शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

अडचणींना धैर्याने सामोरे जा!

By admin | Updated: October 11, 2015 00:28 IST

अन्न सुरक्षा, आरोग्य, शिक्षण सुरक्षा, पाणी, चारा व रोजगाराच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांच्या माध्यमातून पाहोचवित आहे.

वर्धा : अन्न सुरक्षा, आरोग्य, शिक्षण सुरक्षा, पाणी, चारा व रोजगाराच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत शासन योजनांच्या माध्यमातून पाहोचवित आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायलाच हवा. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे मनोबल उंचावून आलेल्या अडचणीच्या परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी धैर्याने पुढे येण्याचे आवाहन वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.नागठाणा रोडवरील अग्निहोत्री महाविद्यालयात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांची सद्यस्थिती आणि उपाययोजना यावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, दिलीप अग्रवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक शंकरप्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, तहसीलदार राहुल सारंग, तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड आदी उपस्थित होते.तिवारी म्हणाले शेतकऱ्यांनी मिळणाऱ्या त्यांच्या लाभाचा फायदा करून घेण्यासाठी पुढे यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश दिला. आपण शिकलो, संघटीतही झालो; पण परिस्थितीशी संघर्षासाठी आपण पुढे येत नाहीत, याची खंत वाटते. अडचणीच्या परिस्थितीवर मात करण्याची धमक आपल्या मनगटात असून परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण धैर्याने पुढे यायला हवे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी हिताच्या जलयुक्त शिवार अभियानाची लोकचळवळ उभारली. लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान गावोगावी राबवून शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे, ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. जिल्ह्याचे चित्र पालटण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी संकल्प करून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अधीक्षक कृषी अधिकारी भारती यांनी जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना मिळत असलेला लाभ, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या महत्त्वपूर्ण योजना याबाबत पॉवरपॉर्इंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. अग्निहोत्री यांनी दैविक, भौतिक आणि आत्मिक परिस्थितीचे वर्णन करून शेतकरी अडचणीतून बाहेर पडावा यासाठी येणाऱ्या अडचणींवर नियोजन करून स्थिती बदलण्यासाठी सामोरे जाणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. शेतीप्रधान देशात शेतकरी जगला तरच देशाचा विकास होईल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री यांनी केले. संचालन प्रफुल दाते यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)