शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:05 IST

जीर्ण झालेल्या अत्यंत धोकादायक शासकीय इमारती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडून टाकाव्या. नैसर्गिक आपत्तीत जीव वाचवणारी आवश्यक साधने जसे बोट, लाईफ जॅकेट्स, दोर आदी साधनांची पूरेशी व्यवस्था करण्याससह ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांत औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा.

ठळक मुद्देशैलेश नवाल : मान्सूनपूर्व आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जीर्ण झालेल्या अत्यंत धोकादायक शासकीय इमारती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडून टाकाव्या. नैसर्गिक आपत्तीत जीव वाचवणारी आवश्यक साधने जसे बोट, लाईफ जॅकेट्स, दोर आदी साधनांची पूरेशी व्यवस्था करण्याससह ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांत औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुुरूषोत्तम मडावी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के उपस्थित होते.नैसर्गिक आपत्तीच्या काळात कार्यालयात वीज पुरवठा खंडित झाल्यास काम बंद पडू नये यासाठी नादुरूस्त डिझेल इंजिन कार्यालयाने तातडीने दुरूस्त करून घ्यावे. त्यासाठी निधी आवश्यक असल्यास तत्सम मागणी नोंदवावी. उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांत औषधी साठा, डॉक्टरांची चमू, वीज पुरवठा, इमर्जन्सी आॅपरेशन थिएटर तयार ठेवावे. तसेच रुग्णालयाची तात्पुरती डागडुजी करून घ्यावी. यासाठी रुग्णकल्याण समितीला ५ लाख रुपये देण्यात येतील. हे काम रुग्ण कल्याण समितीने करावे. या सर्व रुग्णालयांची तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी पाहणी करून खातरजामा करावी. ग्रामीण भागात अवैध दारू व्यवसायांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच आपत्ती काळात तत्पर कार्य करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ग्रामसुरक्षा दल स्थापन करून जूनच्या पहिल्या आठवड्यात तहसीलदारांनी त्यांची बैठक घ्यावी. सर्व विभाग प्रमुखांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात जबाबदारीने कामे करावी. हलगर्जीपणा करणाºया अधिकाºयावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही नवाल यांनी बैठकीत सांगितले.