शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

पक्ष्यांचा पहाटेचा किलबिलाट हरविला

By admin | Updated: May 16, 2015 02:13 IST

उन्हाळ्याच्या दिवसात पूर्वी गर्द हिरव्या झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सकाळ-दुपार-सायंकाळी ऐकू यायचा.

वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात पूर्वी गर्द हिरव्या झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सकाळ-दुपार-सायंकाळी ऐकू यायचा. गावातील पहाटच रंगीबेरंगी पक्ष्यांच्या किलबिलाटाने होत असे. घराबाहेर डोकावले तरी पक्ष्यांचे मनमोहक थवे दृष्टीस पडत होते. मात्र अलिकडे वाढत्या प्रदूषणाने आणि मानवी हस्तेक्षेपामुळे पक्ष्यांचे थवे दिसेनासे झाले आहे. काही दिवसात अनेक पक्षी केवळ पुस्तकातूनच दिसेल की काय, अशी अवस्था आली आहे.शहरी आणि ग्रामीण भागात काही वर्षापूर्वी पक्ष्यांची संख्या ही बरीच होती. शहरांमध्येही वडाच्या अथवा उंच पिंपळाच्या वृक्षांवर पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसायचे. सायंकाळी या पक्षांचा किलबिलाट सुरू असायचा. पोपट, बगळे, राघू आदी पक्षी या वृक्षांवरच मुक्काम ठोकायचे. तांबडं फुटायच्या वेळेस पक्ष्यांचे थवे चाऱ्याच्या शोधात निघताना पुन्हा किलबिलाट व्हायचा सर्वांच्या आवडीची चिमणी घरभर चिवचिव करायची कवेलूंच्या घरात सर्वत्र तिची घरटी असायची. परंतु सिमेंटच्या जंगलात चिमण्यांची घरटीही दिसेनासी झाली आहे.मोबाईल टॉवरमुळे शहरातील पक्षी शहरी भागातील दूर जात आहेत, तर गावांकडे शेतात फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकांमुळे पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहे. कावळा आता पिंडाला शिवायलाही दिसत नाही. वैज्ञानिक क्रांतीने जग बदलले आहे. निसर्गापासून माणूस दूर जाऊन काँक्रीटच्या जंगलात राहू लागला आहे. नवनवीन संशोधन करताना निसर्गाला मानव धारेवर धरत असल्याने सृष्टीचे चक्र विस्कळीत होत आहे. त्यातच शहरामध्ये प्रदूषणाची समस्या वाढली आहे. याची झळ ग्रामीण भागालाही पोहोचली आहे. त्यामुळे पाणीही प्रदूषित होत असून पक्ष्यांसाठी ते धोक्याचे ठरत आहे. निसर्गाचा सफाई कामगार असणारा गिधाड हा पक्षी तर नामशेषच झाला आहे. त्यामुळे जनावरांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण होतो. कावळा, चिमणी, पोपट, हरियाल यासह असंख्य प्रजातीच्या पक्ष्यांचे नैसर्गिक आश्रयस्थाने असलेली झाडे तोडल्या जात आहे. त्यामुळे नेहमी नजरेस पडणारे पक्षांचे थवे आता खूपच कमी ठिकाणी पहावयास मिळतात. आधी गावात दिवसाची सुरूवातच पक्ष्यांच्या किलबिलाटाने व्हायची. मावळतीला पक्षांचे थवे लाल आकाशात विहार करायचे. आता मात्र हे चित्र तुरळकच दिसते.(शहर प्रतिनिधी)