शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अंधारात राहून दुसऱ्यांची घरे उजाळणारे पणती कारागीर

By admin | Updated: October 28, 2016 01:39 IST

कोणताही सण आनंद व उत्साहाचे प्रतिक असतो. दिवाळी हा सण आपल्या जीवनात सुख समाधान आणत असतो;

बाजारात पणत्यांची आरास : शिक्षणाचा गंध नाही की, जेवणाची भ्रांत नाहीवर्धा : कोणताही सण आनंद व उत्साहाचे प्रतिक असतो. दिवाळी हा सण आपल्या जीवनात सुख समाधान आणत असतो; पण शहरातील मुख्य मार्गावर आपल्या कुटुंबासह मातीच्या मूर्त्या व दिवे विकणाऱ्या लोकांसाठी हा पर्व संघर्षमय असतो. दुसऱ्यांची घरे उजळण्यासाठी दिवसरात्र श्रम करीत धडपडणाऱ्या या लोकांच्या घरात खरा प्रकाश पोहोचतच नाही. तुटपुंज्या मिळकतीत समाधान माणून या लोकांच्या पिढ्या जीवन कंठत आहेत. सणानिमित्त जेवढी कमाई होत असेल तेवढी कमाई करावी व दोन वेळचे जेवण मिळू शकेल. आपल्या संपूर्ण कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापितांचे जीवन जगणाऱ्या या कुटुंबातील मुलांना हे देखील माहिती नसते की, दिवाळी काय असते. मोठे साहित्य विकत आहेत, म्हणून आम्हीही दोन पैसे कमविण्यासाठी बसलो आहे, असे ते सांगतात. आज सायंकाळी आपल्या मुलांना भरपेट जेवण मिळेल याचा आनंद या विक्रत्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. सोबतच मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून येतो. तो आनंद व प्रकाश दिव्याच्या उजेडापेक्षा कित्येक पट अधिक असतो. दिव्यांचा हा सण देशात उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त खरेदीही मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. शहराच्या मुख्य मार्गावर संपूर्ण कुटुंबासह फाटलेल्या चादरीवर मातीचे दिवे व मूर्ती ठेवून विकणारे कुटुंब काही न सांगता खूप काही सांगून जातात. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर ते प्रारंभी पोलिसांचा ससेमिरा, त्या जागेवरून हटविणार तर नाही ना, असे विविध प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात. पैसे कमविण्यासाठी खूप मेहनत करीत मुलेही साहित्याच्या बाजूला बसलेले असतात. दोन-तीन गठ्ठ्यांत संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साहित्य साठवून हे लोक प्रत्येक सणाला वेगवेगळ्या शहरात जातात. शिक्षण काय असते, हे यांच्या मुलांना माहिती नसते. केवळ जगण्यासाठी काम करून संघर्षमय जीवन जगणे हेच त्यांना माहिती आहे. हे साहित्य विक्री केल्यास आपल्याला जेवण मिळणार या आशेने ते रस्त्यावरील ग्राहकांना आवाज देत त्यांना वस्तू घेण्यास प्रवृत्त करीत मालाची विक्री करताना दिसतात. इतरांसारखे दिवाळीच्या सायंकाळी त्यांच्या घरी उजेड काय तो असेल; पण त्यांचे जीवनच उघड्यावर आहे. पणती विकल्यावर हे किती रुपये कमवित असतील, यात ते चांगले जगू शकतील काय, हा प्रश्नच आहे.(कार्यालय प्रतिनिधी)