शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सावधान ! डेंग्युपासून बचावाकरिता स्वच्छता आणि काळजी महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:20 IST

जिल्ह्यात गत आठवड्यापासून डेंग्युने चांगलेच थैमान घातल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात डेंग्युचा उद्रेक : विरूळात चिमुकल्याचा मृत्यू; जनजागृतीसाठी सामाजिक संघटनाही सरसावल्या

आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून डेंग्युने चांगलेच थैमान घातल्याचे चित्र आहे. आर्वी तालुक्यातील विरूळ येथे एका चिमुकल्याचा या आजारामुळे मृत्यू झाला. तर अन्य काही जण उपचार घेत आहेत. याची माहिती मिळताच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने गावात जात जनतागृती करून नागरिकांवर औषधोपचार सुरू केला आहे. हा आजार होऊ नये म्हणून नागरिकांत जनजागृती गरजेची आहे. वैद्यकीय जनजागृती मंचानेही जनजागृती करणे सुरू केला आहे.डेंग्यु ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंग्युचा प्रसार हा एडीस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. रांजन, सिमेंटचे टाके, इमारती वरील सिंटेक्स टाके, घराभोवतालच्या टाकावू वस्तू जसे प्लास्टिक बकेट, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरूपयोगी टायर्स, इलेक्ट्रॉनिक्स कचरा, शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, कुलर्स, इत्यादीमध्ये साठलेले पाणी यात होत असते. पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास हा डास अंडी घालतात. यानंतर अळ्यांचे रूपांतर डासात होत असते. त्यासाठी पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवू नये, ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या डासाच्या उत्पत्तीला पोषक वातावरण आहे. त्या अनुषंगाने अशा साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्ती डास अंडी घालून डासोत्पत्ती होते. सदरहू डासाची उत्पत्ती कमी करणे नियंत्रणात ठेवणे, यासाठी जनतेला आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असून लोकसहभागाशिवाय डेंग्यु या आजाराचे नियंत्रण शक्य नाही. यामुळे नागरिकांनी वेळीच या आजारावर ताबा मिळविण्याकरिता दिलेल्या उपाययोजना कराव्या असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.डेंग्युची लक्षणेएकाएकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढ उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, रक्त मिश्रीत किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे.घ्यावयाची दक्षताडेंग्यूचा प्रसार करणारे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतात. आपल्या घराच्या परिसरात साचलेले पाणी तर नाही ना?, जसे कुलर, पाण्याची टाकी, पक्षांचे पिण्याचे भांडे, फ्रिजचा ट्रे, फुलदाणी, नारळाच्यास करवंट्या तुटलेले फुटलेले भांडे व टायर इत्यादीत पाणी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.पाण्याची भांडी व टाकी झाकुन ठेवावी. कुलर रिकामे करून कोरडे करावे. डेंग्युचा डास दिवसा चावणारा असल्यामुळे संपूर्ण अंग झाकेल असेच कपडे वापरावे. डेंग्युचा उपचारावर विशेष औषधी किंवा लस उपलब्ध नाही.ताप कमी करण्याकरिता पॅरॉसिटामॉल घेता येते. स्वत: एस्प्रिन व ब्रुफेनचा वापर करू नये, डॉक्टराचा सल्ला घ्यावा. डेंग्युच्या प्रत्येक रूग्णास प्लेटलेटची गरज असते. योग्य उपचार योग्य वेळीच घ्या, उपाशा पोटी औषधोपचार घेऊ नका, मांत्रिक व भोंदु-वैद्यांचा सल्ला टाळा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.