शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

एकाच विहिरीचा अनेक कुटुंबांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:04 IST

सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे. त्यातच आदर्शनगरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. अशातच थोडे पाणी असलेली विहीर अनेक कुटुंबाला आधार देणारी ठरत आहे; पण जोरदार पाऊस येत भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने तेथील नागरिकांना तीव्र पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. सध्या काही विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देआदर्शनगरात पाणीसमस्या ऐरणीवर : महिलांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे. त्यातच आदर्शनगरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. अशातच थोडे पाणी असलेली विहीर अनेक कुटुंबाला आधार देणारी ठरत आहे; पण जोरदार पाऊस येत भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने तेथील नागरिकांना तीव्र पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. सध्या काही विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आदर्शनगरवासियांना सध्या तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातही चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाणी साठवून ठेवणार तरी किती असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. सेवाग्राम ग्रा.पं.च्या प्रभाग ३ मधील हा भाग असून कष्टकऱ्यांची वसाहत अशीच या परिसराची ओळख आहे. स्वतंत्र पाणी व्यवस्था असली तरी प्रत्येक उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागते. असे असले तरी त्यावर कायमस्वरूपी तोडगा न काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे.या भागात तीन हॅन्डपंप आहेत. त्यापैकी एक हॅण्डपंप कोरडा झाला आहे. याच भागात एक विहीर असून या एकाच विहिरीवर तब्बल १४ मोटारी बसविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या भागातील रहिवासी इतरांना विहिरीतील पाणी घेऊ देत नसल्याने नागरिकांची समस्या लक्षात घेऊन ग्रा.पं. प्रशासनाने याविषयी लक्ष देण्याची गरज आहे. जलसंकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ग्रा.पं. प्रशासनाने विशेष पाऊल उचलण्याची मागणी आहे.