शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेचा रणसंग्राम : आत्तापर्यंत केवळ एकच महिला झाली खासदार, पाच जणींनी लढविली निवडणूक

By रवींद्र चांदेकर | Updated: April 3, 2024 16:25 IST

प्रभा राव पोहोचल्या होत्या लोकसभेत 

वर्धा : लोकसभेच्या रणांगणात आत्तापर्यंत वर्धेतून पाच महिलांनी नशीब आजमावले. मात्र, त्यापैकी केवळ एकाच महिलेला खासदारकीची संधी मिळाली. त्यात काँग्रेसच्या प्रभा राव जायंट किलर ठरल्या होत्या. 

लोकसभेच्या निवडणुकीत पूर्वी पुरुषांचीच मक्तेदारी होती. महिला अपवादात्मक स्थितीतच निवडणुकीच्या रणांगणात उतरत होत्या. मात्र, १९९८ पासून वर्धेच्या लोकसभा निवडणुकीत महिला रणांगणात उतरू लागल्या. त्यावेळी तत्कालीन जनता पार्टीच्या उमेदवारीवर सरोज काशीकर, तर अपक्ष म्हणून इंदुमती कृष्णराव वानखेडे यांनी उमेदवारी दाखल केली होती. एकूण १० उमेदवार रिंगणात होते. त्यात दोन महिला होत्या. त्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांना तीन लाख २८ हजार ९०५ मते, तर विरोधी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय मुडे यांना दोन ४५ हजार ८२२ मते मिळाली होती. सरोज काशीकर यांना २३ हजार ४५२, तर इंदुमती वानखेडे यांना ५१६ मते मिळाली होती. 

यानंतर १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रभा राव या महिला उमेदवार होत्या. त्यांनी दोन लाख ४९ हजार ५६४ मते प्राप्त केली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुरेश वाघमारे यांना दोन लाख ४२ हजार ५०२ मते मिळाली होती. प्रभा राव यांच्या रुपाने १९९९ मध्ये प्रथमच एका महिलेला खासदारकीची संधी मिळाली होती. त्यानंतर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडून प्रभा राव यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली होती. 

मात्र, भाजपचे सुरेश वाघमारे यांनी त्यांचा पराभव केला होता. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा संगीता सुनील कांबळे या महिला आंबेडकरीस्ट रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरल्या होत्या. मात्र, त्यांना केवळ ७९८ मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार नव्हती. मात्र, २०१९ मध्ये पुन्हा काँग्रेसकडून प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस या महिला उमेदवार होत्या. तथापि, त्यांचा भाजपचे रामदास तडस यांनी पराभव केला होता. 

यंदा आत्तापर्यंत एकही महिला नाही 

२०२४ मधील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. यात मंगळवारपर्यंत १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत ६३ जणांनी १४१ अर्जांची उचल केली. मात्र, एकाही महिला उमेदवाराने उमेदवारी दाखल केली नाही.

टॅग्स :wardha-acवर्धाlok sabhaलोकसभा