शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

वर्धेचा रणसंग्राम : आत्तापर्यंत केवळ एकच महिला झाली खासदार, पाच जणींनी लढविली निवडणूक

By रवींद्र चांदेकर | Updated: April 3, 2024 16:25 IST

प्रभा राव पोहोचल्या होत्या लोकसभेत 

वर्धा : लोकसभेच्या रणांगणात आत्तापर्यंत वर्धेतून पाच महिलांनी नशीब आजमावले. मात्र, त्यापैकी केवळ एकाच महिलेला खासदारकीची संधी मिळाली. त्यात काँग्रेसच्या प्रभा राव जायंट किलर ठरल्या होत्या. 

लोकसभेच्या निवडणुकीत पूर्वी पुरुषांचीच मक्तेदारी होती. महिला अपवादात्मक स्थितीतच निवडणुकीच्या रणांगणात उतरत होत्या. मात्र, १९९८ पासून वर्धेच्या लोकसभा निवडणुकीत महिला रणांगणात उतरू लागल्या. त्यावेळी तत्कालीन जनता पार्टीच्या उमेदवारीवर सरोज काशीकर, तर अपक्ष म्हणून इंदुमती कृष्णराव वानखेडे यांनी उमेदवारी दाखल केली होती. एकूण १० उमेदवार रिंगणात होते. त्यात दोन महिला होत्या. त्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांना तीन लाख २८ हजार ९०५ मते, तर विरोधी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय मुडे यांना दोन ४५ हजार ८२२ मते मिळाली होती. सरोज काशीकर यांना २३ हजार ४५२, तर इंदुमती वानखेडे यांना ५१६ मते मिळाली होती. 

यानंतर १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रभा राव या महिला उमेदवार होत्या. त्यांनी दोन लाख ४९ हजार ५६४ मते प्राप्त केली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुरेश वाघमारे यांना दोन लाख ४२ हजार ५०२ मते मिळाली होती. प्रभा राव यांच्या रुपाने १९९९ मध्ये प्रथमच एका महिलेला खासदारकीची संधी मिळाली होती. त्यानंतर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडून प्रभा राव यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली होती. 

मात्र, भाजपचे सुरेश वाघमारे यांनी त्यांचा पराभव केला होता. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा संगीता सुनील कांबळे या महिला आंबेडकरीस्ट रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरल्या होत्या. मात्र, त्यांना केवळ ७९८ मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार नव्हती. मात्र, २०१९ मध्ये पुन्हा काँग्रेसकडून प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस या महिला उमेदवार होत्या. तथापि, त्यांचा भाजपचे रामदास तडस यांनी पराभव केला होता. 

यंदा आत्तापर्यंत एकही महिला नाही 

२०२४ मधील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. यात मंगळवारपर्यंत १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत ६३ जणांनी १४१ अर्जांची उचल केली. मात्र, एकाही महिला उमेदवाराने उमेदवारी दाखल केली नाही.

टॅग्स :wardha-acवर्धाlok sabhaलोकसभा