शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

लोकसंख्या नोंदवहीच्या कामांवर बहिष्कार

By admin | Updated: October 10, 2015 02:36 IST

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिक्षक संघटना एकवटल्या वर्धा : जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिक्षक कामात हयगय करतात असा आरोप करण्यात येत आहे. वास्तविकतेत मात्र शिक्षकावर अतिरिक्त कामांचा भार लादल्या जात आहे. याकडे साऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच शिक्षकांवर सोपविलेल्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या कामाला जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांकडून विरोध नोंदविण्यात येत आहे. या बहिष्काराकरिता जिल्ह्यातील आठ शिक्षक संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यायावत करून त्यात प्रत्येक नागरिकाचा आधार क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून डाटाबेस करीता माहिती तयार करावयाची आहे. सोबतच २०११ मध्ये जनगणनेच्या वेळी नोंदविलेल्या यादीतील स्थालंतरीत वा निधन झालेल्या व्यक्तींची नावे वगळे व नवीन आलेल्या किंवा जन्म झालेल्या व्यक्तीची नावे जोडावयाची आहे. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक शिक्षकाकडे एक हजारापेक्षा अधिक व्यक्तींची माहिती तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील एकापेक्षा अधिक शिक्षकांचे आदेश काढले असून सदर काम एक महिन्यात पूर्ण करायचे आहे. यामुळे शिक्षकांचे अध्यापनाच्या कार्याकडे दुर्लक्ष होणार आहे.