शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

राष्ट्रभावनेचे पुन:स्मरण व्हावे

By admin | Updated: August 8, 2014 00:09 IST

राष्ट्र या शब्दाचा अर्थ अलीकडे आमच्या मनातून पुसत चालला आहे. यास पुनर्जिवित करावे लागणार आहे. याकरिता राष्ट्रकवि मैथीलीशरण गुप्त यांच्या ‘भारत भारती’ यासारख्या काव्याची

वर्धा : राष्ट्र या शब्दाचा अर्थ अलीकडे आमच्या मनातून पुसत चालला आहे. यास पुनर्जिवित करावे लागणार आहे. याकरिता राष्ट्रकवि मैथीलीशरण गुप्त यांच्या ‘भारत भारती’ यासारख्या काव्याची नव्या पीढीस ओळख करून देण्याची अत्यंत गरज आहे. कारण भारत भारतीने देशात लोकचैतन्य निर्माण केले आहे. नव्या पीढिस हा विचार देणे गरजेचे आहे, असे विचार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती डॉ. गिरीश्वर मिश्र यांनी व्यक्त केले. ते महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान येथे आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी यावेळी उपस्थित युवकांना राष्ट्रहिताकरिता समर्पण भावाने कार्य करावे, आपली माती व आपल्या भाषेचा स्वाभिमान आपल्याला योग्य मार्गावर नेईल, असे आवाहन केले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शंकरप्रसाद अग्निहोत्री, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे डॉ. एस. एस. पटेल, डॉ. सुरज पालीवाल, डॉ. बी. एस. गर्ग , डॉ. पातोंड उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांनी रचलेले मंगलचरण सादर केले. प्रकाश ठाकरे व संच यांनी मंगलचरण संगीतबद्ध केले होते. यानंतर झालेल्या काव्यगोष्ठी कार्यक्रमात जिल्ह्यातील कवींनी सहभागी होत आपल्या शब्दशैली व प्रस्तुतीकरणाने श्रोत्यांचे मने जिंकली. कविगोष्ठी ची सुरुवात गुप्त यांची लोकप्रिय रचना ‘चारुचंद्र किरणे..’ गायनाने करण्यात आली. या काव्यसंधेत डॉ. राजेश झा, डॉ. वर्षा पुनवटकर, संजय इंगळे तिगांवकर, अहसान राही, कमलकिशोर शर्मा, महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डॉ. हरप्रित कौर, डॉ. अनवर सिद्दीकी, गिरडचे आरीफ काझी, हिंगणघाट मुद्गल इब्राहीम बक्श व कोचर गोल्डी, यवतमाळवरून प्रो. ताकसांडे, सेलूचे प्रा. राजेंद्र मुंडे, सेवाग्रामच्या डॉ. सुमन पांडे व डॉ. अनुपमा यांनी सहभागी होत काव्यपाठ सादर केले. यावेळी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमात आयोजन समितीचे प्रमुख डॉ. ओ. पी. गुप्ता यांनी प्रास्ताविकात मागील १७ वर्षापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान विद्यार्थी परिषद यांच्यावतीने आयोजित राष्ट्रकवि स्मृति स्वरचित हिन्दी काव्य पाठ स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुपमा यांनी केले तर आभार डॉ. दिलीप गुप्ता यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाला विद्यार्थी, आयोजन समितीचे सदस्य व आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)