शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

सावधान! डेंग्यू घेतोय कवेत जिल्ह्यात 48 रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST

कोविड संकटातून थोडे सावरत नाही तो सध्या डेंग्यू आपले डोके वर काढत असल्याने आरोग्य विभागाच्या अडचणीत भर पडली आहे. गावागावात डेंग्यू जनजागृती माेहीम राबविली जात असली तरी घराच्या आवारात पावसाचे पाणी साचत असल्याने तसेच स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने हा प्रकार डेंग्यूचा प्रसाराचा पोषक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या आवारात कुठेही पाणी साचून डासांची उत्पत्ती होत तर नाही ना याची शहानिशा करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देकोरडा दिवस पाळणे फायद्याचे : दक्ष राहण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन कोरोनाबाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी सध्या डेंग्यू हा कीटकजन्य आजार डोके वर काढू पाहत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४८ डेंग्यू बाधितांची नोंद घेण्यात आली असून एकाचा डेंग्यूने बळी घेतला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कोविड संकटातून थोडे सावरत नाही तो सध्या डेंग्यू आपले डोके वर काढत असल्याने आरोग्य विभागाच्या अडचणीत भर पडली आहे. गावागावात डेंग्यू जनजागृती माेहीम राबविली जात असली तरी घराच्या आवारात पावसाचे पाणी साचत असल्याने तसेच स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने हा प्रकार डेंग्यूचा प्रसाराचा पोषक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या आवारात कुठेही पाणी साचून डासांची उत्पत्ती होत तर नाही ना याची शहानिशा करणे गरजेचे आहे. तर कूलरमधील पाणी नियमित बदलविण्यासह घराच्या आवारात कुठे पावसाचे पाणी साचत असल्यास ते वाहते करणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ डेंग्यू बाधितांची नोंद जिल्हा हिवताप अधिकारी विभागाने घेतली असून त्यापैकी एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. डेंग्यू हा आजार जीवघेणा ठरू शकत असल्याने प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज आहे.

ही आहेत लक्षणेएकाएकी तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापात चढ-उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव होणे, रक्तमिश्रित किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे आदी किटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूची प्राथमिक लक्षणे आहेत.

जिल्ह्यात सध्या डेंग्यू हा कीटकजन्य आजार डोके वर काढू पाहत आहे. सर्व नगरपालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायती यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत; पण नागरिकांच्या सहकार्याशिवाय डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य नाहीच, हे नागरिकांनीही लक्षात घेतले पाहिजे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळल्यास डासांच्या उत्पत्तीला ब्रेक लागेल. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. शिवाय आपल्या घराच्या आवारात कुठे डासाची उत्पत्ती तर होत नाही ना, याची शहानिशा करावी.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :dengueडेंग्यू