शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
6
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
7
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
8
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
9
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
10
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
11
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
12
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
13
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
14
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
15
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
16
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
17
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
18
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
19
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
20
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

स्वच्छ भारत अभियानास रिक्त भूखंडधारकांची बगल

By admin | Updated: February 5, 2017 00:39 IST

मोठा गाजावाजा करून केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबवित आहे. शहर वा ग्रामीण

सार्वजनिक आरोग्य धोक्यात : साचलेला कचरा व घाणीमुळे दुर्गंधी कारंजा (घा.) : मोठा गाजावाजा करून केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबवित आहे. शहर वा ग्रामीण स्तरावरील प्रशासनही त्यासाठी प्रयत्नशील आहे. विविध कार्यक्रम घेऊन जनप्रबोधन केले जात आहे; पण सामाजिक कर्तव्याची जाण नसलेल्या अनेक नागरिकांद्वारे या अभियानाला खो दिला जात आहे. जेथे खुली जागा दिसेल, तेथे कचरा टाकणे आमचा हक्क आहे, या भावनेने अनेक नागरिक रिकाम्या भूखंडामध्ये कोरडा व ओला कचरा टाकून आजारांना निमंत्रण देत असल्याचे दिसते. वॉर्ड क्रमांक ८ मध्ये गुरूकूल कॉन्व्हेंटच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या रिकाम्या भूखंडात आजूबाजूचे नागरिक केरकचरा व घरातील ओला कचरा टाकतात. भूखंड पूर्णत: कचऱ्याने भरून सर्वत्र घाण पसरली आहे. विशेष बाब म्हणजे या भूखंडावर आधी खूप झाडे-झुडपे वाढली होती. बाजूच्या कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना किडे व सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण झाला होता. नागरिकांनी नगरपंचायतकडे तक्रार केली. संबंधित मालकांकडून हा भूखंड स्वच्छ करून घ्यावा, अशी विनंती केली; पण मालकाने भूखंडाची झाडे-झुडपे काढून स्वच्छता न करता नगरपंचायतने झाडे-झुडपे काढली. कापलेली झाडे, पाला-पाचोळा, कचरा दोन महिन्यांपासून तेथेच पडून आहे. मालकाच्या निदर्शनास आणूनही मालकाकडून स्वच्छता अभियानाला बगल दिली जात आहे. भूखंड मालकाचा शोध घेऊन नगरपंचायतने समज द्यावा व हा कचरा स्वच्छ करण्यास सांगावे वा नगरपंचायतने या गंभीर बाबीकडे लक्ष देत भूखंड स्वच्छ करावा, अशी मागणी आहे. शहरातील इतरही अनेक ले-आऊटमध्ये खासगी मालकीचे रिकामे भूखंड आहेत. या भूखंडाचा सर्रास कचरा-कुंडी, कचरा घर म्हणून वापर होत आहे. झाडे-झुडपे वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे. भूखंड रिकामा असल्याने कुणीही येथे सहजपणे कचरा टाकतात. घाण पसरते. नगर पंचायत प्रशासनाने या रिकाम्या भूखंड धारकांना नोटीस देत भूखंड स्वच्छ राखण्यास सांगावा. ऐकत नसतील तर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी आहे. दररोज केरकचरा टाकण्यासाठी मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या नगरपंचायतने उपलब्ध करून द्यावात. रिकाम्या प्लॉटवर कचरा टाकणाऱ्यांवर कार्यवाही करावी. खासगी भूखंड संबंधितांकडून स्वच्छ करून घ्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी) ‘ओपन स्पेस’वरही कचराच शहरातील ले-आऊटमध्ये जनतेच्या उपयोगीतेसाठी ‘ओपन स्पेस’ सोडण्यात आले आहे; पण या जागेच्या सभोवताल तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने तारांचे कुंपण केले नव्हते. यामुळे या जागांवर काही ठिकाणी अतिक्रमण तर कुठे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आता शहरात नगरपंचायत अस्तित्वात असल्याने प्रशासनाने या सर्व जागा तारांचे कुंपण करून ताब्यात घ्याव्या. या जागांचे सौंदर्यीकरण व विकास करावा. नगर पंचायत प्रशासनाने या उपाययोजना केल्यास आपोआपच खुल्या जागांवरील अतिक्रमण थांबेल आणि कचऱ्याचे साम्राज्यही कमी होईल, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.