शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! डेंग्युपासून बचावाकरिता स्वच्छता आणि काळजी महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:20 IST

जिल्ह्यात गत आठवड्यापासून डेंग्युने चांगलेच थैमान घातल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात डेंग्युचा उद्रेक : विरूळात चिमुकल्याचा मृत्यू; जनजागृतीसाठी सामाजिक संघटनाही सरसावल्या

आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून डेंग्युने चांगलेच थैमान घातल्याचे चित्र आहे. आर्वी तालुक्यातील विरूळ येथे एका चिमुकल्याचा या आजारामुळे मृत्यू झाला. तर अन्य काही जण उपचार घेत आहेत. याची माहिती मिळताच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने गावात जात जनतागृती करून नागरिकांवर औषधोपचार सुरू केला आहे. हा आजार होऊ नये म्हणून नागरिकांत जनजागृती गरजेची आहे. वैद्यकीय जनजागृती मंचानेही जनजागृती करणे सुरू केला आहे.डेंग्यु ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंग्युचा प्रसार हा एडीस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. रांजन, सिमेंटचे टाके, इमारती वरील सिंटेक्स टाके, घराभोवतालच्या टाकावू वस्तू जसे प्लास्टिक बकेट, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरूपयोगी टायर्स, इलेक्ट्रॉनिक्स कचरा, शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, कुलर्स, इत्यादीमध्ये साठलेले पाणी यात होत असते. पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास हा डास अंडी घालतात. यानंतर अळ्यांचे रूपांतर डासात होत असते. त्यासाठी पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवू नये, ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या डासाच्या उत्पत्तीला पोषक वातावरण आहे. त्या अनुषंगाने अशा साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्ती डास अंडी घालून डासोत्पत्ती होते. सदरहू डासाची उत्पत्ती कमी करणे नियंत्रणात ठेवणे, यासाठी जनतेला आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असून लोकसहभागाशिवाय डेंग्यु या आजाराचे नियंत्रण शक्य नाही. यामुळे नागरिकांनी वेळीच या आजारावर ताबा मिळविण्याकरिता दिलेल्या उपाययोजना कराव्या असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.डेंग्युची लक्षणेएकाएकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढ उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, रक्त मिश्रीत किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे.घ्यावयाची दक्षताडेंग्यूचा प्रसार करणारे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतात. आपल्या घराच्या परिसरात साचलेले पाणी तर नाही ना?, जसे कुलर, पाण्याची टाकी, पक्षांचे पिण्याचे भांडे, फ्रिजचा ट्रे, फुलदाणी, नारळाच्यास करवंट्या तुटलेले फुटलेले भांडे व टायर इत्यादीत पाणी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.पाण्याची भांडी व टाकी झाकुन ठेवावी. कुलर रिकामे करून कोरडे करावे. डेंग्युचा डास दिवसा चावणारा असल्यामुळे संपूर्ण अंग झाकेल असेच कपडे वापरावे. डेंग्युचा उपचारावर विशेष औषधी किंवा लस उपलब्ध नाही.ताप कमी करण्याकरिता पॅरॉसिटामॉल घेता येते. स्वत: एस्प्रिन व ब्रुफेनचा वापर करू नये, डॉक्टराचा सल्ला घ्यावा. डेंग्युच्या प्रत्येक रूग्णास प्लेटलेटची गरज असते. योग्य उपचार योग्य वेळीच घ्या, उपाशा पोटी औषधोपचार घेऊ नका, मांत्रिक व भोंदु-वैद्यांचा सल्ला टाळा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.