शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

अंधारात राहून दुसऱ्यांची घरे उजाळणारे पणती कारागीर

By admin | Updated: October 28, 2016 01:39 IST

कोणताही सण आनंद व उत्साहाचे प्रतिक असतो. दिवाळी हा सण आपल्या जीवनात सुख समाधान आणत असतो;

बाजारात पणत्यांची आरास : शिक्षणाचा गंध नाही की, जेवणाची भ्रांत नाहीवर्धा : कोणताही सण आनंद व उत्साहाचे प्रतिक असतो. दिवाळी हा सण आपल्या जीवनात सुख समाधान आणत असतो; पण शहरातील मुख्य मार्गावर आपल्या कुटुंबासह मातीच्या मूर्त्या व दिवे विकणाऱ्या लोकांसाठी हा पर्व संघर्षमय असतो. दुसऱ्यांची घरे उजळण्यासाठी दिवसरात्र श्रम करीत धडपडणाऱ्या या लोकांच्या घरात खरा प्रकाश पोहोचतच नाही. तुटपुंज्या मिळकतीत समाधान माणून या लोकांच्या पिढ्या जीवन कंठत आहेत. सणानिमित्त जेवढी कमाई होत असेल तेवढी कमाई करावी व दोन वेळचे जेवण मिळू शकेल. आपल्या संपूर्ण कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापितांचे जीवन जगणाऱ्या या कुटुंबातील मुलांना हे देखील माहिती नसते की, दिवाळी काय असते. मोठे साहित्य विकत आहेत, म्हणून आम्हीही दोन पैसे कमविण्यासाठी बसलो आहे, असे ते सांगतात. आज सायंकाळी आपल्या मुलांना भरपेट जेवण मिळेल याचा आनंद या विक्रत्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. सोबतच मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून येतो. तो आनंद व प्रकाश दिव्याच्या उजेडापेक्षा कित्येक पट अधिक असतो. दिव्यांचा हा सण देशात उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त खरेदीही मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. शहराच्या मुख्य मार्गावर संपूर्ण कुटुंबासह फाटलेल्या चादरीवर मातीचे दिवे व मूर्ती ठेवून विकणारे कुटुंब काही न सांगता खूप काही सांगून जातात. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर ते प्रारंभी पोलिसांचा ससेमिरा, त्या जागेवरून हटविणार तर नाही ना, असे विविध प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात. पैसे कमविण्यासाठी खूप मेहनत करीत मुलेही साहित्याच्या बाजूला बसलेले असतात. दोन-तीन गठ्ठ्यांत संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साहित्य साठवून हे लोक प्रत्येक सणाला वेगवेगळ्या शहरात जातात. शिक्षण काय असते, हे यांच्या मुलांना माहिती नसते. केवळ जगण्यासाठी काम करून संघर्षमय जीवन जगणे हेच त्यांना माहिती आहे. हे साहित्य विक्री केल्यास आपल्याला जेवण मिळणार या आशेने ते रस्त्यावरील ग्राहकांना आवाज देत त्यांना वस्तू घेण्यास प्रवृत्त करीत मालाची विक्री करताना दिसतात. इतरांसारखे दिवाळीच्या सायंकाळी त्यांच्या घरी उजेड काय तो असेल; पण त्यांचे जीवनच उघड्यावर आहे. पणती विकल्यावर हे किती रुपये कमवित असतील, यात ते चांगले जगू शकतील काय, हा प्रश्नच आहे.(कार्यालय प्रतिनिधी)