शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

४,५४६ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ

By admin | Updated: July 9, 2014 23:40 IST

शासनाने मागील वर्षी जाहीर केलेली राष्ट्रीय पीक विमा २०१३ या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५४६ शेतकऱ्यांना

राष्ट्रीय पीक विमा योजना २०१३ ला मंजुरीहर्षल तोटे - पवनारशासनाने मागील वर्षी जाहीर केलेली राष्ट्रीय पीक विमा २०१३ या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५४६ शेतकऱ्यांना राष्ट्रीय पीक विम्याची रक्कम प्राप्त होणार आहे़ २०१३ च्या खरीपामध्ये कपाशी, तूर व सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता़ अतिवृष्टी व गारपिटीमुळे खरीपाचे अतोनात नुकसान झाले़ यामुळे आणेवारी ५० पैशांच्या आत व उंबरठा उत्पन्नही ६० टक्क्यांच्या आत होते़ तेव्हा विमा मिळावा म्हणून अत्यंत आरडा-ओरड झाली़ यामुळे विमा कंपनीने विमा देण्याचे जाहीर केले आहे़ विमा मंजुरीसाठी मागील तीन वर्षाचे सरासरी उत्पन्न व यावर्षीचे उत्पन्न याचा गोषवारा काढून नुकसानीची पातळी किती टक्के आहे, कृषी खात्याचा सर्व्हे व महसूल विभागाने दिलेली आणेवारी लक्षात घेत विम्याची रक्कम ठरविली जाते; पण हे सुत्र पटण्यासारखे नाही़ जिल्ह्यात आष्टी व हिंगणघाट तालुका पीक विम्यातून वगळलेला दिसतो. यामुळे आष्टी २ हजार ३२५ तर हिंगणघाट विभागात ४ हजार ५४६ शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीन पिकासाठी विमा उतरविला होता; पण विम्यापोटी त्यांना एक छदामही मिळणार नाही. आर्वी महसूल विभागात १ हजार २०७ शेतकऱ्यांनी विमा उतरविला असून पैकी केवळ ११४ शेतकऱ्यांना तूर पिकासाठी विमा देण्याचे मंजूर करण्यात आले. देवळी महसूल विभागात ३ हजार ९५८ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता, पैकी ७६७ शेतकऱ्यांना सोयाबिनसाठी व ३११ शेतकऱ्यांना तूर पिकासाठी मंजुरी देण्यात आली. कारंजा विभाग ३ हजार ४३९ पैकी १०२ शेतकऱ्यांना तूर पिकासाठी विम्याची रक्कम देण्यात येणार आहे. समुद्रपूर विभागात १२ हजार ९३२ पैकी केवळ १९१ शेतकरी लाभार्थी ठरत आहे. सेलूमध्ये ४ हजार १३८ पैकी तुरीकरिता ४ व १ हजार ९५३ शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. वर्धा विभागात ३ हजार ५०२ शेतकऱ्यांनी विमा उतरविला़ पैकी कपाशी ३०, तूर ४३ व १ हजार ३१ शेतकऱ्यांना सोयाबीनची मदत दिली जाणार आहे.सोयाबीनला हेक्टरी १४ हजार ५०० व कपाशीला २४ हजार एवढी नुकसान भरपाई देण्यात येणार होती; पण मंजुरी देताना अल्प रक्कम देण्यात येणार आहे. एवढे नुकसान होऊनही अल्प मदत देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी राष्ट्रीय विमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसते़ २०१४-१५ च्या खरीप पिकासाठी कृषी कर्ज धारकांना पीक विमा काढण्याची सक्ती करण्यात आली आहे़ तसा फतवाही शासनाने काढला आहे. गत काही वर्षात अब्जो रुपये जमा करणाऱ्या विमा कंपन्या, विमा द्यायचे काम पडल्यास हात आखडता घेत असल्याने शेतकरी विमा काढण्यास नकार देतात़ २०१४ मध्ये पाऊस लांबल्याने यावर्षीचे कृषी कर्ज वसूल होईल की नाही, ही चिंता बँकांना वाटत असल्याचे दिसते़