शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा

By admin | Updated: September 21, 2014 23:54 IST

आघाडीचे सहा सदस्य गैरहजर असल्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताचा २६ हा आकडा नसतानाही भाजपाने जिल्हा परिषदेवर

वर्धा : आघाडीचे सहा सदस्य गैरहजर असल्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताचा २६ हा आकडा नसतानाही भाजपाने जिल्हा परिषदेवर झेंडा फडकाविला. हिंगणी गटाच्या सदस्य चित्रा रणनवरे अध्यक्ष तर सावंगी (मेघे) गटाचे सदस्य विलास कांबळे हे नवे उपाध्यक्ष म्हणून विजयी झाले. गैर काँग्रेसी पक्षाने जिल्हा परिषदेवर सत्ता हस्तगत केल्याची ही वर्धा जिल्ह्यातील तिसरी वेळ होय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक झाल्याने पुढे काय चित्र राहील, याकडे लक्ष लागले आहे.आघाडीकडून अध्यक्षपदासाठी उषाकिरण थुटे, निर्मला दंडारे तर उपाध्यक्षपदाकरिता संजय कामनापुरे यांनी नामांकन दाखल केले होते. भाजपाकडून अध्यक्षपदाकरिता चित्रा रणनवरे, चेतना मानमोडे यांनी तर उपाध्यक्षाकरिता विलास कांबळे यांचे नामांकन होते. जि.प. सभागृहात सुरू असलेल्या गदारोळात कोण विजयी होणार, अशी उत्सुकता मतमोजणीपर्यंत कायम होती. अशात दंडारे व मानमोडे यांनी नामांकन परत घेतल्याने सरळ लढत झाली. हात उंचावून झालेल्या मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय भागवत यांनी २५ विरूद्ध १९ अशा फरकाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चित्रा रणनवरे आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विलास कांबळे यांनी विजय संपादन केल्याची घोषणा करताच भाजप नेत्यांचे चेहरे फुलले. जिल्हा परिषद निवडणुकीची चाहुल लागताच भाजपात नव्याने दाखल झालेले माजी खासदार दत्ता मेघे सक्रीय झाले. त्यांनीच पडद्यामागून या निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सूत्रे हलविली. कोणत्याही परिस्थितीत सत्ता हस्तगत करायचीच असा निर्धारच त्यांनी केला होता, असे आता बोलले जात आहे. मागील १५ दिवसांपासून या दिशेने हालचालींना वेग आला होता. आघाडीतील काही सदस्य संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याचे लक्षात येताच आघाडीचे नेते ना. रणजित कांबळे, आ. सुरेश देशमुख यांनीही हालचाली सुरू केल्या. अखेरच्या क्षणापर्यंत आपली राजकीय शक्ती पणाला लावून या दोन्ही नेत्यांनी खिंड लढविली. मात्र त्यांना गैरहजर राहिलेल्या सदस्यांमुळे सत्ता राखता आली नाही. लोकसभा निवडणूक भाजपाने जिंकली. त्यानंतर आता जिल्हा परिषदेवरही झेंडा फडकावू, अशा विचाराने भाजपचे नेतेमंडळी कामाला लागले होते. त्यानुसार पळवापळवीही झाली. अखेर या राजकीय घडोमोडीनंतर भाजपाने सत्ता हस्तगत करण्यात यश मिळविले. जिल्हा परिषद काँग्रेसकडून भाजपाने हिसकावली. या निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर किती प्रभाव पडतो, याकडे लक्ष लागले आहे.(लोकमत चमू)