शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

रामकृष्ण हरी...च्या जयघोषाने बोरतीर्थ दुमदुमले

By admin | Updated: February 10, 2016 02:32 IST

टाळ मृदुंगांचा निनाद, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडी पालखी सोहळा थाटात पार पडला.

फुलला भक्तांचा मळा : संत केजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा; आज काल्याचे कीर्तनघोराड : टाळ मृदुंगांचा निनाद, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडी पालखी सोहळा थाटात पार पडला. वारकऱ्यांच्या गर्दीने व रामकृष्ण हरीच्या जयघोषाने अख्खे बोरतीर्थ दुमदुमून गेले होते. बोर नदीच्या तीरावर वसलेल्या व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे संत केजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मंगळवारी दिंडी पालखी सोहळा पार पडला. या दिंडीत २५० पेक्षा अधिक भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. संत केजाजी महाराजांनी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी २० हजार पेक्षा जास्त भाविक घोराडमध्ये दाखल झाले होते. सकाळपासूनच घोराडकडे येणारे रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. सकाळी ९ वाजता विठ्ठल रुख्माई मंदिरातून दिंडी पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. प्रत्येक भाविक या दिंडी सोहळ्यात सहभागी होत होता. बोरतीरावरून निघालेली दिंडीमध्ये हरिनामाचा गजर करीत पुढे जात असताना चंद्रभागेच्या तिरावर असल्याचा भास होत होता. दिंडी सोहळा हा आळंदी ते पंढरपूरची पायदळ वारीची आठवण करून देत असल्याचे भाविक सांगत होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा पालखी सोहळा सुरू होता. केजाजी महाराजांची पालखी फुलांच्या माळांनी सजविली होती. गावातील रस्ता न रस्ता रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजले होते. दोन किमीचा दिंंडी सोहळाघोराड : दिंडी चालत असताना फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. विणेकऱ्यांचा पाय धवून, कुंकवाचा टिळा लावल्या जात होता. जागोजागी भाविकांचे स्वागत केले जात होते. भाविकांच्या सेवेसाठी घोराड मधील बालकापासून तर वयोवृध्दापर्यंत प्रत्येक नागरिक सेवेत व्यस्त होते. जवळपास दोन कि.मीच्या अंतरात हा दिंडी सोहळा असल्याने ग्रामस्थ व युवा मंडळाच्या मदतीने भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून जागोजागी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विदर्भातून असंख्य भाविक हा सोहळा पाहण्यासाठी आल्याने जणू घोराडमध्ये भक्तांचा मळा फुलला होता. टाळ मृदुगांच्या ठेक्यावर, हरिनामाचा जप करीत १० तास हा दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात भक्तीचा रंग उधळत भाविकांना भक्तीरसाचे अमृतपान देत सायंकाळी ६ वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात पोहचली. ग्रामस्थाच्यावतीने दिंडी सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा २० हजार भाविकांनी लाभ घेतला. या महाप्रसादाकरिता गावातूनच गोळा करण्यात येत असलेल्या लोकसहभागातील निधीचा वापर करण्यात येत आहे.(वार्ताहर)