शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

आर्थिकदृष्ट्या हतबल शेतकऱ्याला हवा शासनाचा आधार

By admin | Updated: August 17, 2014 23:20 IST

निसर्गावर अवलंबून असणाऱ्या बळीराजा पुढे खरीप हंगाम धोक्याची घंटा देत आहे. यामुळे रबीचा हंगामही लांबणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे. यामुळे यंदाचा हंगाम गतवर्षीच्या

घोराड : निसर्गावर अवलंबून असणाऱ्या बळीराजा पुढे खरीप हंगाम धोक्याची घंटा देत आहे. यामुळे रबीचा हंगामही लांबणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे. यामुळे यंदाचा हंगाम गतवर्षीच्या हंगामाप्रमाणेच धोक्याचा तर ठरणार नाही ना अशी भीती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.या महिन्यात खरीपातील कपाशी पात्या फुलावर राहायला हवी होती; पण पावसाच्या लहरीपणामुळे पिकाची वाढ खुंटली तर सोयाबीनला शेंगा लावण्याचा हा हंगाम होता. नुकत्याच गत १० ते १५ दिवसांपूर्वी पेरण्या झाल्या. अशात पावसाची दडी बसल्याने त्या धोक्यात आल्या. सोयाबीन हे पीक पेरणीपासून पाऊस योग्य राहिल्यास ११० दिवसानंतर मळणी योग्य होते. यात जुलैच्या अखेरीस व आॅगस्टच्या पहिल्या सप्ताहात पेरण्या झाल्याने या पिकाची मळणी व सवंगणी नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत; मात्र असाच पाऊस राहिल्यास लावलेला खर्चही निघेल अथवा नाही ही अपेक्षाही व्यर्थ आहे. त्यामुळे सोयाबीनच्या मळणी नंतर याच क्षेत्रात रबीत गहू व चणा हे पीक शेतकरी घेतात. त्यामुळे या पिकाच्या पेरण्या लांबल्यास डिसेंबरच्या शेवट व जानेवारीत पेरण्या झाल्यास गहू पिकाला लागणारा गारवा राहणार नाही. त्यामुळे रबीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी वर्तवीत आहेत. या बरोबरच रबीही धोक्यात सापडणार या चिंतेने बळीराजाला ग्रासले आहे.खरीप हंगामातील दुबार तिबार पेरणीच्या खर्चाने जवळ होता नव्हता पैसा निघून गेला. शेतातील पिकाकडे पाहताच हंगाम हातातून गेल्याचे दिसत आहेत. यामुळे अनेक अडचणीचा सामना बळीराजाच्या कुटुंबाला करावा लागतो. अशात इतर खर्च व येत्या दिवसात वैरणाची समस्या समोर येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्याची चिंता शेतकऱ्यांसमोर आहे. (वार्ताहर)