शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बोर कालव्याच्या वितरिका ५२ वर्षे जुन्या

By admin | Updated: April 9, 2017 00:20 IST

तालुक्यात हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात ५२ वर्षांपूर्वी बोरधरणच्या माध्यमातून हातभार लागला.

सिंचन प्रभावित : उन्ह्याळ्यातच दुरुस्ती आवश्यक विजय माहुरे   सेलू तालुक्यात हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात ५२ वर्षांपूर्वी बोरधरणच्या माध्यमातून हातभार लागला. या धरणाचा उद्देश कालव्यांच्या बिकट परिस्थितीमुळे अर्धवट राहत असून ५२ वर्षे जुन्या वितरिका, सायपण व पानचऱ्याचे नुतनीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे; पण दुरूस्तीची कामे उन्हाळ्याच्या दिवसांतच करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बोरधरण ते केळझरच्या पूढे जाणारा कालवा हा २० किमीहून अधिक लांबीचा असून एकूण १४ मायनरच्या माध्यमातून २१७ किमी लांबीची वितरिका आहे. या वितरिकांतून ओलीताकरिता शेतात सुरळीत पाणी पोहोचावे यासाठी अनेक पानचऱ्या आहेत; पण ५२ वर्षांत पाटबंधारे विभागाच्यावतीने या वितरिकांची थातूरमातूर दुरुस्ती करून रबी हंगामाला पाणी पुरविण्यात आले आहे. आज या वितरिकांची स्थिती बिकट झाली आहे. यामुळे धरणातून कालव्याला सोडलेल्या पाण्यापैकी ४० टक्के पाणी वाया जात आहे. हा पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून उपाययोजना होत नाही. नादुरुस्त सायपण व गेटमुळे शेतात पाणी घेतना शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून खोलवर खड्ड्यात आडवा बांध लावण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. ठिकठिकाणी कालवे फुटले आहेत. कालव्यात अनेक झाडे झुडपे वाढली आहेत. कालव्याची खोली कमी झाली आहे. या सर्व स्थितीमुळे हरित क्रांतीचे स्वप्न धुसरच झाले आहे. केंद्र ते गाव हा उद्देश ठेवून विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी कोट्यवधीचा निधी आणल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत आहे; पण ५२ वर्षांच्या काळात या प्रकल्पाला नवे स्वरूप देण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ओलीतासाठी शेतापर्यंत सुरळीत पाणी पोहोचण्यासाठी लाखो रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. काही वर्षांपूर्वी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती; पण ती नावापुरती ठरली. रबी हंगामात वितरिकेवर उपस्थित राहणारे कर्मचारी चार ते पाच वर्षांपासूप बेपत्ता झाल्याचे दिसते. परिणामी, काम रामभरोसे सुरू आहे. कर्मचारी नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असून शेताच्या बांधापर्यंत जाणारे पांदण रस्ते जलमय होतात. यामुळे रबी हंगामात शेतकऱ्यांना वहिवाट करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. २० किमी लांब कालवाही कुचकामी बोरधरण प्रकल्पासून केळझरच्या पूढे जाणारा कालवा २० किमीहून अधिक लांबीचा आहे. यात एकूण १४ मायनरच्या माध्यमातून २१७ किमी लांबीची वितरिका आहे. या वितरिकांतून ओलितासाठी शेतात सुरळीत पाणी पोहोचावे यासाठी अनेक पानचऱ्या आहेत; पण पाटबंधारे विभागाद्वारे या वितरिकांची कायम दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी, २० किमीपेक्षा अधिक लांबीचा कालवा व २१७ किमी वितरिकाही कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.