शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रामकृष्ण हरी...च्या जयघोषाने बोरतीर्थ दुमदुमले

By admin | Updated: February 10, 2016 02:32 IST

टाळ मृदुंगांचा निनाद, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडी पालखी सोहळा थाटात पार पडला.

फुलला भक्तांचा मळा : संत केजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा; आज काल्याचे कीर्तनघोराड : टाळ मृदुंगांचा निनाद, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडी पालखी सोहळा थाटात पार पडला. वारकऱ्यांच्या गर्दीने व रामकृष्ण हरीच्या जयघोषाने अख्खे बोरतीर्थ दुमदुमून गेले होते. बोर नदीच्या तीरावर वसलेल्या व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे संत केजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मंगळवारी दिंडी पालखी सोहळा पार पडला. या दिंडीत २५० पेक्षा अधिक भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. संत केजाजी महाराजांनी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी २० हजार पेक्षा जास्त भाविक घोराडमध्ये दाखल झाले होते. सकाळपासूनच घोराडकडे येणारे रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. सकाळी ९ वाजता विठ्ठल रुख्माई मंदिरातून दिंडी पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. प्रत्येक भाविक या दिंडी सोहळ्यात सहभागी होत होता. बोरतीरावरून निघालेली दिंडीमध्ये हरिनामाचा गजर करीत पुढे जात असताना चंद्रभागेच्या तिरावर असल्याचा भास होत होता. दिंडी सोहळा हा आळंदी ते पंढरपूरची पायदळ वारीची आठवण करून देत असल्याचे भाविक सांगत होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा पालखी सोहळा सुरू होता. केजाजी महाराजांची पालखी फुलांच्या माळांनी सजविली होती. गावातील रस्ता न रस्ता रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजले होते. दोन किमीचा दिंंडी सोहळाघोराड : दिंडी चालत असताना फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. विणेकऱ्यांचा पाय धवून, कुंकवाचा टिळा लावल्या जात होता. जागोजागी भाविकांचे स्वागत केले जात होते. भाविकांच्या सेवेसाठी घोराड मधील बालकापासून तर वयोवृध्दापर्यंत प्रत्येक नागरिक सेवेत व्यस्त होते. जवळपास दोन कि.मीच्या अंतरात हा दिंडी सोहळा असल्याने ग्रामस्थ व युवा मंडळाच्या मदतीने भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून जागोजागी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विदर्भातून असंख्य भाविक हा सोहळा पाहण्यासाठी आल्याने जणू घोराडमध्ये भक्तांचा मळा फुलला होता. टाळ मृदुगांच्या ठेक्यावर, हरिनामाचा जप करीत १० तास हा दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात भक्तीचा रंग उधळत भाविकांना भक्तीरसाचे अमृतपान देत सायंकाळी ६ वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात पोहचली. ग्रामस्थाच्यावतीने दिंडी सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा २० हजार भाविकांनी लाभ घेतला. या महाप्रसादाकरिता गावातूनच गोळा करण्यात येत असलेल्या लोकसहभागातील निधीचा वापर करण्यात येत आहे.(वार्ताहर)