शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

खड्ड्यात लावली बेशरमची झाडे

By admin | Updated: September 8, 2016 00:48 IST

शहरातील व शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होते आहेत.

रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी : रायुकाँचे अभिनव आंदोलन, बांधकाम विभागाला निवेदनवर्धा : शहरातील व शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होते आहेत. वर्धा-नागपूर, आर्वी-वर्धा हिंगणघाट-वर्धा व सावंगी मार्ग अशा महत्वाच्या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या समस्येकडे जिल्हा बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खड्ड्यांत बेशरमची झाडे लावून अभिनव आंदोलन करण्यात आले. तसेच रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभिअयंता चौधरी आणि जि. प. बांधकाम विभागाला बुधवारी निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील बहुतेक मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असतानाही बांधकाम विभागाद्वारे केवळ मुरूम टाकून तात्पुरती डागडूजी करण्यात येत आहे. दोनच दिवसात खड्डं्यामधील मुरूम निघून रस्ता पुन्हा जैसे थेच होतो. त्यामुळे सदर रस्ते कायमस्वरूपी बांधण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. बांधकाम विभागाला खड्डं्याचे गांभीर्य कळावे यासाठी दत्तपूर बायपास जवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यांत रायुकार् कार्यकर्त्यांनी बेशरमची झाडे लावून निषेधही व्यक्त केला. स्मार्ट सिटी, स्मार्ट रस्ते अशा घोषणा शासनाद्वारे केल्या जात आहेत. प्रत्यक्षात रस्त्यांची काय अवस्था आहे हे पाहणे आधी गरजेचे आहे. जिल्ह्यात दररोज अपघात होत आहेत. खड्डेमय रस्ते हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. बांधकाम विभागाने गंभीरपणे याकडे लक्ष देण्याची गरज निवेदनातून व्यक्त करण्यात आली. गरजेचे आहे. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे, वैभव चन्ने, अर्चित निघडे, राहुल घोडे, तुषार भुते, आशु बढे, योगेश पवार, सचिन रायपुरे, हेमंत कडू, सुयोग बिरे, आकाश चौधरी, विक्की खडसे, अक्षय गावंडे, संकेत निस्ताने, अमीत तिवारी, अभिषेक वडतकर, अमीत लुंगे, निलेश जांभुळकर, प्रणय कदम, प्रणव सडमाके, वैभव चौधरी, मंगेश गावंडे, वैभव गांजे यांच्यासह इतरही कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)