शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

बोर कालव्याच्या वितरिका ५२ वर्षे जुन्या

By admin | Updated: April 9, 2017 00:20 IST

तालुक्यात हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात ५२ वर्षांपूर्वी बोरधरणच्या माध्यमातून हातभार लागला.

सिंचन प्रभावित : उन्ह्याळ्यातच दुरुस्ती आवश्यक विजय माहुरे   सेलू तालुक्यात हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात ५२ वर्षांपूर्वी बोरधरणच्या माध्यमातून हातभार लागला. या धरणाचा उद्देश कालव्यांच्या बिकट परिस्थितीमुळे अर्धवट राहत असून ५२ वर्षे जुन्या वितरिका, सायपण व पानचऱ्याचे नुतनीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे; पण दुरूस्तीची कामे उन्हाळ्याच्या दिवसांतच करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बोरधरण ते केळझरच्या पूढे जाणारा कालवा हा २० किमीहून अधिक लांबीचा असून एकूण १४ मायनरच्या माध्यमातून २१७ किमी लांबीची वितरिका आहे. या वितरिकांतून ओलीताकरिता शेतात सुरळीत पाणी पोहोचावे यासाठी अनेक पानचऱ्या आहेत; पण ५२ वर्षांत पाटबंधारे विभागाच्यावतीने या वितरिकांची थातूरमातूर दुरुस्ती करून रबी हंगामाला पाणी पुरविण्यात आले आहे. आज या वितरिकांची स्थिती बिकट झाली आहे. यामुळे धरणातून कालव्याला सोडलेल्या पाण्यापैकी ४० टक्के पाणी वाया जात आहे. हा पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून उपाययोजना होत नाही. नादुरुस्त सायपण व गेटमुळे शेतात पाणी घेतना शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून खोलवर खड्ड्यात आडवा बांध लावण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. ठिकठिकाणी कालवे फुटले आहेत. कालव्यात अनेक झाडे झुडपे वाढली आहेत. कालव्याची खोली कमी झाली आहे. या सर्व स्थितीमुळे हरित क्रांतीचे स्वप्न धुसरच झाले आहे. केंद्र ते गाव हा उद्देश ठेवून विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी कोट्यवधीचा निधी आणल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत आहे; पण ५२ वर्षांच्या काळात या प्रकल्पाला नवे स्वरूप देण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ओलीतासाठी शेतापर्यंत सुरळीत पाणी पोहोचण्यासाठी लाखो रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. काही वर्षांपूर्वी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती; पण ती नावापुरती ठरली. रबी हंगामात वितरिकेवर उपस्थित राहणारे कर्मचारी चार ते पाच वर्षांपासूप बेपत्ता झाल्याचे दिसते. परिणामी, काम रामभरोसे सुरू आहे. कर्मचारी नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असून शेताच्या बांधापर्यंत जाणारे पांदण रस्ते जलमय होतात. यामुळे रबी हंगामात शेतकऱ्यांना वहिवाट करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. २० किमी लांब कालवाही कुचकामी बोरधरण प्रकल्पासून केळझरच्या पूढे जाणारा कालवा २० किमीहून अधिक लांबीचा आहे. यात एकूण १४ मायनरच्या माध्यमातून २१७ किमी लांबीची वितरिका आहे. या वितरिकांतून ओलितासाठी शेतात सुरळीत पाणी पोहोचावे यासाठी अनेक पानचऱ्या आहेत; पण पाटबंधारे विभागाद्वारे या वितरिकांची कायम दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी, २० किमीपेक्षा अधिक लांबीचा कालवा व २१७ किमी वितरिकाही कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.