शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर बोंडअळीचा ‘अटॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात यंदा एकूण २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड झाली. यात कोरडवाहू शेतजमिनीचाही समावेश आहे. सुरूवातीला बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर थोड्या प्रमाणात दिसून आला. त्यावेळी कृषी विभागाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने काही प्रमाणात बोंडअळीला अटकाव घालता आला.

ठळक मुद्देकृषी विभागाच्या दुर्लक्षित धोरणांचा कपाशी उत्पादकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी सोयाबीनला बगल देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करण्यास पसंती दर्शविली. परंतु, सध्या गुलाबी बोंडअळी पुन्हा नव्या जोमाने डोकेवर काढू पाहत आहे. या प्रकाराकडे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असलेला कृषी विभागच दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याने कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्यातील काही भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असून यंदा पांढºया सोन्यापेक्षा बोंडअळीचेच जास्त उत्पन्न होईल काय, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात यंदा एकूण २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड झाली. यात कोरडवाहू शेतजमिनीचाही समावेश आहे. सुरूवातीला बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर थोड्या प्रमाणात दिसून आला. त्यावेळी कृषी विभागाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने काही प्रमाणात बोंडअळीला अटकाव घालता आला.मात्र, त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी सूस्त झाले. शिवाय त्यांनी उंटावरूनच शेळ्या हाकण्यात धन्यता मानल्याने सध्या बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कपाशी पिकावर दिसून येत आहे. शासकीय आकडेवारीनुसार आर्वी तालुक्यातील बाजारवाडा व रसुलाबाद, देवळी तालुक्यातील एकपाळा, समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथे बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे सांगण्यात येते.असे असले तरी हिंगणघाट, वर्धा, समुद्रपूर, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू तालुक्यांमधील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे शेतकरी सांगतात; पण शासनदरबारी याची नोंदच घेण्यात आलेली नाही. कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारीही कार्यालयातच बसून गाढा हाकत असल्याने ही विदारक परिस्थिती ओढावल्याची खंत शेतकºयांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. एकूणच कृषी विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा आर्थिक फटकाच यंदा कपाशी उत्पादक शेतकºयांना सहन करावा लागत आहे.जनजागृतीचा अभाव, तज्ज्ञ उंटावरून हाकताहेत शेळ्यादोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा उद्रेकच झाला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जिनिंग प्रेसिंग व्यावसायिकांची कानउघाडणीच केली होती. त्यानंतर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेनंतर बोंडअळीला अटकाव घालण्यात बऱ्यापैकी यश आले होते; पण त्यानतर जनजागृतीकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याचे दिसून येते.जनावरांना दिला जातोय चाराबोंडअळीच्या प्रादुर्भावाला कंटाळून शेतकरी थेट कपाशीचे पीक कापत आहेत. इतकेच नव्हे, तर कापलेले पीक किंवा कपाशी पीक असलेल्या शेतात शेतकरी आपली जनावरे चरण्यासाठी सोडत आहेत.शेतकरी कापताय झाडंशेतकऱ्यांनी योग्य निगा घेतल्याने कपाशी पिकाची समाधानकारक वाढ झाली. बहरलेली कपाशी पाहून यंदा विक्रमी उत्पन्न होईल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात होता. सद्यस्थितीत कपाशीच्या एका झाडाला सुमारे ४० ते ५० बोंड असल्याचे बघावयास मिळत असून या बोंडामध्ये गुलाबी बोंडअळी आढळून येत आहे. त्यामुळे काही शेतकरी कपाशीचे झाडच कापण्यात धन्यता मानत आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाला कंटाळून आर्वी तालुक्यातील रसुलाबाद येथील शेतकरी अजय आसोले यांनी कपाशी पीक थेट कापले आहे. तर याच गावातील प्रमोद गुल्हाणे, गजानन सावरकर, किशोर टाके हे शेतकरी कपाशीचे पीक कापण्याच्या तयारीत आहेत. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील आठही तालुक्यात असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :agricultureशेती