शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

श्वापदांचे हल्ले, नऊ महिन्यांत तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:12 IST

आॅनलाईन लोकमतवर्धा : आधीच मेटाकुटीस आलेल्या ेशेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक असल्याने श्वापदांचे हल्ले नित्याचे झाले आहेत. मागील नऊ महिन्यांत जिल्ह्यात ३२ शेतकरी, शेतमजुरांवर श्वापदांनी हल्ले केले. यात तिघांचा बळी गेला असून २९ जण गंभीर जखमी झाले आहेत. या पिडीतांना वन विभागाकडून ४० लाखांची तात्काळ मदतही ...

ठळक मुद्दे२९ शेतकरी, मजूर जखमी : वनविभागाकडून पीडितांना ४० लाखांची मदत

आॅनलाईन लोकमतवर्धा : आधीच मेटाकुटीस आलेल्या ेशेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक असल्याने श्वापदांचे हल्ले नित्याचे झाले आहेत. मागील नऊ महिन्यांत जिल्ह्यात ३२ शेतकरी, शेतमजुरांवर श्वापदांनी हल्ले केले. यात तिघांचा बळी गेला असून २९ जण गंभीर जखमी झाले आहेत. या पिडीतांना वन विभागाकडून ४० लाखांची तात्काळ मदतही करण्यात आली आहे.जिल्ह्यात जंगलाचा भूभाग मोठ्या प्रमाणात आहेत. आठ वनपरिक्षेत्रामध्ये वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, हिंगणी, तळेगाव व खरांगणा यांचा समावेश आहे. या वनपरिक्षेत्रात मागील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत वन्यप्राण्यांनी ३२ शेतकरी, मजुरांवर हल्ले केले. यात आर्वी, आष्टी व समुद्रपूर या तीनही परिक्षेत्रात प्रत्येकी एका शेतकºयाला जीव गमवावा लागला. आर्वी परिक्षेत्रातील एक, आष्टीतील तीन, समुद्रपुरातील चार, हिंगणीतील तीन, तळेगावातील पाच तर वर्धा परिक्षेत्रातील १३ असे एकूण २९ जण जखमी झाले आहेत. सोबतच वन्यप्राण्यांमुळे या आठही परिक्षेत्रात २ हजार २२८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. श्वापदांच्या हल्ल्यात तब्बल १२३ जनावरे ठार झालीत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भरपाईसाठी रितसर वनविभागाकडे अर्ज केले असता त्यांना शासनाकडून नुकसान भरपाईही देण्यात आली आहे. यात मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी ८ लाख याप्रमाणे २४ लाख रुपये, २९ जखमींना एकूण १५ लाख ७४ हजार ७५ रुपयाची मदत देण्यात आली. शिवाय गुरांच्या मृत्यू प्रकरणीही भरपाई देण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.शेतपिकांचेच केले अधिक नुकसानवन्यप्राण्यांच्या हैदोसाने जिल्ह्यात सर्वाधिक शेती पिकांचेच नुकसान झाले आहे. आठही परिक्षेत्रात एकूण २ हजार २२८ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्यांना नुकसानीपोटी शासनाकडून १ कोटी १२ लाख ५४ हजार ७४५ रुपयांची मदत देण्यात आली आहे.