शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

पार्सल सेवेला उत्पन्नाचा ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:42 IST

थील रेल्वे स्थानकात रेल्वे विभागाच्यावतीने कार्यरत असलेली पार्सल सेवा मागील पाच वर्षांपूर्वी कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण काढून बंद करण्यात आली. या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवर्धा रेल्वे स्थानकातील प्रकार : वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील रेल्वे स्थानकात रेल्वे विभागाच्यावतीने कार्यरत असलेली पार्सल सेवा मागील पाच वर्षांपूर्वी कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण काढून बंद करण्यात आली. या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे रेल्वे विभागाने याकडे लक्ष देत ती सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.रेल्वे जाळ्यानुसार विचार केल्यास वर्धा येथील सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून देशाच्या चारही बाजूला रेल्वे जाणे शक्य आहे. तसे होतही आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे २५० कि़मी.चे लोहमार्गचे जाळे आहे. हे लोहमार्गचे जाळे जिल्ह्यातील प्रवाशांसह जिल्ह्याबाहेरील नागरिकांसाठी फायद्याचेच आहे. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा येथे देश-विदेशातील पर्यटक गांधी-विनोबांच्या कार्याची माहिती त्यांचे विचार आत्मसात करण्याकरिता येतात; परंतु, वर्धा जंगशनवर रेल्वे विभागाकडून पार्सल सुविधाच नसल्याने अनेकांचा हिरमोड होत असल्याचे दिसून आले. पार्सल सेवा बंद असली तरी लगेज सेवा सुरू असल्याचे रेल्वे विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. पार्सल सेवेचा लाभ घेताना साहित्यासोबत सदर व्यक्तीला जाणे क्रमप्राप्त नसते. मात्र, लगेज सेवेचा लाभ घेताना साहित्यासोबत व्यक्तीला जाणे अनिवार्य असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले. बंद करण्यात आलेल्या वर्धा रेल्वे स्थानकावरील पार्सल सेवा नागरिकांसाठी तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी आहे.पार्सलचे कर्मचारी इतर कामात व्यस्तज्या कालावधीत वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे विभागाची पार्सल सेवा सुरू होती. त्यावेळी या विभागात अनेक कर्मचारी कार्यरत होते. ही सेवा बंद झाल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी न करता रेल्वेच्या इतर विभागात सुरू असलेल्या कामाकरिता वळते केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.दोन मिनिटांचा थांबा ठरतोय अडचणीचावर्धा रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो रेल्वे गाड्या ये-जा करीत असल्या तरी बहूतांश रेल्वे गाड्यांचा थांबा हा दोन मिनिटांचाच आहे. नागरिकांचे पार्सल रेल्वे गाडीत चढविणे व उतरविणे यासाठी किमान पाच मिनिटांचा थांबा आवश्यक असल्याचे रेल्वेच्या कर्मचाºयांनी सांगितले. वर्धा रेल्वे स्थानकात पार्सल सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करावे, वर्धेकरांची अपेक्षा आहे.रेल्वे विभागाची पार्सल सेवा सुमारे पाच वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानकावर सुरू होती. आता लगेज सुविधा नागरिकांना देण्यात येत आहे. रेल्वे विभागाला यातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने ही पार्सल सेवा बंद करण्यात आली असावी.- एस. के. झा, उप स्टेशन प्रबंधक, वर्धा रेल्वे स्थानक.