शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

पवनारातील ‘ब्रह्म विद्या मंदिर’ स्त्री सक्षमीकरणाचे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले. इंग्रजा विषयी बापूंच्या विचार व मतांवर विनोबा प्रभावित होऊन दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर सेवाग्राम आश्रम त्यांच्यासाठी मातृस्थान बणले.

ठळक मुद्देदिनविशेष : भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची आज १२५ वी जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार/सेवाग्राम : भूदान चळवळीचे प्रणेते, स्वातंत्र लढ्यातील पहिले सत्याग्रही तसेच महान विचारांचे क्रांतीदूत आचार्य विनोबा भावे यांनी ‘जय जगत’ चा नारा देत पवनार गाठले. येथील धामनदीच्या तीरावर परमधाम आश्रमाची निर्मिती करुन ‘ब्रम्ह विद्या मंदिर’ स्थापन केले. या मंदिरातून स्त्री सक्षमीकरणाकरिता पाऊले उचलण्यात आली असून त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले. आजही त्यांचे हे कार्य अविरत सुरु असल्याने हे मंदिर महिला सक्षमीकरणाचे विद्यापीठच ठरले आहे.महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले. इंग्रजा विषयी बापूंच्या विचार व मतांवर विनोबा प्रभावित होऊन दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर सेवाग्राम आश्रम त्यांच्यासाठी मातृस्थान बणले. बापूंनीच त्यांचे नाव विनोबा असे ठेवून १९२१ मध्ये आश्रमातील संचालनाची जबाबदारी सोपविली.तेव्हापासून विनोबांनी शिक्षण, ग्रामोद्योग, कुष्ठसेवा, चर्मोद्योग, भंगीकाम, सूतकताई, बुनाई, अध्ययनासह रचनात्मक कार्यात अनेक प्रयोग केले. त्यांची साहित्य निर्मितीही मोठी आहे. १९३०-१९३१ मध्ये गीताई गीताचा मराठीत अनुवाद करुन घराघरात गीताई पोहोचवली. १९३८ मध्ये ते पवनारला वास्तव्यास आले. याच ठिकाणी त्यांनी कांचनमुक्तीचा प्रयोग यशस्वी केला. महिलांसाठी १९५९ मध्ये ब्रम्हविद्या मंदिरची स्थापना केली.जगात स्त्रियांचे शोषण आणि उपेक्षितांचे जीवन कायम असल्याने त्यांच्या समस्येच्या निराकरणासाठी या मंदिरातून प्रयत्न सुरु केलेत. भूदान चळवळ विनोबांच्या जीवनातील महत्वपूर्ण ठरली. १९५१ मध्ये तेलंगणा मधील पोचमपल्ली गावात दलीतांसाठी कसायला जमिन मागितली असता एका व्यक्तीने शंभर एकर जमीन दानात दिली.याच घटनेने भूदान चळवळीचा पाया घातल्या गेला.६५ हजार किमीची पदयात्रा करुन ४२ लाख एकर जमीन मिळविली. या जमीनीचे भूमिहीनांना वाटप करून स्वालंबनाचा मार्ग दाखविला. अशा या महात्म्याची शुक्रवारी १२५ जयंती कोरोनायनामुळे साध्यापद्धतीने साजरी होणार आहे.आश्रमात सामूहिक निर्णयाला महत्त्वसध्या २५ स्त्रिया आणि २ पुरूष आश्रमात आहे. कुणीही प्रमुख नसून सर्व मिळून काम करतात. सामूहिक निर्णयाला महत्त्व दिल्या जाते. आश्रमात तीनतास शारीरिक व तीनतास मानसिक श्रम केल्या जाते. जीवन जगण्यासाठी जेवढ्या पैशाची गरज असते, तेवढे श्रम केले पाहिजे. सर्वांना समान मजूरी मिळाली पाहिजे. आश्रमात २५ मार्च हा स्थापना दिवस, विनोबांजींची जयंती मित्र मिलन आणि १५ नोव्हेंबर निर्वाण दिन आदी कार्यक्रम गावकऱ्यांकडून आयोजित केले जाते. आश्रमात दिवाळीला सप्ताहाचे आयोजन करुन शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. पण कोरोना प्रादुभार्वामुळे यावर्षी कार्यक्रमावर बंधने असल्याचे मत कांचन बहन यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PavnarपवनारVinoba Bhaveविनोबा भावे