शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

वाहन चालविताना कुंटूंबाच्या जबाबदारीचे भान ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:23 IST

व्यासपीठावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांची उपस्थिती होती. पुर्वीच्या काळात आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते.

ठळक मुद्देरामदास तडस : वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार झालेले महामार्ग दळण-वळणासाठी सोईचे ठरतात. असे असले तरी महामार्गावरील वाढत्या अपघाताचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे. आजची तरुणाई जोशात वाहने चालवून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. तरुणांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करुन जबाबदारीचे भान ठेवावे. स्वत: सोबत कुंटूबीय व इतर व्यक्ती अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले.सामाजिक न्याय भवन येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने वाहतूक सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांची उपस्थिती होती. पुर्वीच्या काळात आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते. परंतु, आजच्या काळात अपघाताने मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जगात सर्वात जास्त अपघाताने मुत्यू होण्याचे प्रमाण भारतात आहे. यासाठी भारत सरकारने वाहतुकीच्या नवीन कायद्यासोबतच दंड व शिक्षेतही वाढ केली आहे. या कायद्यातील नियमांचे पालन करुन नागरिकांनी वाहन चालवावे. आपल्यासोबतच दुसऱ्याच्या जीवाचाही विचार करावा असेही यावेळी खा. तडस यांनी स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते रस्ता सुरक्षा मार्गदर्शकिचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक विजय तिराणकर यांनी केले तर आभार अशोक चौधरी यांनी मानले.नव्या वाहतूक कायद्याची जनजागृती करा : जिल्हाधिकारीपरिवार हा आयुष्याचा केंद्र बिंदू आहे. आपली एक चूक दुसºयाच्या मृत्यूस कारणीभूत ठरते. विदर्भाच्या महामार्गाच्या तुलनेत सर्वात जास्त महामार्गाची कामे वर्धा जिल्ह्यात सध्या सुरु आहेत. अपघाताचे प्रमाण महामार्गावरील गावाच्या ठिकाणी होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या गावातील नागरिकांनी रस्ता ओलांडताना तसेच वाहन चालविताना दक्ष राहिले पाहिजे. केंद्र शासनाने केलेल्या नवीन वाहतूकीच्या नियमाची संबंधित अधिकाऱ्यांनी स्वत: माहिती घेऊन जनजागृती करावी. अपघातास कारणीभूत ठरल्यास शिक्षा होऊ शकते, याची माहितीही अधिकाºयांनी नागरिकांना पटवून द्यावी, असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार म्हणाले.अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करणार - तेलीदरवर्षी अपघाताचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष शासनाचे आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात यंदा ६ टक्के अपघात कमी झाले आहेत. हेल्मेट न वापरणे, सिट बेल्ट न लावता वाहन चालविणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व माल लादून वाहतूक करणे तसेच वेगाने वाहन चालविणे या छोट्या-छोट्या बाबी अपघातास निमंत्रण देणाऱ्या ठरतात. यामुळे प्रत्येक नागरिकाने वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस