शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

सावधान ! बोगस बीटी बियाणे बाजारात

By admin | Updated: May 30, 2016 01:46 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत. वर्धेत तशी बियाणे येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सतर्कता बाळगण्याचा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांची मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून बियाण्यांच्या खरेदीकरिता धावपळ सुरू होत आहे. अशात काही बोगस कंपन्या आपली तुमडी भरण्याकरिता शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास मागे राहत नाही. वर्धेतही तशी बियाणे दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला मिळाली आहे. यात सर्वाधिक बियाणे कपाशीची राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाशक्ती, आर. आर. बीटी किंवा बी जी ३ या नावाने बोगस बियाणे बाजारात येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावधान राहण्याचे कळविले आहे. जिल्ह्याला हवी बीटी बियाण्यांची १० लाख पाकिटे कपाशीच्या अपेक्षित पेरणीच्या नियोजनानुसार जिल्ह्याला बीटी कापूस बियाण्यांच्या १० लाख ८ पाकिटाची आवश्यकता आहे. आता पर्यंत जिल्ह्यात ६ लाख ६६ हजार पॉकिटाचा पुरवठा झालेला आहे. पेरणीच्या वेळापर्यंत मागणी प्रमाणे पुरवठा होणार असून कपाशी बियाण्याचा तुटवडा व टंचाई जाणवणार नाही, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. एम. खळीकर यांनी कळविले आहे. जिल्ह्यामध्ये सोयाबीनची बियाणे उपलब्ध होणार१ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या पेरणीचे नियोजन असल्याचा आराखडा कृषी विभागाने तयार केला आहे. त्याकरिता ५७ हजार ७५० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक व खासगी कंपनीचे ६० हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे. सोयाबीन पेरताना सहा ओळीनंतर एक ओळ तूर ठेवानैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणून यंदाच्या हंगामात सोयाबीनची पेरणी करताना सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्यांनी ६ ओळी नंतर एक ओळ तूर या प्रमाणे आंतरपीक घेण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल व आपातकालीन परिस्थितीत तूर आंतरपीक घेतल्यामुळे फायदाही होईल, असे कृषी तज्ज्ञांकडून कळविण्यात आले आहे. मान्यताप्राप्त कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करामागणीच्या तुलनेत बिटीची कमी पाकिटेवर्धा : बियाण्यांबाबत होत असलेली फसगत टाळण्याकरिता जिल्ह्यात कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त असलेल्या दुकानांकडून बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून मान्यता असलेले एकूण ८५० दुकाने असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. बियाण्यांची, खतांची व किटकनाशकांची खरेदी करताना ती सीलपॅक आहेत अथवा नाहीत, याची तपासणी करावी. यात कुणी दुकानमालक कुचराई करीत असेल तर त्याची तक्रार कृषी विभागाकडे करावी, असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)