शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:15 IST

टेलीव्हिजन, सोशलमिडीया आदींच्या वाढत्या प्रभावामुळे शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक वाचण्याची आवड कमी होत चालली आहे.

ठळक मुद्देपुस्तकदोस्ती संकल्पनेचा उपक्रम : सचिन सावरकर यांच्या धडपडीचे यश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : टेलीव्हिजन, सोशलमिडीया आदींच्या वाढत्या प्रभावामुळे शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक वाचण्याची आवड कमी होत चालली आहे. पुस्तक वाचण्याची संस्कृती कायम टिकवून राहावी यासाठी पुस्तकदोस्ती उपक्रमाच्या माध्यमातून प्रा. सचिन सावरकर गत १० वर्षापासून पुस्तक नि:शुल्क वाटण्याचा उपक्रम करीत आहे. यंदा त्यांनी दिवाळीनिमित्त दहा हजार विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली असून त्यांच्या धडपडीला यश आले आहे.पुस्तक दोस्ती दिवाळी या उपक्रमांतर्गत १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत संत साहित्याचे, देशभक्त नेत्यांचे जीवन चरित्र असलेले पुस्तक वाटण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. हे यश पुस्तकदोस्ती उपक्रमातून प्राप्त झाले असल्याचे या उपक्रमाचे शिल्पकार प्रा. सचिन सावरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बालकांमध्ये पुस्तक वाचण्याची आवड वाढावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला. वर्षभर विविध कार्यक्रमाचे औचित्य साधून पुस्तक वाटण्याचे काम शहरी व ग्रामीण भागात करण्यात येते. दिवाळी सणाचे निमित्त साधून पालकांना व विद्यार्थ्यांना पुस्तक देण्यात आले. नि:शुल्क स्वरूपात हे पुस्तक सचिन सावरकर, महेश किरंगे, गणेश चंदनखेडे, अविनाश दखणे, किरण भानारकर, साक्षी पाटील, शीतल सावरकर या कार्यकर्त्यांनी वितरित केले. जिल्ह्यातील दहा हजारावर अधिक विद्यार्थी पुस्तकदोस्ती उपक्रमाशी जुळले आहे. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमधील टि.व्ही. व मोबाईल पाहण्याचे प्रमाण कमी होत आहे. नि:शुल्क स्वरूपात हे पुस्तके व मार्गदर्शन पुस्तकदोस्ती उपक्रमाचे कार्यकर्ते करीत असल्याचे प्रा. सावरकर यांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या काळात अनेक कुटुंबियांच्या भेटी घेवून त्यांना शास्त्रज्ञ, कलावंत, प्रतिभावंत लेखक व संतांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले, असेही प्रा. सचिन सावरकर यांनी सांगितले.