शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

४,५४६ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ

By admin | Updated: July 9, 2014 23:40 IST

शासनाने मागील वर्षी जाहीर केलेली राष्ट्रीय पीक विमा २०१३ या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५४६ शेतकऱ्यांना

राष्ट्रीय पीक विमा योजना २०१३ ला मंजुरीहर्षल तोटे - पवनारशासनाने मागील वर्षी जाहीर केलेली राष्ट्रीय पीक विमा २०१३ या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५४६ शेतकऱ्यांना राष्ट्रीय पीक विम्याची रक्कम प्राप्त होणार आहे़ २०१३ च्या खरीपामध्ये कपाशी, तूर व सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता़ अतिवृष्टी व गारपिटीमुळे खरीपाचे अतोनात नुकसान झाले़ यामुळे आणेवारी ५० पैशांच्या आत व उंबरठा उत्पन्नही ६० टक्क्यांच्या आत होते़ तेव्हा विमा मिळावा म्हणून अत्यंत आरडा-ओरड झाली़ यामुळे विमा कंपनीने विमा देण्याचे जाहीर केले आहे़ विमा मंजुरीसाठी मागील तीन वर्षाचे सरासरी उत्पन्न व यावर्षीचे उत्पन्न याचा गोषवारा काढून नुकसानीची पातळी किती टक्के आहे, कृषी खात्याचा सर्व्हे व महसूल विभागाने दिलेली आणेवारी लक्षात घेत विम्याची रक्कम ठरविली जाते; पण हे सुत्र पटण्यासारखे नाही़ जिल्ह्यात आष्टी व हिंगणघाट तालुका पीक विम्यातून वगळलेला दिसतो. यामुळे आष्टी २ हजार ३२५ तर हिंगणघाट विभागात ४ हजार ५४६ शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीन पिकासाठी विमा उतरविला होता; पण विम्यापोटी त्यांना एक छदामही मिळणार नाही. आर्वी महसूल विभागात १ हजार २०७ शेतकऱ्यांनी विमा उतरविला असून पैकी केवळ ११४ शेतकऱ्यांना तूर पिकासाठी विमा देण्याचे मंजूर करण्यात आले. देवळी महसूल विभागात ३ हजार ९५८ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता, पैकी ७६७ शेतकऱ्यांना सोयाबिनसाठी व ३११ शेतकऱ्यांना तूर पिकासाठी मंजुरी देण्यात आली. कारंजा विभाग ३ हजार ४३९ पैकी १०२ शेतकऱ्यांना तूर पिकासाठी विम्याची रक्कम देण्यात येणार आहे. समुद्रपूर विभागात १२ हजार ९३२ पैकी केवळ १९१ शेतकरी लाभार्थी ठरत आहे. सेलूमध्ये ४ हजार १३८ पैकी तुरीकरिता ४ व १ हजार ९५३ शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. वर्धा विभागात ३ हजार ५०२ शेतकऱ्यांनी विमा उतरविला़ पैकी कपाशी ३०, तूर ४३ व १ हजार ३१ शेतकऱ्यांना सोयाबीनची मदत दिली जाणार आहे.सोयाबीनला हेक्टरी १४ हजार ५०० व कपाशीला २४ हजार एवढी नुकसान भरपाई देण्यात येणार होती; पण मंजुरी देताना अल्प रक्कम देण्यात येणार आहे. एवढे नुकसान होऊनही अल्प मदत देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी राष्ट्रीय विमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसते़ २०१४-१५ च्या खरीप पिकासाठी कृषी कर्ज धारकांना पीक विमा काढण्याची सक्ती करण्यात आली आहे़ तसा फतवाही शासनाने काढला आहे. गत काही वर्षात अब्जो रुपये जमा करणाऱ्या विमा कंपन्या, विमा द्यायचे काम पडल्यास हात आखडता घेत असल्याने शेतकरी विमा काढण्यास नकार देतात़ २०१४ मध्ये पाऊस लांबल्याने यावर्षीचे कृषी कर्ज वसूल होईल की नाही, ही चिंता बँकांना वाटत असल्याचे दिसते़