शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

१९७२ चा बोंदरठाणा पाझर तलाव अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:50 IST

जलयुक्त शिवार आणि इतर सिंचनाच्या योजना राबविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या शासनाचे १९७२ साली पायरप योजनेंतर्गत बोदंरठाणा येथे

ठळक मुद्देठेकेदाराने सोडले काम : शासनाचे दुर्लक्ष; शेतकºयांना लाभ नाही

अरूण फाळके।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : जलयुक्त शिवार आणि इतर सिंचनाच्या योजना राबविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या शासनाचे १९७२ साली पायरप योजनेंतर्गत बोदंरठाणा येथे पाझर तलाव बांधण्याचा निर्णय घेतला. त्याला ४५ वर्षांचा कालावधी होण्याची चेळ आली तरी त्याचे काम अद्याप पुर्णत्त्वास आले नाही. दरम्यानच्या काळात ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्यामुळे हजारो शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित राहिले आहेत. सद्यपरिस्थितीत तलावाचे बांधकाम प्रत्यक्षात सुरू झाले होते किंवा नव्हते, ही केवळ कागदोपत्रीच दाखविण्यात आले होते. असा भास तलावाला भेट दिल्यावर येतो. याबाबत जिल्हा स्तरावर विचारणा केली असता, शासन यंत्रणा कानावर हात ठेवून आहे.कारंजा तालुक्यात १२ माही वाहणारी एकही नदी नाही. खैरी येथे एकमेव एक धरण आहे, पण त्या धरणाचा सिंचनाचा फायदा काटोल, आष्टी, नरखेड तालुक्यातील शेतकºयांना होतो. कारंजा तालक्यातील एकाही शेतकºयाला त्याचा लाभ नाही. धरणात जमीन कारंजा तालुक्याची गेली पण लाभ इतरांनाच असा किस्सा येथे घडला आहे. संपूर्ण तालुक्यात ड्राय झोन भरपूर आहे. पाण्याची पातळी खोल आहे. विहिरींना डिसेंबर अखेर पाणि राहात नाही.यामुळे कारंजा तालुक्यात पाझर तलाव किंवा सिंचन तलाव जर झालेत तर पाण्याची पातळी वाढून विहिरींना पाणी येवू शकते. याच उद्देशाने सन १९७२ साली पायरप योजनेंतर्गत बोंदरठाणा येथील जागा निवडण्यात आली होती. येथे खोलगट भाग व बाजुला छोटा नाला असल्यामुळे मोठा पाझर तलाव कमी खर्चात तयार होवून सभोवतालच्या शेतकºयांची सिंचनाची सोय होणार, पाण्याची पातळी वाढणार अशी अपेक्षा होती.तलावासाठी जमीन दिल्याची नोंद, शेतकºयांच्या सातबारा मध्ये आहे. पण सद्या तलावाचे कामच सुरू नसल्याने शेतकरी जमिनीची वहिवाट करीत आहे. माजी सरपंच नेत्राम गाडगे, सुनील चौधरी, माजी सभापती मेघराज चौधरी, आणि गावकºयांनी या संदर्भात वर्धेला जाऊन संबंधितांची भेट घेतली. चौकशी होईल असे सांगण्यात आले; पण चौकशी घोगडे, अद्याप ही पाण्यातच आहे. निश्चितच या पाझर तलावाचे कामात मोठा घोळ झाला अशी परिसरात चर्चा आहे. कलेक्टर साहेबांनी लक्ष घालुन प्रकरणातील तथ्य शोधले अशी जनता अपेक्षा करीत आहे.जलयुक्त अभियानात शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अभियानांतर्गत या तलावाच्या पुर्णत्वाकडे लक्ष देण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.