे, चहांदे, सोमवंशी, कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. ही मोहीम पूढे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)खोदकामामुळे नागरिकांत संताप४नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाद्वारे बजाज चौक व आर्वी नाका परिसरातील अतिक्रमण काढतानाच तेथील परिसर खणून काढला जात आहे. यामुळे नाल्या उघड्या पडत असून नागरिकांच्या अडचणीत भर पडणार असल्याच्या प्रतिक्रीया उमटत होत्या. आर्वी नाक्यावरील नाल्यांवर असलेले रपटेही तोडण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला; पण पोलीस बंदोबस्त असल्याने कारवाई शांततेत पार पडली. कारवाईत भेदभाव होऊ नये, अशा प्रतिक्रीयाही नागरिकांकडून व्यक्त केल्या जात होत्या. भेदभाव होत असल्याचा आरोप४शहरात बुधवारी बजाज चौक परिसरात तर गुरूवारी आर्वी नाका परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात भेदभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. आर्वी नाक्यावरील एका गॅरेजचे तर रेल्वे स्थानक परिसरातील एक बुकस्टॉल कारवाईतून वगळण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दंडात्मक व जप्तीची कारवाई४शहरातील अतिक्रमण वारंवार काढले जाते आणि व्यावसायिक पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करूनच व्यवसाय करतात. यामुळे आता पालिकेने पथकाची निर्मिती करीत अतिक्रमणावर ‘वॉच’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुन्हा अतिक्रमणाचा प्रयत्न झाल्यास जप्ती व दंडात्मक कारवाई होणार आहे.