शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

१,७४८ शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:01 IST

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सुक्ष्मसिंचन सुरू करण्यात आले. यंदा जिल्ह्यातील ७ हजार २९१ शेतकऱ्यांनी सुक्ष्मसिंचन संच बसविण्यासाठी आॅनलाईन अर्ज केले.

ठळक मुद्दे७,२९१ शेतकऱ्यांचे आॅनलाईन अर्ज : उत्पन्न वाढ शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सुक्ष्मसिंचन सुरू करण्यात आले. यंदा जिल्ह्यातील ७ हजार २९१ शेतकऱ्यांनी सुक्ष्मसिंचन संच बसविण्यासाठी आॅनलाईन अर्ज केले. त्यापैकी ३ हजार ८१५ शेतकऱ्यांना आॅनलाईन पूर्व संमती देण्यात आली असून १ हजार ७४८ शेतकऱ्यांना ठिंबक संच खरेदीसाठी ३ कोटी ४२ लाख ६४ हजार रूपयाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. यातून उत्पन्न वाढ करण्याचे ध्येय आहे.पाण्याची बचत करण्याचा उद्देश यातून साध्य होणार आहे. कमीतकमी पाण्यात जास्तीत जास्तउत्पादन घेण्यासाठी प्रधानमंत्री यांनी ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ या विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (सुक्ष्मसिंचन) सुरू केली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन २०१७-१८ करिता अल्प व अत्यल्प लाभार्थी शेतकºयांसाठी ५५ टक्के व इतर लाभार्थी शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यावर्षी भौतिक क्षेत्र मर्यादा ५ हेक्टर करण्यात आली आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ मार्च असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले आहे.जिल्ह्यातील ३ हजार ८१५ शेतकऱ्यांना आॅनलाईन पूर्वसंमती देण्यात आली आहे. पूर्वसंमती प्राप्त शेतकºयांनी १५ दिवसाच्या आत सुक्ष्मसिंचन संच प्रत्यक्ष शेतात बसविणे आवश्यक आहे. यासाठी संचाची उभारणी केल्यानंतर वितरकांकडून संपूर्ण प्रस्ताव शेतकऱ्यांनी तयार करून अग्रीम देयके आॅनलाईन पध्दतीने प्रणालीवर अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच संपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे. परंतु बरेचसे शेतकरी हे वितरकांवर अवलंबून राहतात. त्यामुळे प्रस्ताव वेळेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर होत नाही. त्यामुळे अनुदान मिळण्यास विलंब होतो. अनेकदा अनुदान न मिळाल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी वितरकांकडून केलेल्या कार्यवाहीबाबत जागरुक राहुन वेळेत प्रस्ताव सादर केल्यास अनुदान मिळण्यास विलंब होणार नाही, असे अधीक्षक भारती यांनी सांगितले.मागील वर्षीच्या अर्जामध्ये काही शेतकऱ्यांचे खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड आॅनलाईन चुकीचा भरल्यामुळे अद्यापही सुमारे २०० प्रस्तावाचे अनुदान खात्यावर प्रलंबीत आहे. अशा शेतकऱ्यांनी सन २०१६-१७ चे अनुदान मिळण्यासाठी संपूर्ण बॅँक तपशील तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावा. यामुळे शेतकऱ्यांचे तांत्रिक अडचणीमुळे परत आलेले अनुदान बॅँक खात्यात जमा करता येईल, असे आवाहन भारती यांनी केले.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाजिल्ह्यात आतापर्यंत ८ कोटी ८० लाख रूपयांची पूर्व संमती देऊनही शेतकरी व वितरक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाले नाही. पूर्व संमती प्राप्त शेतकऱ्यांनी सुक्ष्मसिंचन संच बसविण्यासाठी प्रस्ताव त्वरीत सादर केल्यास मार्च २०१८ अखेर प्रस्तावाचे अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.