शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

सावधान ! बोगस बीटी बियाणे बाजारात

By admin | Updated: May 30, 2016 01:46 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत. वर्धेत तशी बियाणे येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सतर्कता बाळगण्याचा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांची मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून बियाण्यांच्या खरेदीकरिता धावपळ सुरू होत आहे. अशात काही बोगस कंपन्या आपली तुमडी भरण्याकरिता शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास मागे राहत नाही. वर्धेतही तशी बियाणे दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला मिळाली आहे. यात सर्वाधिक बियाणे कपाशीची राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाशक्ती, आर. आर. बीटी किंवा बी जी ३ या नावाने बोगस बियाणे बाजारात येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावधान राहण्याचे कळविले आहे. जिल्ह्याला हवी बीटी बियाण्यांची १० लाख पाकिटे कपाशीच्या अपेक्षित पेरणीच्या नियोजनानुसार जिल्ह्याला बीटी कापूस बियाण्यांच्या १० लाख ८ पाकिटाची आवश्यकता आहे. आता पर्यंत जिल्ह्यात ६ लाख ६६ हजार पॉकिटाचा पुरवठा झालेला आहे. पेरणीच्या वेळापर्यंत मागणी प्रमाणे पुरवठा होणार असून कपाशी बियाण्याचा तुटवडा व टंचाई जाणवणार नाही, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. एम. खळीकर यांनी कळविले आहे. जिल्ह्यामध्ये सोयाबीनची बियाणे उपलब्ध होणार१ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या पेरणीचे नियोजन असल्याचा आराखडा कृषी विभागाने तयार केला आहे. त्याकरिता ५७ हजार ७५० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक व खासगी कंपनीचे ६० हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे. सोयाबीन पेरताना सहा ओळीनंतर एक ओळ तूर ठेवानैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणून यंदाच्या हंगामात सोयाबीनची पेरणी करताना सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्यांनी ६ ओळी नंतर एक ओळ तूर या प्रमाणे आंतरपीक घेण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल व आपातकालीन परिस्थितीत तूर आंतरपीक घेतल्यामुळे फायदाही होईल, असे कृषी तज्ज्ञांकडून कळविण्यात आले आहे. मान्यताप्राप्त कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करामागणीच्या तुलनेत बिटीची कमी पाकिटेवर्धा : बियाण्यांबाबत होत असलेली फसगत टाळण्याकरिता जिल्ह्यात कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त असलेल्या दुकानांकडून बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून मान्यता असलेले एकूण ८५० दुकाने असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. बियाण्यांची, खतांची व किटकनाशकांची खरेदी करताना ती सीलपॅक आहेत अथवा नाहीत, याची तपासणी करावी. यात कुणी दुकानमालक कुचराई करीत असेल तर त्याची तक्रार कृषी विभागाकडे करावी, असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)