शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

भाजप सरकार खोटारडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:28 IST

प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे अभिवचन देणारे भाजपा-सेनेचे हे सरकार खोटारडे आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे : राकाँची हल्लाबोल पदयात्रा जिल्ह्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे अभिवचन देणारे भाजपा-सेनेचे हे सरकार खोटारडे आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यवतमाळ ते नागपूर या हल्लाबोल रॅलीचे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आगमन झाल्यानंतर शिरपूर (होरे) येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने यवतमाळ ते नागपूर या १५३ कि़मी. अंतराच्या हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर रविवारी सायंकाळी दाखल झाली. सदर पदयात्रा जिल्ह्याच्या सिमेवर दाखल होताच शिरपूर (होरे) येथे एक सभा झाली. यावेळी मंचावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, फौजिया खान, महिला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, शरद तसरे, माजी खासदार गणेश दुधगावकर, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे आदींची उपस्थिती होती.यावेळी खा. सुळे म्हणाल्या, या सरकारला सत्तेतून घालविणे गरजेचे झाले असल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने या आधी शेतकºयांचे हित जोपासण्यासाठी ७० हजार कोटीचे कर्ज माफ करून सातबारा कोरा केला होता. परंतु भुलथापा देणाºया या सरकारने शेतकºयांच्या आर्थिक परिस्थितीचा खेळ मांडला आहे. महिलांनो मोठ्या संख्येनी नागपूरला या आपण सर्वमिळून या सरकारवर लाटणे घेवून हल्लाबोल करू, अशी हाक खासदार सुळे यांनी सभेतून दिली.सभेपूर्वी हल्लाबोल यात्रेचे जिल्ह्याच्या सीमेवर येताच सहकार नेते सुरेश देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाºयांनी स्वागत केले. शेतकºयांचा सातबारा ताबडतोब कोरा करा, सरसकट कर्जमाफी द्या, कापूस, तूर, सोयाबीनसाठी खरेदी केंद्रे सुरू करा, विषारी औषधी फवारणीमुळे बळी पडलेल्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घ्या, खोटी आश्वासने फसव्या, जाहिराती जनतेच्या माथी मी लाभार्थी अशा अनेक घोषणा देवून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.यानंतर ही रॅली सत्यसाई मेहर सेंटर भिडी येथे मुक्कामी पोहचली. सोमवारला सकाळी ही रॅली देवळीकडे आगेकुच करून रात्रीला मुक्कामी राहणार आहे.या हल्लाबोल रॅलीत माजी आमदार वसंतराव कार्लेकर, किशोर माथनकर, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायण सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, समीर देशमुख, खविस अध्यक्ष अमोल कसनारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शरयू वांदिले, शारदा केने, विणा दाते, विद्या सोनटक्के, मोरे, जि.प. सदस्य संजय कामनापुरे, प्रा. खलील खतीब, सुरेश डफरे, दिवाकर मून, हनुवंत नाखले, नितीन देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.पदयात्रेचा कार्यक्रमही पदयात्रा सोमवारी सकाळी ९ वाजता भिडी येथील यशवंत विद्यालय निघून देवळीला पोहोचणार आहे. देवळी येथील कार्यक्रमानंतर मंगळवारी सकाळी ९ वाजता देवळी येथील भोंग मंगल कार्यालयातून रवाना होवून रात्री वर्धा येथे पदयात्रेचे आगमन होणार आहे. ६ डिसेंबरला सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण करुन पदयात्रेला सुरुवात होईल. रात्री सेवाग्राम येथे मुक्कामानंतर ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता बापुकूटी येथे भेट देवून पदयात्रा सेवाग्राम-पवनार मार्गे सेलू येथे पोहोचणार आहे. शुक्रवारी ८ डिसेंबरला सकळी ९ वाजता माहेर मंगल कार्यालयातून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. रात्री खडकी येथे मुक्कामानंतर शनिवार ९ डिसेंबरला सकाळी ९ वाजता हनुमान मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे