शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
7
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
8
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
9
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
10
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
11
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
12
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
13
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
14
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
15
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
16
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
17
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
18
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
19
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
20
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

सावधान! डेंग्यू घेतोय कवेत जिल्ह्यात 48 रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST

कोविड संकटातून थोडे सावरत नाही तो सध्या डेंग्यू आपले डोके वर काढत असल्याने आरोग्य विभागाच्या अडचणीत भर पडली आहे. गावागावात डेंग्यू जनजागृती माेहीम राबविली जात असली तरी घराच्या आवारात पावसाचे पाणी साचत असल्याने तसेच स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने हा प्रकार डेंग्यूचा प्रसाराचा पोषक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या आवारात कुठेही पाणी साचून डासांची उत्पत्ती होत तर नाही ना याची शहानिशा करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देकोरडा दिवस पाळणे फायद्याचे : दक्ष राहण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन कोरोनाबाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी सध्या डेंग्यू हा कीटकजन्य आजार डोके वर काढू पाहत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४८ डेंग्यू बाधितांची नोंद घेण्यात आली असून एकाचा डेंग्यूने बळी घेतला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कोविड संकटातून थोडे सावरत नाही तो सध्या डेंग्यू आपले डोके वर काढत असल्याने आरोग्य विभागाच्या अडचणीत भर पडली आहे. गावागावात डेंग्यू जनजागृती माेहीम राबविली जात असली तरी घराच्या आवारात पावसाचे पाणी साचत असल्याने तसेच स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने हा प्रकार डेंग्यूचा प्रसाराचा पोषक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या आवारात कुठेही पाणी साचून डासांची उत्पत्ती होत तर नाही ना याची शहानिशा करणे गरजेचे आहे. तर कूलरमधील पाणी नियमित बदलविण्यासह घराच्या आवारात कुठे पावसाचे पाणी साचत असल्यास ते वाहते करणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ डेंग्यू बाधितांची नोंद जिल्हा हिवताप अधिकारी विभागाने घेतली असून त्यापैकी एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. डेंग्यू हा आजार जीवघेणा ठरू शकत असल्याने प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज आहे.

ही आहेत लक्षणेएकाएकी तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापात चढ-उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव होणे, रक्तमिश्रित किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे आदी किटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूची प्राथमिक लक्षणे आहेत.

जिल्ह्यात सध्या डेंग्यू हा कीटकजन्य आजार डोके वर काढू पाहत आहे. सर्व नगरपालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायती यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत; पण नागरिकांच्या सहकार्याशिवाय डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य नाहीच, हे नागरिकांनीही लक्षात घेतले पाहिजे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळल्यास डासांच्या उत्पत्तीला ब्रेक लागेल. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. शिवाय आपल्या घराच्या आवारात कुठे डासाची उत्पत्ती तर होत नाही ना, याची शहानिशा करावी.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :dengueडेंग्यू