शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
2
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
3
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
4
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
5
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
6
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
7
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
8
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
9
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
10
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
11
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
13
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
14
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
15
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
16
Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 
17
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
18
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
19
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
20
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."

सावधान ! बोगस बीटी बियाणे बाजारात

By admin | Updated: May 30, 2016 01:46 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत. वर्धेत तशी बियाणे येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सतर्कता बाळगण्याचा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांची मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून बियाण्यांच्या खरेदीकरिता धावपळ सुरू होत आहे. अशात काही बोगस कंपन्या आपली तुमडी भरण्याकरिता शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास मागे राहत नाही. वर्धेतही तशी बियाणे दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला मिळाली आहे. यात सर्वाधिक बियाणे कपाशीची राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाशक्ती, आर. आर. बीटी किंवा बी जी ३ या नावाने बोगस बियाणे बाजारात येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावधान राहण्याचे कळविले आहे. जिल्ह्याला हवी बीटी बियाण्यांची १० लाख पाकिटे कपाशीच्या अपेक्षित पेरणीच्या नियोजनानुसार जिल्ह्याला बीटी कापूस बियाण्यांच्या १० लाख ८ पाकिटाची आवश्यकता आहे. आता पर्यंत जिल्ह्यात ६ लाख ६६ हजार पॉकिटाचा पुरवठा झालेला आहे. पेरणीच्या वेळापर्यंत मागणी प्रमाणे पुरवठा होणार असून कपाशी बियाण्याचा तुटवडा व टंचाई जाणवणार नाही, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. एम. खळीकर यांनी कळविले आहे. जिल्ह्यामध्ये सोयाबीनची बियाणे उपलब्ध होणार१ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या पेरणीचे नियोजन असल्याचा आराखडा कृषी विभागाने तयार केला आहे. त्याकरिता ५७ हजार ७५० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक व खासगी कंपनीचे ६० हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे. सोयाबीन पेरताना सहा ओळीनंतर एक ओळ तूर ठेवानैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणून यंदाच्या हंगामात सोयाबीनची पेरणी करताना सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्यांनी ६ ओळी नंतर एक ओळ तूर या प्रमाणे आंतरपीक घेण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल व आपातकालीन परिस्थितीत तूर आंतरपीक घेतल्यामुळे फायदाही होईल, असे कृषी तज्ज्ञांकडून कळविण्यात आले आहे. मान्यताप्राप्त कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करामागणीच्या तुलनेत बिटीची कमी पाकिटेवर्धा : बियाण्यांबाबत होत असलेली फसगत टाळण्याकरिता जिल्ह्यात कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त असलेल्या दुकानांकडून बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून मान्यता असलेले एकूण ८५० दुकाने असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. बियाण्यांची, खतांची व किटकनाशकांची खरेदी करताना ती सीलपॅक आहेत अथवा नाहीत, याची तपासणी करावी. यात कुणी दुकानमालक कुचराई करीत असेल तर त्याची तक्रार कृषी विभागाकडे करावी, असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)