शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:43 IST

वनस्पती अचल असून सपुष्प वनस्पतीमध्ये ९० टक्के परागीकरण हे कीटक व अन्य पशुपक्ष्यांमार्फत होत असल्यामुळे परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार आहे. तथापि, परागीभवन ही विस्मरणात गेलेली परिसंस्था प्रणाली असून परागसिंचकाची मुख्य भूमिका बजावणाऱ्या माशा, भुंगे, फुलपाखरे व अन्य कीटक यांच्या वाट्याला मानव प्राण्याकडून उपेक्षाच आलेली आहे, असे प्रतिपादन विज्ञान लेखक व पर्यावरणीय वास्तुशास्त्रज्ञ उल्हास राणे यांनी केले.

ठळक मुद्देउल्हास राणे : अ.भा. अंनिस व बहार नेचर फाऊंडेशनद्वारे आयोजित विज्ञान व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वनस्पती अचल असून सपुष्प वनस्पतीमध्ये ९० टक्के परागीकरण हे कीटक व अन्य पशुपक्ष्यांमार्फत होत असल्यामुळे परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार आहे. तथापि, परागीभवन ही विस्मरणात गेलेली परिसंस्था प्रणाली असून परागसिंचकाची मुख्य भूमिका बजावणाऱ्या माशा, भुंगे, फुलपाखरे व अन्य कीटक यांच्या वाट्याला मानव प्राण्याकडून उपेक्षाच आलेली आहे, असे प्रतिपादन विज्ञान लेखक व पर्यावरणीय वास्तुशास्त्रज्ञ उल्हास राणे यांनी केले.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारा व बहार नेचर फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित मासिक विज्ञान व्याख्यानमालेत मासिक विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला दहावे पुष्प गुफतांना ते बोलत होते.'उपेक्षित परागसिंचक' या विषयावर चित्रफितीद्वारे मांडणी करताना उल्हास राणे म्हणाले, मधामुळे मधमाशांवर प्रचंड संशोधन झालेले असून त्याच वेळेस इतर महत्त्वाचे परागसिंचक उपेक्षित राहिले. मधमाशांच्या बाजारीकरणाचा परिणाम अन्य परागसिंचकांवर झाला. शेतीचा विचार करताना जमीन, पाणी, खते आणि बियाण्यांचा विचार आपण केला; पण पीक उत्पन्नवाढीतमहत्त्वाची भूमिका बजावणारे परागसिंचक व परागसिंचन प्रणालीचे योगदान आपण दुर्लक्षित केले. वनाच्या विखंडनाचा परिणाम परागीभवन प्रक्रियेवर झालेला असून जेवढे नैसर्गिक जंगल कमी होत जाणार तेवढेच परागसिंचक कमी होत जाईल. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास, एकल पीक पद्धती आणि मानवी वृत्तीत वाढत असलेला 'पॉशपणा' यासह अनेक बाबी परागसिंचकांच्या मुळावर उठलेल्या आहेत. ते विस्थापित होत असून या विस्थापितांची लढाई कोण लढणार, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.परागसिंचकाचं संवर्धन हे जैवविविधता जोपासण्यातूनच होईल. त्यासाठी गाव व शहरात जैवविविधता जोपासणाऱ्या जैववैविध्य उद्यानांची निर्मिती तसेच शेतकऱ्यांनी बांधावर परागसिंचकाला साह्यभूत ठरणारी झाडेझुडपे लावावीत, असेही राणे यांनी यावेळी सुचविले.अध्यक्षस्थानी प्रदीप दाते होते. संचालन प्रा. सुचिता ठाकरे यांनी केले. वक्त्यांचा परिचय दिलीप वीरखडे यांनी दिला तर आभार वैभव देशमुख यांनी मानले. व्याख्यानाला डॉ. तारक काटे, मुरलीधर बेलखोडे, संजय इंगळे तिगावकर, प्राचार्य राम उमरे, प्राचार्य रेखा ठाकरे, संगीता इंगळे, प्रा. एकनाथ मुरकुटे, राहुल तेलरांधे, स्नेहल कुबडे तसेच अन्य अभ्यासक उपस्थित होते.