शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार खोटारडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:28 IST

प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे अभिवचन देणारे भाजपा-सेनेचे हे सरकार खोटारडे आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे : राकाँची हल्लाबोल पदयात्रा जिल्ह्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे अभिवचन देणारे भाजपा-सेनेचे हे सरकार खोटारडे आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यवतमाळ ते नागपूर या हल्लाबोल रॅलीचे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आगमन झाल्यानंतर शिरपूर (होरे) येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने यवतमाळ ते नागपूर या १५३ कि़मी. अंतराच्या हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर रविवारी सायंकाळी दाखल झाली. सदर पदयात्रा जिल्ह्याच्या सिमेवर दाखल होताच शिरपूर (होरे) येथे एक सभा झाली. यावेळी मंचावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, फौजिया खान, महिला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, शरद तसरे, माजी खासदार गणेश दुधगावकर, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे आदींची उपस्थिती होती.यावेळी खा. सुळे म्हणाल्या, या सरकारला सत्तेतून घालविणे गरजेचे झाले असल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने या आधी शेतकºयांचे हित जोपासण्यासाठी ७० हजार कोटीचे कर्ज माफ करून सातबारा कोरा केला होता. परंतु भुलथापा देणाºया या सरकारने शेतकºयांच्या आर्थिक परिस्थितीचा खेळ मांडला आहे. महिलांनो मोठ्या संख्येनी नागपूरला या आपण सर्वमिळून या सरकारवर लाटणे घेवून हल्लाबोल करू, अशी हाक खासदार सुळे यांनी सभेतून दिली.सभेपूर्वी हल्लाबोल यात्रेचे जिल्ह्याच्या सीमेवर येताच सहकार नेते सुरेश देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाºयांनी स्वागत केले. शेतकºयांचा सातबारा ताबडतोब कोरा करा, सरसकट कर्जमाफी द्या, कापूस, तूर, सोयाबीनसाठी खरेदी केंद्रे सुरू करा, विषारी औषधी फवारणीमुळे बळी पडलेल्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घ्या, खोटी आश्वासने फसव्या, जाहिराती जनतेच्या माथी मी लाभार्थी अशा अनेक घोषणा देवून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.यानंतर ही रॅली सत्यसाई मेहर सेंटर भिडी येथे मुक्कामी पोहचली. सोमवारला सकाळी ही रॅली देवळीकडे आगेकुच करून रात्रीला मुक्कामी राहणार आहे.या हल्लाबोल रॅलीत माजी आमदार वसंतराव कार्लेकर, किशोर माथनकर, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायण सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, समीर देशमुख, खविस अध्यक्ष अमोल कसनारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शरयू वांदिले, शारदा केने, विणा दाते, विद्या सोनटक्के, मोरे, जि.प. सदस्य संजय कामनापुरे, प्रा. खलील खतीब, सुरेश डफरे, दिवाकर मून, हनुवंत नाखले, नितीन देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.पदयात्रेचा कार्यक्रमही पदयात्रा सोमवारी सकाळी ९ वाजता भिडी येथील यशवंत विद्यालय निघून देवळीला पोहोचणार आहे. देवळी येथील कार्यक्रमानंतर मंगळवारी सकाळी ९ वाजता देवळी येथील भोंग मंगल कार्यालयातून रवाना होवून रात्री वर्धा येथे पदयात्रेचे आगमन होणार आहे. ६ डिसेंबरला सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण करुन पदयात्रेला सुरुवात होईल. रात्री सेवाग्राम येथे मुक्कामानंतर ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता बापुकूटी येथे भेट देवून पदयात्रा सेवाग्राम-पवनार मार्गे सेलू येथे पोहोचणार आहे. शुक्रवारी ८ डिसेंबरला सकळी ९ वाजता माहेर मंगल कार्यालयातून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. रात्री खडकी येथे मुक्कामानंतर शनिवार ९ डिसेंबरला सकाळी ९ वाजता हनुमान मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे