शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दोन दिवसांत ४०० कोटींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वेतन वाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील अधिकारी व कर्मचारी बुधवारपासून दोन दिवसाच्या देशव्यापी संपावर गेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील ५०० वर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. परिणामी, दोन दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ४०० कोटींवर व्यवहार ठप्प झाले आहेत. या संपाचा फटका जिल्ह्यातील बँक खातेदार तथा शेतकऱ्यांना बसला आहे. बँका ...

ठळक मुद्देबँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका : ५०० कर्मचारी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वेतन वाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील अधिकारी व कर्मचारी बुधवारपासून दोन दिवसाच्या देशव्यापी संपावर गेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील ५०० वर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. परिणामी, दोन दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ४०० कोटींवर व्यवहार ठप्प झाले आहेत. या संपाचा फटका जिल्ह्यातील बँक खातेदार तथा शेतकऱ्यांना बसला आहे. बँका बंद असल्याने एटीएमचे ट्रान्झेक्शनही प्रभावित झाल्याचे दिसून आले.जिल्ह्यात शासकीय ३० बँका असून लहान-मोठ्या बँका मिळून १४७ शाखा कार्यरत आहेत. शिवाय नागरिकांना तत्पर सेवा मिळावी म्हणून जिल्ह्यात १७७ एटीएम सुरू करण्यात आलेले आहेत. बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारल्याने या सर्व बँका तथा गुरूवारी बहुतांश एटीएमचे व्यवहारही ठप्प झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये असलेल्या शासकीय बँकेचे एका दिवसाचे रोखीचे व्यवहार सुमारे ५ कोटी रुपये आहेत. याचा हिशेब केल्यास दोन दिवसांत ३० बँकांच्या माध्यमातून सुमारे ४०० कोटी रुपयांचे व्यवहार प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारपासून बँका बंद असल्याने गुरूवारी जवळपास सर्वच एटीएममधील रोकड संपल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यामुळे एटीएमच्या माध्यमातून होणारे व्यवहारही गुरूवारी ठप्प झाल्याचे दिसून आले. बँका बंद आणि एटीएममध्ये ठणठणाट यामुळे नागरिकांची मात्र दाणादाण होत आहे.वर्धा शहरातील बँक आॅफ इंडिया, भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र यासह अन्य सरकारी बँकांचे कामकाज ठप्प होते. या संपामुळे ग्राहकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला. ९ युनियनच्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने या संपाची नोटीस दिली होती. या संपामुळे नोकरदार, पेन्शनर, शेतकरी, उद्योग, व्यापार क्षेत्रातील सर्वांनाच फटका बसला. बुधवारी बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध नोंदविला. देशभरातील ५ हजार ५०० शाखांतील कामकाज बंद असल्याची माहिती यावेळी संपकर्त्या कर्मचाºयांनी दिली.आॅनलाईन ट्रान्झेक्शनचा आधारमागील काही वर्षांत बँकांच्या आॅनलाईन व्यवहारांवर अधिक भर देण्यात आला आहे. यामुळे बऱ्यांच नागरिक या व्यवहारांना पसंती देताना दिसतात. अधिकृत व्यवहार आॅनलाईनच्या माध्यमातून सुरळीत पार पडत आहेत. रोख रकमेचे काम नसलेल्या नागरिकांनी दोन दिवस धनादेश व रोखीचे व्यवहार टाळून इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींगसह अन्य पर्यायांच्या माध्यमातून देवाण-घेवाण पूर्ण केल्याचे दिसून आले.

टॅग्स :Strikeसंप