कंत्राटदाराचा प्रकार : कमिशनची होती मागणीआष्टी (श.) : जलयुक्त शिवार अभियानाची कामे पूर्ण करून नऊ महिने झाली; पण तालुका व मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना ३५ टक्के कमिशनची मागणी केली. पैसे दिले नाही म्हणून ग्रामसभेच्या ठरावाची अट घातली. यामुळे संतप्त कंत्राटदार प्रवीण देशमुख रा. आर्वी यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयास कुलूप ठोकले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी अश्विनी भोसले यांना कार्यालयात डांबले. हा प्रकार बुधवारी सकाळी १० वाजता घडला.कंत्राटदार प्रवीण देशमुख यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौजा बोरखेडी येथे नाला खोलीकरणाचे काम केले. त्यांच्या कामाची मोजमाप पुस्तिका आॅगस्ट २०१५ मध्ये झाली. यानंतर पैसे मिळणे गरजेचे होते; पण तालुका कृषी अधिकारी विजय मेंढजोगे, मंडळ कृषी अधिकारी अश्विनी भोसले, कृषी पर्यवेक्षक चव्हाण यांनी ३५ टक्के कमीशनची मागणी केली. यामुळे संतप्त कंत्राटदार देशमुख यांनी बुधवारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांची कानउघडणी करीत कृषी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर निघा, कुलूप ठोकायचे आहे, असे सांगितले; पण मंडळ कृषी अधिकारी अश्विनी भोसले खुर्चीवरच बसून राहिल्या. देशमुख यांनी कार्यालयाचे दार बंद केले व कुलूप ठोकले. पोलिसांना माहिती देताच ठाणेदार डी.एस. ठाकूर, उपनिरीक्षक विष्णुपंत कराळे यांनी धाव घेतली. देशमुख यांची समजून घालत प्रतिबंधात्मक कारवाई केली व मध्यस्थीने कुलूप तोडले.(प्रतिनिधी)
मंडळ कृषी अधिकाऱ्याला डांबले
By admin | Updated: February 4, 2016 02:14 IST