शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

अडचणींना धैर्याने सामोरे जा!

By admin | Updated: October 11, 2015 00:28 IST

अन्न सुरक्षा, आरोग्य, शिक्षण सुरक्षा, पाणी, चारा व रोजगाराच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांच्या माध्यमातून पाहोचवित आहे.

वर्धा : अन्न सुरक्षा, आरोग्य, शिक्षण सुरक्षा, पाणी, चारा व रोजगाराच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांच्या माध्यमातून पाहोचवित आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायलाच हवा. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे मनोबल उंचावून आलेल्या अडचणीच्या परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी धैर्याने पुढे येण्याचे आवाहन वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.नागठाणा रोडवरील अग्निहोत्री महाविद्यालयात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांची सद्यस्थिती आणि उपाययोजना यावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, दिलीप अग्रवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक शंकरप्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, तहसीलदार राहुल सारंग, तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड आदी उपस्थित होते.तिवारी म्हणाले शेतकऱ्यांनी मिळणाऱ्या त्यांच्या लाभाचा फायदा करून घेण्यासाठी पुढे यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश दिला. आपण शिकलो, संघटीतही झालो; पण परिस्थितीशी संघर्षासाठी आपण पुढे येत नाहीत, याची खंत वाटते. अडचणीच्या परिस्थितीवर मात करण्याची धमक आपल्या मनगटात असून परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण धैर्याने पुढे यायला हवे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी हिताच्या जलयुक्त शिवार अभियानाची लोकचळवळ उभारली. लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान गावोगावी राबवून शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे, ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. जिल्ह्याचे चित्र पालटण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी संकल्प करून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अधीक्षक कृषी अधिकारी भारती यांनी जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना मिळत असलेला लाभ, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या महत्त्वपूर्ण योजना याबाबत पॉवरपॉर्इंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. अग्निहोत्री यांनी दैविक, भौतिक आणि आत्मिक परिस्थितीचे वर्णन करून शेतकरी अडचणीतून बाहेर पडावा यासाठी येणाऱ्या अडचणींवर नियोजन करून स्थिती बदलण्यासाठी सामोरे जाणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. शेतीप्रधान देशात शेतकरी जगला तरच देशाचा विकास होईल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री यांनी केले. संचालन प्रफुल दाते यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)