शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

वर्धेतील लढा हरियाणाच्या गावापर्यंत पोहोचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:24 IST

शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरू झाला. हा लढा सुरू व्हायला आता एक वर्ष होत आहे; पण अमरावती, वर्धा जिल्ह्यासह हा लढा हरियाणा राज्याच्या गावापर्यंत पोहोचला आहे.

ठळक मुद्देएक वर्षातच मिळाले फलित : एकच मिशन शेतकरी आरक्षण लढ्याला बळकटी

आॅनलाईन लोकमतआर्वी : शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरू झाला. हा लढा सुरू व्हायला आता एक वर्ष होत आहे; पण अमरावती, वर्धा जिल्ह्यासह हा लढा हरियाणा राज्याच्या गावापर्यंत पोहोचला आहे. तेथेही शेतकरी आरक्षणाचा ठराव पारित करण्यात आले. सेवाग्राम आश्रमात शेतकरी आरक्षणाची सुरूवात शेतकरी व मिशनचे प्रमुख शैलेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. आता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शविल्याने या लढ्याला बळकटी मिळाली आहे.शैलेश अग्रवाल यांनी सोप्या पद्धतीने मांडलेल्या शेतकरी आरक्षण विषयाला शेतकऱ्यांनी स्वीकारले. शेकडो ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत शेतकरी आरक्षणाचा ठरावही घेतला. शासनातील मंत्र्यांना प्रस्ताव देण्यात आले. हा लढा सर्वत्र जोर धरत असताना खुद्द शरद पवार यांनी शेतकऱ्याला आरक्षण मिळावे, असे सांगितले. आता नेतेही शेतकरी आरक्षणाच्या बाजूने असल्याचे हे चित्र ‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’ हा लढा अधिक मजबूत करणारे आहे.वास्तविक, आरक्षण हा विषय देशाला नवीन नाही; पण आजपर्यंत जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आले. एकच मिशनने त्या पलीकडे जाऊन भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणाºया शेतीची व शेतकऱ्यांची होणारी दयनीय स्थिती रोखण्यासाठी कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. देशात ‘जय जवान, जय किसान’, हा जुना नारा आहे. यातील सीमेवर लढणाऱ्या जवानाला आरक्षण आहे. मग, शेतात लढाणऱ्या शेतकऱ्याला आरक्षण का नाही, हा सामान्य शेतकऱ्याचा असामान्य प्रश्न एकच मिशनने हेरला आहे. सेवाग्राम येथून सुरू झालेला हा लढा उत्तरेतील हरियाणापर्यंत पोहोचला आहे. हरियाणातील एका गावात ग्रामसभा घेऊन शेतकऱ्याला आरक्षण मिळाले पाहिजे, असा ठराव घेतला आहे.अग्रवाल यांनी मंत्रालयात पोहोचून अनेक मंत्र्यांना आपल्या शेतकरी आरक्षणाचा प्रस्ताव सादर केला. काहींनी त्यावर चर्चा केली. काही मंत्र्यांनी प्रस्ताव ठेऊन घेतला तर काहींनी नुसताच पाहून हे शक्य नसल्याची प्रतिक्रियाही दिली; पण आता शेतकरी आरक्षणावर नेते बोलते झाले आहेत. शेतकºयाला आरक्षण मिळाले पाहिजे, तो त्याचा हक्क आहे, अशी मागणी एकच मिशनच्यावतीने सतत लावून धरली जात आहे.आता खुद्द देशाच्या माजी कृषी मंत्र्यांनी शेतकरी आरक्षण मिळाले पाहिजे, असे मुंबई येथील पत्रकार परिषदेत सांगितले. ते एकप्रकारे एकच मिशन शेतकरी आरक्षणाच्या मुद्याचे समर्थनच म्हणावे लागेल. हा लढा अधिक सक्षम करण्यासाठी देशपातळीवर शेतकºयांनी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. आता नेत्यांच्या तोंडी ही मागणी येत असल्याने शेतकरी आरक्षण हा मुद्दा चर्चिला जाण्याची शक्यता आहे. या दृष्टीने शेतकऱ्यांनी आता जोरकस प्रयत्न करण्याची गरजही व्यक्त होत आहे.अमरावती, वर्धा जिल्ह्यातही ठरावअमरावती आणि वर्धा जिल्ह्यातही शेतकऱ्यांना आरक्षण मिळावे, असे ठराव घेण्यात आलेले आहेत. हे ठराव कृषी उत्पन्न बाजार समित्या तथा ग्रामपंचायींद्वारे ग्रामसभांमध्ये घेण्यात आले आहेत. सदर ठरावंच्या प्रती शासन तथा वरिष्ठ मंत्र्यांना सादर करण्यात आल्या आहेत. यातूनच माजी कृषी मंत्र्यांनीही शेतकऱ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असा उल्लेख केला. यामुळे भविष्यात या आंदोलनाला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.