शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राजस्थानी करतात पाण्याचे उत्कृष्ट नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:57 IST

माहेश्वरी समाजाचे मूळ राजस्थान असून देशातील विविध प्रांतात तो विखुरलेला आहे. राजस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठे आहे. असे असतानाही राजस्थानी नागरिक पाण्याचे उत्कृष्ट नियोजन करतात. पुरातन विहिरी, बावडी त्यांचीच देण आहे.

ठळक मुद्देसचिन पावडे । माहेश्वरी मंडळाद्वारे वंशोत्पत्ती दिनानिमित्त पाणीसमस्येवर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : माहेश्वरी समाजाचे मूळ राजस्थान असून देशातील विविध प्रांतात तो विखुरलेला आहे. राजस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठे आहे. असे असतानाही राजस्थानी नागरिक पाण्याचे उत्कृष्ट नियोजन करतात. पुरातन विहिरी, बावडी त्यांचीच देण आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत प्रत्येकाने पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरवावा, भविष्यातील जलसंकटावर मात करावी, असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष, जलदूत डॉ. सचिन पावडे यांनी केले.माहेश्वरी मंडळाद्वारे समाजाच्या ५१५२ व्या वंशोत्पत्ती दिनाच्या औचित्याने जलसंकटावर व्याख्यान, रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.डॉ. पावडे म्हणाले, भूगर्भातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. दुसरीकडे सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक यामुळे पाणी जमिनीत न जिरता थेट वाहून जाते. यामुळेच जलसंकट गडद होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. जलबचतीकरिता जलपुनर्भरणाचे महत्त्व विशद करून प्रत्येकाने याकरिता पुढाकार घ्यावा, असे सांगितले. यावेळी परमानंद तापडिया यांच्या हस्ते डॉ. पावडे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.व्याख्यानापूर्वी लोकेश कुलधरिया, प्रकाश राठी यांच्या संयोजनात आयोजित शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा ओमप्रकाश पसारी, हर्षा टावरी, सूर्यप्रकाश गांधी, दामोदर दरक, मदनलाल मोहता, अमित टावरी, हरीश टावरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नितीन मुंदडा यांच्या नेतृत्वात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यात समाजबांधवांचा मोठा सहभाग होता. यात्रेतून बालकांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. शोभायात्रेदरम्यान ‘जय महेश’च्या घोषणेने आसमंत निनादला होता. महेश रथावर शिवपार्वती विराजमान होते. मंडळाचे समन्वयक राजकुमार जाजू यांनी प्रास्ताविक, तर संचालन गीतेश चांडक यांनी केले. उमेश टावरी यांनी आभार मानले. आयोजनाकरिता संजय टावरी, प्रशांत तापडिया, विनोद राठी, अजय गांधी, चेतन लढ्ढा, अमित गांधी, विजय राठी, दीपा टावरी, दिव्या मोहता, राजेश टावरी, मुकुल भुतडा, ओम केला, आशीष पनपालिया आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Waterपाणी