शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

गारपिटीचा तडाखा

By admin | Updated: March 16, 2015 01:37 IST

अवकाळी पाऊस व गारपीट यंदा शेतकऱ्याची पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. गत दोन महिन्यापासून जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे.

वर्धा : अवकाळी पाऊस व गारपीट यंदा शेतकऱ्याची पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. गत दोन महिन्यापासून जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. जुन्या आठवणी शेतकरी विसरत नाही तोच रविवारी पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला. दुपारी ३ वाजतापासून सुरू झालेला हा पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होता. यावेळी जिल्ह्यातील विविध भागात बोराच्या आकाराच्या गारी पडल्या. या गारपिटीमुळे शेतात उभ्या असलेल्या गव्हासह चणा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात वर्धा, सेलू, देवळी, कारंजा (घाडगे) व आर्वी या भागाला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. वर्धेत सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आलेल्या पावसात गारपीट झाली. यावेळी असलेल्या वाऱ्यामुळे शहरातील वंजारी चौक व आर्वी नाका परिसरात विद्यूत तारा तुटल्याले काही काळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. वर्धेतील रस्त्याच्या कडेला गारांचा खच साचला होता. तर सालोड (हिरापूर) येथे पावसात सापडलेले दोघे जखमी झाले. कारंजा तालुक्यातील धर्ती, भालु, बोरी, सोनेगांव या गावांना गारपिटीचा फटका बसला होता. तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मेटहिरजी या गावाला १ तास गारपिटीने झोडपले. येथील हजारावर हेक्टर शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. सुमारे एक तास वादळी वारा व पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. गारपीटीने शंभरच्यावर घरांचे कवेलू फुटल्याचे येथील विनोद सिरसाम यांनी सांगितले. येथीलच जगदीश डोये यांच्या शेतातील ३ एकर गहु व चना भूईसपाट झाला. येथील जमीन शंभर टक्के ओलिताची असल्याने संत्रा, गहु, चणा पीक घेतात. ऐन कापणीच्या वेळी बसलेल्या गारपिटीच्या तडाख्यामुळे त्यांना चांगलाच फटका बसला. गावातील अनेक घरावरील कवेलु फुटुन पाणी घरात शिरल्याने घरातील साहित्याची नासधुस झाली. देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी), चिकणी, जामणी, नागझरी, इंझाळा आदी गावात १५ ते २० मिनीटपर्यंत बोर व आवळ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. सोनेगाव आबाजी येथील उदय काशीकर यांचा दोन एकरातील कांदा जमीनदोस्त होऊन त्यांचे दोन लाखाचे नुकसान झाले. तसेच चिकणी व जामणी येथे सुद्धा १५ ते २० मिनीटपर्यंत गारा होऊन पिकांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे नागझरी व इंझाळा येथे तुरीचे आकाराच्या गारा व वादळी पाऊस झाला. सेलू तालुक्यातील रेहकी, सुरगाव या भागात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यावेळी गारपीट झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले. शिवाय बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात सवंगनी करून ठेवलेला गहू ओला झाल्याने नुकसान सोसावे लागले. आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा, तरोडा, बोथली या तीन गावांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा चांगलात तडाखा बसला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. गावात सुमारे २० मिनीट गारपीट झाल्याने झाडावरील पाने गळाली तर घरांवरील कवेलूचे नुकसान झाले. सुदैवाने यात प्राणहानी झाल्याची माहिती नाही. मात्र चरायला गेलेले जनावर अडकून पडल्याने शेतकऱ्यांची ताराबंळ उडाली. झालेल्या नुकसानाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)सालोड येथे दोघे जखमी; मेटहिरजी येथे तासभर गारपीटशेतात काम करीत असताना वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसात असलेल्या बैलांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पावसासोबत असलेल्या गारपिटीचा फटका बसला. गारपिटीतून बचावाच्या प्रयत्नात असलेल्या शंकर कोडापे व कैलास सोनटक्के या दोघांना गारांचा मार बसल्याने दोघेही जखमी झाले. कारंजा तालुक्यातील मेटहिरजी या गावात सुमारे एक तास पावसाने थैमान घातले. तासभरात झालेल्या या गारपिटीमुळे फावड्याने गारा गोळा करण्यागत खच पडला होता. देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी), चिकणी, नागझरी, इंझाळा या गावातील गहू, चणा व कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले. येथे बोराच्या आकाराच्या गारा पडल्या.सेलू तालुक्यात शेतात सवंगणी करून ठेवलेला गहू व इतर पिके ओली झालीत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा, तरोडा, बोथली या तीन गावांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा चांगलाच तडाखा बसला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली तर २० मिनीटे गारपीट झाल्याने झाडावरील पाने गळाली व घरांवरील कवेलूंचे नुकसान झाले.