शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा

By admin | Updated: September 21, 2014 23:54 IST

आघाडीचे सहा सदस्य गैरहजर असल्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताचा २६ हा आकडा नसतानाही भाजपाने जिल्हा परिषदेवर

वर्धा : आघाडीचे सहा सदस्य गैरहजर असल्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताचा २६ हा आकडा नसतानाही भाजपाने जिल्हा परिषदेवर झेंडा फडकाविला. हिंगणी गटाच्या सदस्य चित्रा रणनवरे अध्यक्ष तर सावंगी (मेघे) गटाचे सदस्य विलास कांबळे हे नवे उपाध्यक्ष म्हणून विजयी झाले. गैर काँग्रेसी पक्षाने जिल्हा परिषदेवर सत्ता हस्तगत केल्याची ही वर्धा जिल्ह्यातील तिसरी वेळ होय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक झाल्याने पुढे काय चित्र राहील, याकडे लक्ष लागले आहे.आघाडीकडून अध्यक्षपदासाठी उषाकिरण थुटे, निर्मला दंडारे तर उपाध्यक्षपदाकरिता संजय कामनापुरे यांनी नामांकन दाखल केले होते. भाजपाकडून अध्यक्षपदाकरिता चित्रा रणनवरे, चेतना मानमोडे यांनी तर उपाध्यक्षाकरिता विलास कांबळे यांचे नामांकन होते. जि.प. सभागृहात सुरू असलेल्या गदारोळात कोण विजयी होणार, अशी उत्सुकता मतमोजणीपर्यंत कायम होती. अशात दंडारे व मानमोडे यांनी नामांकन परत घेतल्याने सरळ लढत झाली. हात उंचावून झालेल्या मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय भागवत यांनी २५ विरूद्ध १९ अशा फरकाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चित्रा रणनवरे आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विलास कांबळे यांनी विजय संपादन केल्याची घोषणा करताच भाजप नेत्यांचे चेहरे फुलले. जिल्हा परिषद निवडणुकीची चाहुल लागताच भाजपात नव्याने दाखल झालेले माजी खासदार दत्ता मेघे सक्रीय झाले. त्यांनीच पडद्यामागून या निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सूत्रे हलविली. कोणत्याही परिस्थितीत सत्ता हस्तगत करायचीच असा निर्धारच त्यांनी केला होता, असे आता बोलले जात आहे. मागील १५ दिवसांपासून या दिशेने हालचालींना वेग आला होता. आघाडीतील काही सदस्य संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याचे लक्षात येताच आघाडीचे नेते ना. रणजित कांबळे, आ. सुरेश देशमुख यांनीही हालचाली सुरू केल्या. अखेरच्या क्षणापर्यंत आपली राजकीय शक्ती पणाला लावून या दोन्ही नेत्यांनी खिंड लढविली. मात्र त्यांना गैरहजर राहिलेल्या सदस्यांमुळे सत्ता राखता आली नाही. लोकसभा निवडणूक भाजपाने जिंकली. त्यानंतर आता जिल्हा परिषदेवरही झेंडा फडकावू, अशा विचाराने भाजपचे नेतेमंडळी कामाला लागले होते. त्यानुसार पळवापळवीही झाली. अखेर या राजकीय घडोमोडीनंतर भाजपाने सत्ता हस्तगत करण्यात यश मिळविले. जिल्हा परिषद काँग्रेसकडून भाजपाने हिसकावली. या निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर किती प्रभाव पडतो, याकडे लक्ष लागले आहे.(लोकमत चमू)