शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

दोन दिवसांत ४०० कोटींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वेतन वाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील अधिकारी व कर्मचारी बुधवारपासून दोन दिवसाच्या देशव्यापी संपावर गेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील ५०० वर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. परिणामी, दोन दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ४०० कोटींवर व्यवहार ठप्प झाले आहेत. या संपाचा फटका जिल्ह्यातील बँक खातेदार तथा शेतकऱ्यांना बसला आहे. बँका ...

ठळक मुद्देबँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका : ५०० कर्मचारी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वेतन वाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील अधिकारी व कर्मचारी बुधवारपासून दोन दिवसाच्या देशव्यापी संपावर गेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील ५०० वर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. परिणामी, दोन दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ४०० कोटींवर व्यवहार ठप्प झाले आहेत. या संपाचा फटका जिल्ह्यातील बँक खातेदार तथा शेतकऱ्यांना बसला आहे. बँका बंद असल्याने एटीएमचे ट्रान्झेक्शनही प्रभावित झाल्याचे दिसून आले.जिल्ह्यात शासकीय ३० बँका असून लहान-मोठ्या बँका मिळून १४७ शाखा कार्यरत आहेत. शिवाय नागरिकांना तत्पर सेवा मिळावी म्हणून जिल्ह्यात १७७ एटीएम सुरू करण्यात आलेले आहेत. बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारल्याने या सर्व बँका तथा गुरूवारी बहुतांश एटीएमचे व्यवहारही ठप्प झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये असलेल्या शासकीय बँकेचे एका दिवसाचे रोखीचे व्यवहार सुमारे ५ कोटी रुपये आहेत. याचा हिशेब केल्यास दोन दिवसांत ३० बँकांच्या माध्यमातून सुमारे ४०० कोटी रुपयांचे व्यवहार प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारपासून बँका बंद असल्याने गुरूवारी जवळपास सर्वच एटीएममधील रोकड संपल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यामुळे एटीएमच्या माध्यमातून होणारे व्यवहारही गुरूवारी ठप्प झाल्याचे दिसून आले. बँका बंद आणि एटीएममध्ये ठणठणाट यामुळे नागरिकांची मात्र दाणादाण होत आहे.वर्धा शहरातील बँक आॅफ इंडिया, भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र यासह अन्य सरकारी बँकांचे कामकाज ठप्प होते. या संपामुळे ग्राहकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला. ९ युनियनच्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने या संपाची नोटीस दिली होती. या संपामुळे नोकरदार, पेन्शनर, शेतकरी, उद्योग, व्यापार क्षेत्रातील सर्वांनाच फटका बसला. बुधवारी बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध नोंदविला. देशभरातील ५ हजार ५०० शाखांतील कामकाज बंद असल्याची माहिती यावेळी संपकर्त्या कर्मचाºयांनी दिली.आॅनलाईन ट्रान्झेक्शनचा आधारमागील काही वर्षांत बँकांच्या आॅनलाईन व्यवहारांवर अधिक भर देण्यात आला आहे. यामुळे बऱ्यांच नागरिक या व्यवहारांना पसंती देताना दिसतात. अधिकृत व्यवहार आॅनलाईनच्या माध्यमातून सुरळीत पार पडत आहेत. रोख रकमेचे काम नसलेल्या नागरिकांनी दोन दिवस धनादेश व रोखीचे व्यवहार टाळून इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींगसह अन्य पर्यायांच्या माध्यमातून देवाण-घेवाण पूर्ण केल्याचे दिसून आले.

टॅग्स :Strikeसंप