शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

‘कॉटन टू क्लॉथ’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:27 IST

कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या पुढाकार साटोडा या गावात कापसापासून खादी कापड तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देसाटोडा येथे कापड निर्मिती केंद्र : महिलांना देणार रोजगारभिमुख प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या पुढाकार साटोडा या गावात कापसापासून खादी कापड तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यामुळे गावातील १६ महिलांना रोजगाराचे नवीन साधन उपलब्ध झाले आहे. ‘कॉटन टू क्लॉथ’ ही संकल्पना साकारणारा हा प्रकल्प शेतकºयांना निश्चितच आधार देणारा ठरणार आहे.विदर्भात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण, शेतकºयांना कापूस हा कच्चा माल म्हणून विकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकºयांच्या मालकीच्या सूतगिरण्या किंवा वस्त्रोद्योग नसल्याने त्यांना पिकविलेला कापूस व्यापाºयांना देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वर्षानुवर्षे सुरू असलेली ही प्रथा आजही कायम आहे. शेतकºयांच्या या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी स्थापन झालेला केम प्रकल्प यासाठी काम करीत आहे. शेतकºयांना विविध शेतीपूरक उद्योगासाठी कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये शेतकरी बचत गटाच्या दालमील, शेळीपालन, मशरूम शेती, शेतकºयांचा उत्पादन खर्च कमी करणे व शेतकºयांनी कापूस व्यापाºयांना विकता कापूस गाठी तयार करण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य याचा समावेश आहे. गत दोन वर्षापासून १० गावातील शेतकरी स्वत:च कापूस गाठी तयार करून विकत आहेत. परंतु, यातील नफ्याचे खरे गणित कापड व वस्त्रे तयार करण्यात आले. हे लक्षात घेऊन कॉटन टू क्लॉथ या संकलपनेवर काम करण्यास केमने सुरूवात केली आहे.वर्धा शहरानजीकच्या साटोडा येथे विठाई, संस्कृती, महालक्ष्मी, भीमाई या महिला बचत गटाच्या २० महिलांना हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे यातील महिला या शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील आहे. महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विधायक कृतीशील कार्यापासून प्रेरणा घेऊन निवेदिता निलंयम ही संस्था काम करते. या संस्थेचे किशोरभाई यांनी या महिलांना हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तर केमसाठी हातमाग युनिटही तयार करून दिले. केमने ३० टक्के अनुदानावर ४ हातमाग युनिट या गावात स्थापन केले आहे. एका युनिटची किंमत ३ लाख रूपये असून यासाठी समन्वित शेतकरी उत्पादक कंपनी व ग्लोबल इंटरप्रायजेस यांनी सहकार्य केले आहे. दोन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर आॅगस्ट महिन्यापासून १६ महिलांनी ५०० मीटर खादी कापड तयार केले. मुख्य म्हणजे समन्वित शेतकरी उत्पादक कंपनी व ग्लोबल इंटरप्रायजेस या कंपनीला तयार कापड विकण्याचा करार केल्यामुळे १५० रूपये प्रति मिटरने खादी कापड विकला जात आहे. यामुळे महिलांना २०० रूपये प्रतिदिनाची मजुरी सोबतच कापड विक्रीतून होणाºया नफ्यातील हिस्साही मिळणार आहे. याच गावात आणखी ७ हातमाग युनिट लवकरच बसविण्यात येणार असून आणखी २८ महिलांना रोजगारांची संधी गावातच मिळणार आहे. शिवाय गावातील शेतकºयांना या हंगामात कापूस व्यापाºयांना विकण्याऐवजी थेट कापड तयार करून विक्रीचा पर्यायही उपलब्ध झाला आहे.शेतकºयांना एक क्विंटल कापसाचे हमीभावाप्रमाणे ५ ते ६ हजार रूपये मिळतात. पण, त्यावर प्रक्रिया करून थेट खादी कापड विकला तर याच्या चारपट म्हणजे सुमारे २३ हजार रूपये नफा खर्च वजा जाता मिळू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी याचा फायदा करून घ्यावा.- निलेश वावरे, समन्वयक, कृषी विकास प्रकल्प, वर्धा.