शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! आवळतोय मधुमेहाचा ‘गोड’ पाश

By admin | Updated: November 13, 2014 23:06 IST

भारतात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ६२.४७ टक्क्यांवर पोहचले आहे. जिल्ह्यातही मागील तीन वर्षांत विविध तपासणीत १५ हजार ३०० रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीला नियंत्रणात ठेवण्याकरिता जिल्हा

श्रेया केले - वर्धा भारतात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ६२.४७ टक्क्यांवर पोहचले आहे. जिल्ह्यातही मागील तीन वर्षांत विविध तपासणीत १५ हजार ३०० रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीला नियंत्रणात ठेवण्याकरिता जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून एनसीडी कार्यक्रम राबविण्यात येतो. या अंतर्गत प्रत्येक आरोग्य केंद्र, रुग्णालय, सामान्य रुग्णालय येथे अतिरिक्त कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात असंसर्गजन्य आजार नियंत्रण सेल स्थापन करण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहे. रुग्णांची तपासणी करून यात संशयीत रुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचार, आहार याबाबत समुपदेशन केले जाते. या कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील रुग्णांचे निदान केले जाते. स्क्रीनींगमध्ये रुग्ण आढळल्यास त्याचा पाठपुरावा आरोग्य कर्मचारी घेतात. शिवाय तपासणी मोफत केली जाते. वर्धा जिल्ह्यातून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रुग्णांचे निदान लवकर करण्याकरिता ग्लुकोमीटर डिजीटल बी.पी. अ‍ॅप्रटस असे उपकरणे शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिल्याची माहिती संबंधितांनी दिली.