शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:43 IST

वनस्पती अचल असून सपुष्प वनस्पतीमध्ये ९० टक्के परागीकरण हे कीटक व अन्य पशुपक्ष्यांमार्फत होत असल्यामुळे परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार आहे. तथापि, परागीभवन ही विस्मरणात गेलेली परिसंस्था प्रणाली असून परागसिंचकाची मुख्य भूमिका बजावणाऱ्या माशा, भुंगे, फुलपाखरे व अन्य कीटक यांच्या वाट्याला मानव प्राण्याकडून उपेक्षाच आलेली आहे, असे प्रतिपादन विज्ञान लेखक व पर्यावरणीय वास्तुशास्त्रज्ञ उल्हास राणे यांनी केले.

ठळक मुद्देउल्हास राणे : अ.भा. अंनिस व बहार नेचर फाऊंडेशनद्वारे आयोजित विज्ञान व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वनस्पती अचल असून सपुष्प वनस्पतीमध्ये ९० टक्के परागीकरण हे कीटक व अन्य पशुपक्ष्यांमार्फत होत असल्यामुळे परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार आहे. तथापि, परागीभवन ही विस्मरणात गेलेली परिसंस्था प्रणाली असून परागसिंचकाची मुख्य भूमिका बजावणाऱ्या माशा, भुंगे, फुलपाखरे व अन्य कीटक यांच्या वाट्याला मानव प्राण्याकडून उपेक्षाच आलेली आहे, असे प्रतिपादन विज्ञान लेखक व पर्यावरणीय वास्तुशास्त्रज्ञ उल्हास राणे यांनी केले.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारा व बहार नेचर फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित मासिक विज्ञान व्याख्यानमालेत मासिक विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला दहावे पुष्प गुफतांना ते बोलत होते.'उपेक्षित परागसिंचक' या विषयावर चित्रफितीद्वारे मांडणी करताना उल्हास राणे म्हणाले, मधामुळे मधमाशांवर प्रचंड संशोधन झालेले असून त्याच वेळेस इतर महत्त्वाचे परागसिंचक उपेक्षित राहिले. मधमाशांच्या बाजारीकरणाचा परिणाम अन्य परागसिंचकांवर झाला. शेतीचा विचार करताना जमीन, पाणी, खते आणि बियाण्यांचा विचार आपण केला; पण पीक उत्पन्नवाढीतमहत्त्वाची भूमिका बजावणारे परागसिंचक व परागसिंचन प्रणालीचे योगदान आपण दुर्लक्षित केले. वनाच्या विखंडनाचा परिणाम परागीभवन प्रक्रियेवर झालेला असून जेवढे नैसर्गिक जंगल कमी होत जाणार तेवढेच परागसिंचक कमी होत जाईल. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास, एकल पीक पद्धती आणि मानवी वृत्तीत वाढत असलेला 'पॉशपणा' यासह अनेक बाबी परागसिंचकांच्या मुळावर उठलेल्या आहेत. ते विस्थापित होत असून या विस्थापितांची लढाई कोण लढणार, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.परागसिंचकाचं संवर्धन हे जैवविविधता जोपासण्यातूनच होईल. त्यासाठी गाव व शहरात जैवविविधता जोपासणाऱ्या जैववैविध्य उद्यानांची निर्मिती तसेच शेतकऱ्यांनी बांधावर परागसिंचकाला साह्यभूत ठरणारी झाडेझुडपे लावावीत, असेही राणे यांनी यावेळी सुचविले.अध्यक्षस्थानी प्रदीप दाते होते. संचालन प्रा. सुचिता ठाकरे यांनी केले. वक्त्यांचा परिचय दिलीप वीरखडे यांनी दिला तर आभार वैभव देशमुख यांनी मानले. व्याख्यानाला डॉ. तारक काटे, मुरलीधर बेलखोडे, संजय इंगळे तिगावकर, प्राचार्य राम उमरे, प्राचार्य रेखा ठाकरे, संगीता इंगळे, प्रा. एकनाथ मुरकुटे, राहुल तेलरांधे, स्नेहल कुबडे तसेच अन्य अभ्यासक उपस्थित होते.