शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
2
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
3
IndiGo Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
4
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
5
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
6
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
7
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
8
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
9
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
10
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
11
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
12
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
13
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
14
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
15
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
16
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
17
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
19
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
20
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?

सावधान ! डेंग्युपासून बचावाकरिता स्वच्छता आणि काळजी महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:20 IST

जिल्ह्यात गत आठवड्यापासून डेंग्युने चांगलेच थैमान घातल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात डेंग्युचा उद्रेक : विरूळात चिमुकल्याचा मृत्यू; जनजागृतीसाठी सामाजिक संघटनाही सरसावल्या

आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून डेंग्युने चांगलेच थैमान घातल्याचे चित्र आहे. आर्वी तालुक्यातील विरूळ येथे एका चिमुकल्याचा या आजारामुळे मृत्यू झाला. तर अन्य काही जण उपचार घेत आहेत. याची माहिती मिळताच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने गावात जात जनतागृती करून नागरिकांवर औषधोपचार सुरू केला आहे. हा आजार होऊ नये म्हणून नागरिकांत जनजागृती गरजेची आहे. वैद्यकीय जनजागृती मंचानेही जनजागृती करणे सुरू केला आहे.डेंग्यु ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंग्युचा प्रसार हा एडीस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. रांजन, सिमेंटचे टाके, इमारती वरील सिंटेक्स टाके, घराभोवतालच्या टाकावू वस्तू जसे प्लास्टिक बकेट, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरूपयोगी टायर्स, इलेक्ट्रॉनिक्स कचरा, शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, कुलर्स, इत्यादीमध्ये साठलेले पाणी यात होत असते. पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास हा डास अंडी घालतात. यानंतर अळ्यांचे रूपांतर डासात होत असते. त्यासाठी पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवू नये, ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या डासाच्या उत्पत्तीला पोषक वातावरण आहे. त्या अनुषंगाने अशा साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्ती डास अंडी घालून डासोत्पत्ती होते. सदरहू डासाची उत्पत्ती कमी करणे नियंत्रणात ठेवणे, यासाठी जनतेला आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असून लोकसहभागाशिवाय डेंग्यु या आजाराचे नियंत्रण शक्य नाही. यामुळे नागरिकांनी वेळीच या आजारावर ताबा मिळविण्याकरिता दिलेल्या उपाययोजना कराव्या असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.डेंग्युची लक्षणेएकाएकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढ उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, रक्त मिश्रीत किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे.घ्यावयाची दक्षताडेंग्यूचा प्रसार करणारे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतात. आपल्या घराच्या परिसरात साचलेले पाणी तर नाही ना?, जसे कुलर, पाण्याची टाकी, पक्षांचे पिण्याचे भांडे, फ्रिजचा ट्रे, फुलदाणी, नारळाच्यास करवंट्या तुटलेले फुटलेले भांडे व टायर इत्यादीत पाणी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.पाण्याची भांडी व टाकी झाकुन ठेवावी. कुलर रिकामे करून कोरडे करावे. डेंग्युचा डास दिवसा चावणारा असल्यामुळे संपूर्ण अंग झाकेल असेच कपडे वापरावे. डेंग्युचा उपचारावर विशेष औषधी किंवा लस उपलब्ध नाही.ताप कमी करण्याकरिता पॅरॉसिटामॉल घेता येते. स्वत: एस्प्रिन व ब्रुफेनचा वापर करू नये, डॉक्टराचा सल्ला घ्यावा. डेंग्युच्या प्रत्येक रूग्णास प्लेटलेटची गरज असते. योग्य उपचार योग्य वेळीच घ्या, उपाशा पोटी औषधोपचार घेऊ नका, मांत्रिक व भोंदु-वैद्यांचा सल्ला टाळा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.