शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

जिल्ह्यात बोंडअळीचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:43 IST

जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही.

ठळक मुद्देकृषी अधीक्षकांना साकडे : उपाययोजनेची प्रहारची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही. कपाशी उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ योग्य पावले उचलावी शिवाय नुकसानग्रस्त शेतकºयांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येते. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. यंदाच्या वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनातही मोठी घट येण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.पूर्वीच जिल्ह्यातील शेतकरी विविध संकटांमुळे हवालदिल झाला आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने आर्थिक मदत मिळून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे, राजेंद्र लढी, अरविंद मसराम, आदित्य कोकडवार, किशोर हेमने, वैभव चतुरकर, सागर हिवरे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनबोंडअळी हे सध्या जिल्ह्यातील कपाशी उत्पादकांवर ओढावलेले मोठे संकट आहे. त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. हवालदिल झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या शिवाय निवेदनातील मागण्यांवर येत्या दहा दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी प्रहारने केली आहे. मागण्यांचा विचार न झाल्यास प्रहारच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :cottonकापूस