शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
2
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
3
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
4
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
5
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
6
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
7
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
8
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
9
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
10
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
11
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
12
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
13
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
14
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
15
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
16
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
17
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
18
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
19
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
20
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष

स्वच्छ भारत अभियानास रिक्त भूखंडधारकांची बगल

By admin | Updated: February 5, 2017 00:39 IST

मोठा गाजावाजा करून केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबवित आहे. शहर वा ग्रामीण

सार्वजनिक आरोग्य धोक्यात : साचलेला कचरा व घाणीमुळे दुर्गंधी कारंजा (घा.) : मोठा गाजावाजा करून केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबवित आहे. शहर वा ग्रामीण स्तरावरील प्रशासनही त्यासाठी प्रयत्नशील आहे. विविध कार्यक्रम घेऊन जनप्रबोधन केले जात आहे; पण सामाजिक कर्तव्याची जाण नसलेल्या अनेक नागरिकांद्वारे या अभियानाला खो दिला जात आहे. जेथे खुली जागा दिसेल, तेथे कचरा टाकणे आमचा हक्क आहे, या भावनेने अनेक नागरिक रिकाम्या भूखंडामध्ये कोरडा व ओला कचरा टाकून आजारांना निमंत्रण देत असल्याचे दिसते. वॉर्ड क्रमांक ८ मध्ये गुरूकूल कॉन्व्हेंटच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या रिकाम्या भूखंडात आजूबाजूचे नागरिक केरकचरा व घरातील ओला कचरा टाकतात. भूखंड पूर्णत: कचऱ्याने भरून सर्वत्र घाण पसरली आहे. विशेष बाब म्हणजे या भूखंडावर आधी खूप झाडे-झुडपे वाढली होती. बाजूच्या कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना किडे व सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण झाला होता. नागरिकांनी नगरपंचायतकडे तक्रार केली. संबंधित मालकांकडून हा भूखंड स्वच्छ करून घ्यावा, अशी विनंती केली; पण मालकाने भूखंडाची झाडे-झुडपे काढून स्वच्छता न करता नगरपंचायतने झाडे-झुडपे काढली. कापलेली झाडे, पाला-पाचोळा, कचरा दोन महिन्यांपासून तेथेच पडून आहे. मालकाच्या निदर्शनास आणूनही मालकाकडून स्वच्छता अभियानाला बगल दिली जात आहे. भूखंड मालकाचा शोध घेऊन नगरपंचायतने समज द्यावा व हा कचरा स्वच्छ करण्यास सांगावे वा नगरपंचायतने या गंभीर बाबीकडे लक्ष देत भूखंड स्वच्छ करावा, अशी मागणी आहे. शहरातील इतरही अनेक ले-आऊटमध्ये खासगी मालकीचे रिकामे भूखंड आहेत. या भूखंडाचा सर्रास कचरा-कुंडी, कचरा घर म्हणून वापर होत आहे. झाडे-झुडपे वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे. भूखंड रिकामा असल्याने कुणीही येथे सहजपणे कचरा टाकतात. घाण पसरते. नगर पंचायत प्रशासनाने या रिकाम्या भूखंड धारकांना नोटीस देत भूखंड स्वच्छ राखण्यास सांगावा. ऐकत नसतील तर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी आहे. दररोज केरकचरा टाकण्यासाठी मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या नगरपंचायतने उपलब्ध करून द्यावात. रिकाम्या प्लॉटवर कचरा टाकणाऱ्यांवर कार्यवाही करावी. खासगी भूखंड संबंधितांकडून स्वच्छ करून घ्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी) ‘ओपन स्पेस’वरही कचराच शहरातील ले-आऊटमध्ये जनतेच्या उपयोगीतेसाठी ‘ओपन स्पेस’ सोडण्यात आले आहे; पण या जागेच्या सभोवताल तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने तारांचे कुंपण केले नव्हते. यामुळे या जागांवर काही ठिकाणी अतिक्रमण तर कुठे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आता शहरात नगरपंचायत अस्तित्वात असल्याने प्रशासनाने या सर्व जागा तारांचे कुंपण करून ताब्यात घ्याव्या. या जागांचे सौंदर्यीकरण व विकास करावा. नगर पंचायत प्रशासनाने या उपाययोजना केल्यास आपोआपच खुल्या जागांवरील अतिक्रमण थांबेल आणि कचऱ्याचे साम्राज्यही कमी होईल, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.