शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

एकाच विहिरीचा अनेक कुटुंबांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:04 IST

सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे. त्यातच आदर्शनगरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. अशातच थोडे पाणी असलेली विहीर अनेक कुटुंबाला आधार देणारी ठरत आहे; पण जोरदार पाऊस येत भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने तेथील नागरिकांना तीव्र पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. सध्या काही विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देआदर्शनगरात पाणीसमस्या ऐरणीवर : महिलांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे. त्यातच आदर्शनगरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. अशातच थोडे पाणी असलेली विहीर अनेक कुटुंबाला आधार देणारी ठरत आहे; पण जोरदार पाऊस येत भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने तेथील नागरिकांना तीव्र पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. सध्या काही विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्याने पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आदर्शनगरवासियांना सध्या तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातही चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाणी साठवून ठेवणार तरी किती असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. सेवाग्राम ग्रा.पं.च्या प्रभाग ३ मधील हा भाग असून कष्टकऱ्यांची वसाहत अशीच या परिसराची ओळख आहे. स्वतंत्र पाणी व्यवस्था असली तरी प्रत्येक उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागते. असे असले तरी त्यावर कायमस्वरूपी तोडगा न काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे.या भागात तीन हॅन्डपंप आहेत. त्यापैकी एक हॅण्डपंप कोरडा झाला आहे. याच भागात एक विहीर असून या एकाच विहिरीवर तब्बल १४ मोटारी बसविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या भागातील रहिवासी इतरांना विहिरीतील पाणी घेऊ देत नसल्याने नागरिकांची समस्या लक्षात घेऊन ग्रा.पं. प्रशासनाने याविषयी लक्ष देण्याची गरज आहे. जलसंकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ग्रा.पं. प्रशासनाने विशेष पाऊल उचलण्याची मागणी आहे.