शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांनाही घरकूल

By admin | Updated: September 8, 2016 00:40 IST

केंद्र शासनामार्फत १९९५ पासून ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल देण्यात येत होते.

प्रधानमंत्री आवास योजना : लाभार्थी यादीला ग्रामसभेची मंजूरीवर्धा : केंद्र शासनामार्फत १९९५ पासून ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल देण्यात येत होते. या वर्षीपासून ही योजना प्रधानमंत्री आवास योजना म्हणून राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटूंबासोबतच दारिद्र्य रेषेवरील कुटूंबांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाचे ६० टक्के तर राज्य शासनाचे ४० टक्के अनुदान मिळणार आहे. ९५ हजार रूपये या पूर्वीच्या घरकुल किमतीत वाढ करून या योजनेत सध्या १ लाख २० हजार रूपये लाभार्थ्यांना मिळतील. याशिवाय महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून १६ हजार २८९ रूपये व निर्मल भारत अभियानातून १२ हजार रूपये शौचालय बांधण्यासाठी प्रतिघरकुल लाभार्थ्याला देण्यात येईल. असे एकूण १ लाख ४८ हजार रूपये घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेतील लाभार्थ्यांची निवड ही २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणच्या यादीमधून होणार आहे. या यादीमधील लाभार्थ्यांना मान्यता ग्रामसभेने द्यावयाची आहे. त्यासाठी याद्या ग्रामसभेला देण्यात आल्या आहेत. २०१६-१७ या वित्तीय वर्षासाठी जिल्ह्याला २ हजार ४०२ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. घरकुलाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने १३ निकषाची पूर्तता करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे ५ एकरपेक्षा कमी कोरडवाहू शेती, तसेच वर्षातून एक पीक किंवा २.५ एकर पेक्षा कमी ओलीत सुविधा असणारा शेतकरी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटूंबांकडे ७.५ एकर पेक्षा जास्त शेतजमीन नसावी. ५० हजार किंवा त्यावरील रकमेचे क्रेडीट कार्ड नसावे. दोन, तीन किंवा चार चाकी वाहन तसेच मासेमारीची यांत्रिकी बोट नसावी. शासनाकडून नोंदणीकृत कोणताही बिगर शेती व्यवसाय नसावा. मासिक उत्पन्न १० हजार पेक्षा जास्त नसावे. आयकर, व्यवसाय कर भरणारे नसावे. लाभार्थी टेलीफोन धारक नसावा. लाभार्थ्यांकडे फ्रीज नसावा. या १३ निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थींना घरकुलाचा लाभ घेता येणार आहे.(शहर प्रतिनिधी)