शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

सोयाबीन उत्पादकांना बोनसचा दगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:32 IST

दिवाळी बोनस अशीच सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदा आवश्यक तेव्हा पिकाला पावसाचे पाणी न मिळाल्याने सध्या सोयाबीन पिकाच्या उताºयात घट येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देएकरी उत्पादनात होेतेय घट : दिवाळी सणादरम्यान जिल्ह्यातील शेतकºयांची वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशीच सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदा आवश्यक तेव्हा पिकाला पावसाचे पाणी न मिळाल्याने सध्या सोयाबीन पिकाच्या उताºयात घट येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. गत वर्षीच्या तूलनेत यंदा सोयाबीनच्या उताºयात मोठी तफावत येत असल्याने दिवाळी बोनस पिकांनेच दगा दिल्याचे शेतकºयांकडून बोलले जात असून सदर परिस्थितीने शेतकºयांची चिंता वाढली आहे.यंदाच्यावर्षी अनेक शेतकºयांनी समाधानकारक पाऊस होईल या आशेने कपाशी व तूर पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिला;पण वेळोवळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाची जोमाने वाढ झाली. हिरवेगार सोयाबीन पीक शेग भरण्याच्या अवस्थेत आले असता पून्हा पावसाने पाठ फिरवल्याने पाहिजे तशी शेंग भरली नाही. त्यातच महावितरणच्यावतीने भारनियमन सुरू करण्यात आल्याने ओलिताची सोय असलेल्या अनेक सोयाबीन उत्पादक शेतकºयांना वेळीच पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे सध्या सोयाबीनच्या उताºयात कमाचीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात.एक एकरात लावण्यात आलेल्या सोयाबीन पिकासाठी यंदा शेतकºयांना अखेरपर्यंत सुमारे १२ हजार रुपये खर्च आला. परंतु, त्याच्या तुलनेत सोयाबीनचे उतारेच येत नसल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. गत वर्षी एकरी आठ ते दहा पोते सोयाबीनचे उतारे आले होते. तर यंदा एकरी चार ते पाच पोतेच सोयाबीनचे उतारे येत असल्याचे शेतकºयांकडून सांगितले जात आहे. एकूणच शेतकºयांसाठी दिवाळी बोनस म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाने यंदा जिल्ह्यातील शेतकºयांची कंबरच मोडली आहे. शिवाय दगाच दिल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आहे.दीड एकरात झाले केवळ दीड पोते सोयाबीनयंदाच्या वर्षी सोयाबीन साथ देईल अशी आशा शेतकºयांना होती. परंतु, अनेकांची आशा आशाच राहिल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. देवळी येथील शेखर कामडी नामक शेतकºयाला दीड एकरात केवळ दीड पोते सोयाबीन झाल्याचे सांगण्यात येते. ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळी बोनस पिकाने दगा दिल्याने कृषी विभागासह महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी सर्वेक्षण करून शेतकºयांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.