शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

कृपलानीचे अतिक्रमण तोडा; अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:23 IST

पालिकेची कोणतीही परवानगी न घेता नागपूर मार्गावर कृपलानी यांनी अवैधरित्या हॉटेलचे बांधकाम करीत अतिक्रमण केले आहे. यावर कारवाई करण्यासंदर्भात नगरपालिकेला डझनभर पत्र देण्यात आले. परंतू कारवाईकडे कानाडोळा होत असल्याने येत्या सात दिवसांत कृपलाणीचे अतिक्रमण तोडावे .......

ठळक मुद्देशिवा संघटनेची मागणी : पालिकेला दिला सात दिवसांचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पालिकेची कोणतीही परवानगी न घेता नागपूर मार्गावर कृपलानी यांनी अवैधरित्या हॉटेलचे बांधकाम करीत अतिक्रमण केले आहे. यावर कारवाई करण्यासंदर्भात नगरपालिकेला डझनभर पत्र देण्यात आले. परंतू कारवाईकडे कानाडोळा होत असल्याने येत्या सात दिवसांत कृपलाणीचे अतिक्रमण तोडावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे शहर कार्यालयीन मंत्री सुरेश पट्टेवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी यांनी पालिकेची कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या इमारतच नाही तर हॉटेलचीही निर्मिती केली. कृपलानीच्या या अतिक्रमीत इमारतीमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने व्युमेन्स ऐज्युकेशन सोसायटीतील सर्व विद्यार्थ्यांसह पालकांनी पालिकेकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली. तसेच अ‍ॅड. रविंद्र गुुरु यांनी जिल्हाधिकारी प्रशासन व नगरपालिकेला ८० सेक्शन अन्वये व ३०४ सेक्शन अन्वये दोन वेळा नोटीस दिली.सोबतच सुरेश पट्टेवार यांनीही १६ नोव्हेंबरपासून या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी करीत आहे. परंतू नगरपालिका प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही. कृपलानीच्या या अतिक्रमीत इमारतीमुळे केसरीमल शाळेतील अडीच हजार विद्यार्थिनींच्या जिवाला धोका असून तात्काळ हे अतिक्रमण पाडावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुरेश पट्टेवार यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाºयांसह जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हशहरातील मार्केट परिसरातील सर्वसामान्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करणाºया मुख्याधिकारी धनदांडग्या कृपलाणीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. १० जानेवारीच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्याधिकारी आता मौन पाळून आहे. शहरात दबंग अधिकारी म्हणून मुख्याधिकाऱ्यांची ओळख असतानाही ८२ दिवस लोटूनही कारवाई झाली नसल्याने ही दंबगगिरी कशामुळे शांत झाली असा प्रश्न उपस्थित केला आहे. नगररचनाकार नेरकर यांची अचानक सातारा येथे बदली करण्यात आली. त्या पाठोपाठ मुख्याधिकाऱ्यांची बदली होणार का? असे अनेक प्रश्न पट्टेवार यांनी निवेदनातून विचारले आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलनाउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळेच्या समोर १०० मीटर परिसरात शांतता झोन असल्याने तेथे व्यावसायिक वापर करता येत नाही. परंतु कृपलाणी यांनी शाळेसमोरच मोठे हॉटेले विनापरवानगी उभारुन न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली आहे. तसेच नगरपालिकेने कारवाई करण्याची गरज असताना पालिकाही दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करण्याकरिता पालिकाही सहकार्य करीत असल्याचे दिसून येते, असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण