शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

रस्ता दुभाजक १३ ठिकाणी ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:38 IST

शहरातील मुख्य मार्गाची निर्मिती तत्कालीन आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या कार्यकाळात झाली. रस्ता निर्मितीप्रसंगी रस्ता दुभाजक सलग करण्यात आले होते;...

ठळक मुद्देमुख्य मार्गाची व्यथा : कुठूनही वळणाऱ्या वाहनांमुळे अपघातांत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील मुख्य मार्गाची निर्मिती तत्कालीन आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या कार्यकाळात झाली. रस्ता निर्मितीप्रसंगी रस्ता दुभाजक सलग करण्यात आले होते; पण कालांतराने एक-दीड किमीचे रस्ता दुभाजक तब्बल १३ ठिकाणी ‘ब्रेक’ करण्यात आले. परिणामी, दुभाजकांतील ‘गॅप’ अपघातांचे कारण ठरत आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत रस्ता दुभाजक जोडणे गरजेचे आहे.शहराचे सौंदर्य वाढावे, वाहतूक सुरळीत व्हावी, कुठूनही बेशिस्तपणे वळणारी वाहने थांबावी म्हणून रस्ता दुभाजकांची निर्मिती केली जाते. वर्धा शहरातील बजाज चौक ते शिवाजी महाराज पुतळा या रस्त्यावरही चार-पाच ठिकाणी छेद देत दुभाजकाची निर्मिती करण्यात आली होती; पण कालांतराने मागणीप्रमाणे रस्ता दुभाजकांना छेद देण्यात आले. यामुळे केवळ एक ते दीड किमीच्या रस्त्यावर दुभाजकाचे तब्बल १३ तुकडे झाले आहेत. प्रत्येक गल्ली-बोळासाठी रस्ता दुभाजक तोडण्यात आल्याने बेशिस्त वाहतूक वाढली आहे. वाहने कुठूनही, कशीही वळविली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बजाज चौक ते शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर सर्वाधिक अपघात निर्मल बेकरी चौक, ठाकरे मार्केट तथा शिवाजी चौकात होतात. या तीनही ठिकाणी दुभाजकांमध्ये मोठी गॅप निर्माण झाली आहे. ठाकरे मार्केट परिसरात दिवसभरात तीन ते चार लहान-मोठे अपघात दररोज होतात. काही वर्षांपूर्वी याच चौकात एका बालकाला प्राणास मुकावे लागले होते.मंगळवारी देखील एका दुचाकी चालक युवतीला वाचविण्याच्या प्रयत्नात चार चाकी वाहन दुभाजकाला धडकले. सुदैवाने युवती बचावली; पण चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. शहरातील मुख्य मार्गावर असे अपघात नित्याचे झाले आहेत. शिवाजी महाराज चौकातही दोन दुभाजकांमध्ये बरेच मोठे अंतर झाले आहे. वास्तविक, रस्ता निर्मितीप्रसंगी एवढे अंतर ठेवण्यात आले नव्हते. तत्कालीन अभियंत्यांनी नियोजनपूर्वक रस्ता व दुभाजकांचे बांधकाम केले होते; पण त्यानंतर मागणीनुसार अनेक ठिकाणचे रस्ता दुभाजक तोडण्यात आले. आता रहदारी वाढल्याने हा प्रकार जीवावर बेतणारा ठरू लागला आहे.रस्ता दुभाजकांतील अंतर कमी करण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून प्रयत्न केले जातात; पण त्यांच्या बॅरिकेटस्ला वाहन चालक जुमानत नसल्याचे निर्मल बेकरी चौकात दिसून येते. यामुळे बांधकाम विभागानेच दुभाजकांची पाहणी करीत त्यातील अंतर कमी करणे तथा संख्या कमी करणे गरजेचे झाले आहे.दुचाकी चालक युवती थोडक्यात बचावलीदुभाजकांतील अधिक अंतरामुळे ते अपघातांना कारण ठरत आहे. ठाकरे मार्केटसमोरील दुभाजकांमध्ये मोठे अंतर ठेवण्यात आले आहे. यामुळे येथे दररोजच अपघात होतात. मंगळवारी एक दुचाकी चालक युवती वाहने न पाहताच वळण्याचा प्रयत्न करीत होती. दरम्यान, समोरून येणाºया चार चाकी वाहन चालकाने करकचून बे्रक लावल्याने ती बचावली; पण यात चार चाकी वाहन दुभाजकाला धडकल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले.मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकांमध्ये अधिक अंतर असून अनेक ठिकाणी ते ब्रेक करण्यात आले आहे. ही बाब अपघाताला कारणीभूत ठरत आहे. याबाबत बांधकाम विभागाकडे प्रस्ताव ठेवणार असून प्रसंगी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.मुख्य रस्त्यावरील दुभाजकांची पाहणी करण्यात येईल. यानंतर योग्य कार्यवाही प्रस्तावित केली जाईल. यासाठी स्वत: प्रयत्न करतो.- शरद चौधरी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.बजाज चौक ते शिवाजी चौक हा मुख्य रस्ता असून दुभाजकांतील अंतर व कट अधिक असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येतात. निर्मल बेकरी चौकात बॅरिकेटस् लावलेत; पण इतर ठिकाणही दुभाजकांतील अंतर अधिक असल्याने अपघात होतात. हे टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत तत्सम प्रस्ताव मांडणार आहे. या मार्गावर अधिकाधिक चार ते पाच कट असणे अपेक्षित आहे.- दत्तात्रय गुरव, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, वर्धा.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा