शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

बोर कालव्याच्या वितरिका ५२ वर्षे जुन्या

By admin | Updated: April 9, 2017 00:20 IST

तालुक्यात हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात ५२ वर्षांपूर्वी बोरधरणच्या माध्यमातून हातभार लागला.

सिंचन प्रभावित : उन्ह्याळ्यातच दुरुस्ती आवश्यक विजय माहुरे   सेलू तालुक्यात हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात ५२ वर्षांपूर्वी बोरधरणच्या माध्यमातून हातभार लागला. या धरणाचा उद्देश कालव्यांच्या बिकट परिस्थितीमुळे अर्धवट राहत असून ५२ वर्षे जुन्या वितरिका, सायपण व पानचऱ्याचे नुतनीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे; पण दुरूस्तीची कामे उन्हाळ्याच्या दिवसांतच करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बोरधरण ते केळझरच्या पूढे जाणारा कालवा हा २० किमीहून अधिक लांबीचा असून एकूण १४ मायनरच्या माध्यमातून २१७ किमी लांबीची वितरिका आहे. या वितरिकांतून ओलीताकरिता शेतात सुरळीत पाणी पोहोचावे यासाठी अनेक पानचऱ्या आहेत; पण ५२ वर्षांत पाटबंधारे विभागाच्यावतीने या वितरिकांची थातूरमातूर दुरुस्ती करून रबी हंगामाला पाणी पुरविण्यात आले आहे. आज या वितरिकांची स्थिती बिकट झाली आहे. यामुळे धरणातून कालव्याला सोडलेल्या पाण्यापैकी ४० टक्के पाणी वाया जात आहे. हा पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून उपाययोजना होत नाही. नादुरुस्त सायपण व गेटमुळे शेतात पाणी घेतना शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून खोलवर खड्ड्यात आडवा बांध लावण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. ठिकठिकाणी कालवे फुटले आहेत. कालव्यात अनेक झाडे झुडपे वाढली आहेत. कालव्याची खोली कमी झाली आहे. या सर्व स्थितीमुळे हरित क्रांतीचे स्वप्न धुसरच झाले आहे. केंद्र ते गाव हा उद्देश ठेवून विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी कोट्यवधीचा निधी आणल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत आहे; पण ५२ वर्षांच्या काळात या प्रकल्पाला नवे स्वरूप देण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ओलीतासाठी शेतापर्यंत सुरळीत पाणी पोहोचण्यासाठी लाखो रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. काही वर्षांपूर्वी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती; पण ती नावापुरती ठरली. रबी हंगामात वितरिकेवर उपस्थित राहणारे कर्मचारी चार ते पाच वर्षांपासूप बेपत्ता झाल्याचे दिसते. परिणामी, काम रामभरोसे सुरू आहे. कर्मचारी नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असून शेताच्या बांधापर्यंत जाणारे पांदण रस्ते जलमय होतात. यामुळे रबी हंगामात शेतकऱ्यांना वहिवाट करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. २० किमी लांब कालवाही कुचकामी बोरधरण प्रकल्पासून केळझरच्या पूढे जाणारा कालवा २० किमीहून अधिक लांबीचा आहे. यात एकूण १४ मायनरच्या माध्यमातून २१७ किमी लांबीची वितरिका आहे. या वितरिकांतून ओलितासाठी शेतात सुरळीत पाणी पोहोचावे यासाठी अनेक पानचऱ्या आहेत; पण पाटबंधारे विभागाद्वारे या वितरिकांची कायम दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी, २० किमीपेक्षा अधिक लांबीचा कालवा व २१७ किमी वितरिकाही कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.