शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

पवनारातील ‘ब्रह्म विद्या मंदिर’ स्त्री सक्षमीकरणाचे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले. इंग्रजा विषयी बापूंच्या विचार व मतांवर विनोबा प्रभावित होऊन दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर सेवाग्राम आश्रम त्यांच्यासाठी मातृस्थान बणले.

ठळक मुद्देदिनविशेष : भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची आज १२५ वी जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार/सेवाग्राम : भूदान चळवळीचे प्रणेते, स्वातंत्र लढ्यातील पहिले सत्याग्रही तसेच महान विचारांचे क्रांतीदूत आचार्य विनोबा भावे यांनी ‘जय जगत’ चा नारा देत पवनार गाठले. येथील धामनदीच्या तीरावर परमधाम आश्रमाची निर्मिती करुन ‘ब्रम्ह विद्या मंदिर’ स्थापन केले. या मंदिरातून स्त्री सक्षमीकरणाकरिता पाऊले उचलण्यात आली असून त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले. आजही त्यांचे हे कार्य अविरत सुरु असल्याने हे मंदिर महिला सक्षमीकरणाचे विद्यापीठच ठरले आहे.महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले. इंग्रजा विषयी बापूंच्या विचार व मतांवर विनोबा प्रभावित होऊन दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर सेवाग्राम आश्रम त्यांच्यासाठी मातृस्थान बणले. बापूंनीच त्यांचे नाव विनोबा असे ठेवून १९२१ मध्ये आश्रमातील संचालनाची जबाबदारी सोपविली.तेव्हापासून विनोबांनी शिक्षण, ग्रामोद्योग, कुष्ठसेवा, चर्मोद्योग, भंगीकाम, सूतकताई, बुनाई, अध्ययनासह रचनात्मक कार्यात अनेक प्रयोग केले. त्यांची साहित्य निर्मितीही मोठी आहे. १९३०-१९३१ मध्ये गीताई गीताचा मराठीत अनुवाद करुन घराघरात गीताई पोहोचवली. १९३८ मध्ये ते पवनारला वास्तव्यास आले. याच ठिकाणी त्यांनी कांचनमुक्तीचा प्रयोग यशस्वी केला. महिलांसाठी १९५९ मध्ये ब्रम्हविद्या मंदिरची स्थापना केली.जगात स्त्रियांचे शोषण आणि उपेक्षितांचे जीवन कायम असल्याने त्यांच्या समस्येच्या निराकरणासाठी या मंदिरातून प्रयत्न सुरु केलेत. भूदान चळवळ विनोबांच्या जीवनातील महत्वपूर्ण ठरली. १९५१ मध्ये तेलंगणा मधील पोचमपल्ली गावात दलीतांसाठी कसायला जमिन मागितली असता एका व्यक्तीने शंभर एकर जमीन दानात दिली.याच घटनेने भूदान चळवळीचा पाया घातल्या गेला.६५ हजार किमीची पदयात्रा करुन ४२ लाख एकर जमीन मिळविली. या जमीनीचे भूमिहीनांना वाटप करून स्वालंबनाचा मार्ग दाखविला. अशा या महात्म्याची शुक्रवारी १२५ जयंती कोरोनायनामुळे साध्यापद्धतीने साजरी होणार आहे.आश्रमात सामूहिक निर्णयाला महत्त्वसध्या २५ स्त्रिया आणि २ पुरूष आश्रमात आहे. कुणीही प्रमुख नसून सर्व मिळून काम करतात. सामूहिक निर्णयाला महत्त्व दिल्या जाते. आश्रमात तीनतास शारीरिक व तीनतास मानसिक श्रम केल्या जाते. जीवन जगण्यासाठी जेवढ्या पैशाची गरज असते, तेवढे श्रम केले पाहिजे. सर्वांना समान मजूरी मिळाली पाहिजे. आश्रमात २५ मार्च हा स्थापना दिवस, विनोबांजींची जयंती मित्र मिलन आणि १५ नोव्हेंबर निर्वाण दिन आदी कार्यक्रम गावकऱ्यांकडून आयोजित केले जाते. आश्रमात दिवाळीला सप्ताहाचे आयोजन करुन शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. पण कोरोना प्रादुभार्वामुळे यावर्षी कार्यक्रमावर बंधने असल्याचे मत कांचन बहन यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PavnarपवनारVinoba Bhaveविनोबा भावे